शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेतकरी होणार आता उद्योजक

By admin | Updated: March 5, 2016 00:44 IST

शेतजमीन विकसित करून त्यावर उद्योग उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे.

पिंपरी : शेतजमीन विकसित करून त्यावर उद्योग उभे करण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ अंतर्गत संपादित न केलेल्या खासगी जमिनी आणि भूसंपादन केलेल्या जमिनीवर एकात्मिक औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यासाठी योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. यामुळे शेतजमीन विकसित करून शेतकरीसुद्धा उद्योजक होऊ शकतील. या योजनेची घोषणा ‘मेक इन इंडिया’मध्ये केली आहे, असे एमआयडीसीचे उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांनी सांगितले.एकात्मिक औद्यागिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी संबंधित जमीनमालक, जमीनमालकांनी नियुक्त केलेला विकसक, जमीनमालकांनी कुठल्याही विकसकासोबत स्थापन केलेला उपक्रम यांना महामंडळाकडे प्रस्ताव दाखल करता येईल. त्यासाठी अर्जदारांनी प्रस्तावित जमिनीचा तपशील, दळणावळणाच्या उपलब्ध सोयी, पाणीपुरवठ्याचा तपशील, क्षेत्रात वन जमिनींचा समावेश नसल्यास वन विभागाचा दाखला, नगररचना विभागाचा अभिप्राय ही कागदपत्रे देणे बंधनकारक आहे. यानंतर महामंडळाकडून छाननी प्रक्रिया होईल. यानंतर स्थळपाहणी करून भौगोलिक परिस्थिती, पाणीपुरवठा तसेच दळणवळण आदींची तपासणी करून अहवाल दिल्यानंतर संचालक मंडळाच्या मान्यतेसाठी परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात येईल. उच्चाधिकार समितीने औद्योगिक क्षेत्र घोषित केल्यानंतर एकात्मिक औद्योगिक क्षेत्राचा प्रस्ताव उद्योगमंत्री व एमआयडीसीच्या अध्यक्षांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येईल. या विकसित करण्यात आलेल्या क्षेत्रात ६० टक्के जागा उद्योगासाठी व ४० टक्के जागा रहिवाशी क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात येणार आहे. विकसित करण्यात आलेला भूखंड शेतकऱ्यांना भाड्याने देता येईल किंवा एखाद्या औद्योगिक कंपनीस विकता येईल, तसेच शेतकरी स्वत:ची कंपनीसुद्धा उभारू शकतील. >२५ एकर जमीन असल्यास शेतकऱ्यांना आयटी हब, १०० एकर क्षेत्र असल्यास औद्योगिक क्षेत्र उभारण्याकरिता एमआयडीसीकडून मंजुरी मिळेल. यासाठी संबंधित क्षेत्राचा झोन बदली करण्याचा शासनाने ठरवून दिलेला दर भरावा लागेल. एकात्मिक औद्यागिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी येणाऱ्या प्रस्तांवाची छाननी करणे, स्थळपाहणी करणे, प्रस्तावास मान्यता देणे, अधिसूचना जारी करणे या बाबी व एकात्मिक औद्योगिक क्षेत्राला मान्यता देण्यासाठी कार्यपद्धती महामंडळाचे परिपत्रक निश्चित करण्यात आले आहे.