शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

माळरानावर फुलली शेती, वर्षभराचा मिटला पाणीप्रश्न

By admin | Updated: October 14, 2016 08:51 IST

गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि.१४ -  गेल्या वर्षाची गोष्ट, पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेलेला, नदी कोरडी ठाक पडलेली तर विहिरींनीही तळ गाठलेला. थंडीच्या सुरुवातीलाच दीड हजार लोकसंख्येच्या सटाने गावाला पाणीटंचाईने वेढलेले. अस्मानी संकटापुढे संपूर्ण गावापुढेच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलेला. अशावेळी पाण्यासाठी शासन दरबारी टॅँकरसाठी प्रयत्न सुरू झाले, एकदाचा टॅँकर मंजूर झाला, पण त्याचे पाणी किती व कोणाला पुरणार? मग आठवण झाली १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेच्या हाताला काम देण्याबरोबरच, पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाची. गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला. तलावातील गाळाने माळरान तर फुलविलेच, पण सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ग्रामस्थांची तहान कायमची भागवली. राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याने नांदगाव तालुक्यातील सटाने ग्रामस्थांना जागे केले. अनकाई डोंगरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या व एक हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या सटाने या गावाला उन्हाळ्यातील पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली, त्यातच १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर येथील शेती पूर्णत: फक्त पावसावरच अवलंबलेली अशा परिस्थितीत फक्त खरीप हंगामावर भीस्त ठेवून असलेल्या सटाने ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यास महसूल खाते यशस्वी झाले. अनकाई डोंगर रांगाच्या उतरावरून येणारे, परंतु आडकाठी नसल्याने वाहून जाणारे पाणी शिवारातच अडविण्यासाठी गाळाने भरलेल्या पाझर तलावाचे काम हाती घेण्यात आले. दोन कोटी ३५ लाख रुपये किमतीचे ग्रामस्थांनी केलेले श्रमदान व महसूल खात्याने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या जोडमुळे बघता बघता पाझर तलावातील एक लाख ३५ हजार ब्रास म्हणजेच तीन लाख २६ हजार ७०० घनमीटर क्षेत्रावरील गाळ उपसण्यात आला व दुर्लक्षित झालेल्या पाझर तलावाला जलयुक्त शिवार अभियानाने पुनर्वैभव प्राप्त करून दिले. गावाच्या एकजुटीने शिवाराचे सारे रूपडेच आता बदलले. पाझर तलावातून उपसलेला गाळ माळरानावरील शेतकऱ्यांनी उचलून नेला होता, त्याची जागा आता शेती फुलविण्यात झाली आहे. निसर्गाची साथ व जमिनीच्या पोतीत कमालीचा बदल झाल्याने जवळपास साडेतीनशे एकरवर झेंडूच्या बागा, बाजरी व मक्याचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांचे चेहरेही फुलले आहेत. अनकाई डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याला अनकाई व सटाने दरम्यान सात लहान बंधाऱ्यांची आडकाठी असली तरी यंदा पहिल्यांदाच हे बंधारेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत, ते भरल्याशिवाय सटाने येथील मोठ्या तलावात पाणी पोहोचत नाही. परतीच्या पावसाने चांगलीच साथ दिल्याने सटानेचा तलाव नुसता भरलाच नाही, तर ओव्हरफ्लो होऊन तुडुंब वाहिल्याने त्याचे पाणी पुढे जाऊन नागासाक्या धरणाला जाऊन मिळाले आहे. म्हणजेच सटाने गावाचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबर नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनांनाही हातभार लागला आहे. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा...शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सटाने गावातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेताना महसूल विभागाची काहीशी दमछाक झाली. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने १९७२ मध्ये हा तलाव उभारताना त्यासाठी जागा संपादित केली व त्याचा रितसर मोबदलाही संबंधितांना अदा केला होता. कालांतराने या तलावातील पाण्याची जागा गाळाने घेतली व तलावाच्या जागेवरच पुन्हा मूळमालकांनी शेती करायला सुरूवात केली. ज्यावेळी गाळ काढायचा विषय चर्चिला गेला तेव्हा त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. तलावाचा गाळ काढल्यास आम्ही शेती कुठे करायची असा प्रश्न विचारला जाऊ लागल्यावर नांदगावच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन, मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांनी समस्त गावकऱ्यांना एकत्र करून अगोदर तलावाचे महत्त्व विषद करून देतानाच, त्यात साठणाऱ्या पाण्याचे फायदे सांगितले. आज जेव्हा सटाने शिवारातील माळरान फुलले तेव्हा ग्रामस्थांना जलयुक्तचे महत्त्व पटले व त्याचबरोबर सरकारी यंत्रणेच्या आभारासाठी हातही जोडले गेले.