शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

माळरानावर फुलली शेती, वर्षभराचा मिटला पाणीप्रश्न

By admin | Updated: October 14, 2016 08:51 IST

गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि.१४ -  गेल्या वर्षाची गोष्ट, पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेलेला, नदी कोरडी ठाक पडलेली तर विहिरींनीही तळ गाठलेला. थंडीच्या सुरुवातीलाच दीड हजार लोकसंख्येच्या सटाने गावाला पाणीटंचाईने वेढलेले. अस्मानी संकटापुढे संपूर्ण गावापुढेच उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिलेला. अशावेळी पाण्यासाठी शासन दरबारी टॅँकरसाठी प्रयत्न सुरू झाले, एकदाचा टॅँकर मंजूर झाला, पण त्याचे पाणी किती व कोणाला पुरणार? मग आठवण झाली १९७२ साली पडलेल्या भीषण दुष्काळात होरपळून निघणाऱ्या जनतेच्या हाताला काम देण्याबरोबरच, पंचक्रोशीतील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हेतूने बांधण्यात आलेल्या पाझर तलावाची. गेल्या ४३ वर्षांत कोणाचेही लक्ष न गेलेल्या पाझर तलावाची जागा पाण्याऐवजी गाळाने घेतली, आज तोच पाझर तलाव सटानेच्या गावकऱ्यांसाठी वरदान ठरला. तलावातील गाळाने माळरान तर फुलविलेच, पण सात दशलक्ष घनमीटर पाणी साठवून ग्रामस्थांची तहान कायमची भागवली. राज्य सरकारने हाती घेतलेल्या ‘जलयुक्त शिवार’ अभियान राबविण्याची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याने नांदगाव तालुक्यातील सटाने ग्रामस्थांना जागे केले. अनकाई डोंगरापासून चार ते पाच किलोमीटर अंतरावर वसलेल्या व एक हजाराहून अधिक लोकसंख्या असलेल्या सटाने या गावाला उन्हाळ्यातील पाणीटंचाई जणू पाचवीलाच पुजलेली, त्यातच १९७२ च्या भीषण दुष्काळानंतर येथील शेती पूर्णत: फक्त पावसावरच अवलंबलेली अशा परिस्थितीत फक्त खरीप हंगामावर भीस्त ठेवून असलेल्या सटाने ग्रामस्थांना पाण्याचे महत्त्व पटवून देण्यास महसूल खाते यशस्वी झाले. अनकाई डोंगर रांगाच्या उतरावरून येणारे, परंतु आडकाठी नसल्याने वाहून जाणारे पाणी शिवारातच अडविण्यासाठी गाळाने भरलेल्या पाझर तलावाचे काम हाती घेण्यात आले. दोन कोटी ३५ लाख रुपये किमतीचे ग्रामस्थांनी केलेले श्रमदान व महसूल खात्याने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रसामुग्रीच्या जोडमुळे बघता बघता पाझर तलावातील एक लाख ३५ हजार ब्रास म्हणजेच तीन लाख २६ हजार ७०० घनमीटर क्षेत्रावरील गाळ उपसण्यात आला व दुर्लक्षित झालेल्या पाझर तलावाला जलयुक्त शिवार अभियानाने पुनर्वैभव प्राप्त करून दिले. गावाच्या एकजुटीने शिवाराचे सारे रूपडेच आता बदलले. पाझर तलावातून उपसलेला गाळ माळरानावरील शेतकऱ्यांनी उचलून नेला होता, त्याची जागा आता शेती फुलविण्यात झाली आहे. निसर्गाची साथ व जमिनीच्या पोतीत कमालीचा बदल झाल्याने जवळपास साडेतीनशे एकरवर झेंडूच्या बागा, बाजरी व मक्याचे पीक बहरल्याने शेतकऱ्यांचे चेहरेही फुलले आहेत. अनकाई डोंगरावरून खाली येणाऱ्या पाण्याला अनकाई व सटाने दरम्यान सात लहान बंधाऱ्यांची आडकाठी असली तरी यंदा पहिल्यांदाच हे बंधारेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत, ते भरल्याशिवाय सटाने येथील मोठ्या तलावात पाणी पोहोचत नाही. परतीच्या पावसाने चांगलीच साथ दिल्याने सटानेचा तलाव नुसता भरलाच नाही, तर ओव्हरफ्लो होऊन तुडुंब वाहिल्याने त्याचे पाणी पुढे जाऊन नागासाक्या धरणाला जाऊन मिळाले आहे. म्हणजेच सटाने गावाचा पाणीप्रश्न सुटण्याबरोबर नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनांनाही हातभार लागला आहे. अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा...शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सटाने गावातील पाझर तलावातील गाळ काढण्याचा उपक्रम हाती घेताना महसूल विभागाची काहीशी दमछाक झाली. जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने १९७२ मध्ये हा तलाव उभारताना त्यासाठी जागा संपादित केली व त्याचा रितसर मोबदलाही संबंधितांना अदा केला होता. कालांतराने या तलावातील पाण्याची जागा गाळाने घेतली व तलावाच्या जागेवरच पुन्हा मूळमालकांनी शेती करायला सुरूवात केली. ज्यावेळी गाळ काढायचा विषय चर्चिला गेला तेव्हा त्याला तितक्याच मोठ्या प्रमाणात विरोधही झाला. तलावाचा गाळ काढल्यास आम्ही शेती कुठे करायची असा प्रश्न विचारला जाऊ लागल्यावर नांदगावच्या उपविभागीय अधिकारी वासंती माळी, तत्कालीन तहसीलदार सुदाम महाजन, मंडळ अधिकारी कैलास चौधरी यांनी समस्त गावकऱ्यांना एकत्र करून अगोदर तलावाचे महत्त्व विषद करून देतानाच, त्यात साठणाऱ्या पाण्याचे फायदे सांगितले. आज जेव्हा सटाने शिवारातील माळरान फुलले तेव्हा ग्रामस्थांना जलयुक्तचे महत्त्व पटले व त्याचबरोबर सरकारी यंत्रणेच्या आभारासाठी हातही जोडले गेले.