शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

देशात दरदिवशी जातोय एका बिबट्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 06:34 IST

वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षात देशात दररोज एका बिबट्याला आपला जीव गमवावा लागत आहे.

- राजेश शेगोकार अकोला : वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षात देशात दररोज एका बिबट्याला आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जंगलावर होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढत असले तरी, दुसरीकडे बिबट्यांची संख्याही घटत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतात एकूण ८८६ बिबटे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. वन्यजीव विभागाकडे असलेल्या माहितीनुसार १९९८ मध्ये भारतात बिबट्यांची संख्या सुमारे ४५००० इतकी होती; मात्र २०१५ मध्ये केवळ ७९१० इतकेच बिबटे शिल्लक राहिले आहेत. गेल्या १७ वर्षांत बिबट्यांच्या संख्येत सुमारे ८२ टक्के इतकी घट झाली आहे. अकोल्यात सलग दोन दिवसांत दोन बिबट मृतावस्थेत आढळले, तर मंगळवारी वाहनाच्या धडकेत नाशिकमध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला.मुंबई, नाशिक व इतर भागात बिबट्यांच्या अधिवासावर काँक्रिटचे जंगल उभे राहिल्यामुळे बिबट्यांनी शहरांकडे धाव घेतली आहे. मुंबईत आरे कॉलनी, राजीव गांधी राष्टÑीय अभयारण्य परिसरात बिबट्यांचा सहज वावर आपल्याला दिसून येतो. नाशिक विभागात तर बिबट्यांचा जुना अधिवास संपल्यामुळे पर्याय म्हणून बिबट्याने उसाच्या शेतात धाव घेतली आहे. मानवी सहजीवनात बिबट्या रमला असला तरी मानवी हल्ल्यामध्ये वाघांच्यातुलनेत बिबट्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.वन्यजीव अभ्यासकांच्या मते, बिबट्याची मानसिकता जाणून घेणारे कुठलेच तंत्रज्ञान आजवर विकसित झालेले नाही. बिबट्याच्या नैसर्गिक राहणीमानावर फरक पडला की त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. म्हणूनच हल्ल्याच्याही घटना वाढत आहेत; मात्र बिबट्यांचा स्वभाव माणसाला मारणेनसून, त्याला टाळणे आहे. ‘सेल्फ प्रोटेक्शन’ हा प्रत्येकाचा स्वभाव असतो. त्यामुळे ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात.२०१८ मध्ये एकूण २६० बिबट मृत पावले. त्यात ९० बिबट्यांची शिकार करण्यात आली, तर २२ बिबटे गावकऱ्यांनी मारले. उर्वरित बिबट्यांच्या मृत्यूबाबत थांगपत्ता नाही.>50 प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी देशातउभारले गेले आहेत; मात्र बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. बिबट्याची जगण्याची जिद्द भरपूर आहे. पक्षी खाऊन, कुत्रे खाऊन म्हणजे कोणत्याही परिस्थितीततो जगतो, हे विशेष!>वाढती शिकार, संवर्धनाअभावी बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रानडुक्कर आणि काळवीट बिबट्याचे आवडते खाद्य आहे. म्हणून शेतकºयांना रानडुक्कर, हरीण व नीलगायींच्या त्रासापासून वाचायचे असेल, तर त्यांनी बिबट संवर्धनात हातभार लावणे आवश्यक आहे.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक.

टॅग्स :leopardबिबट्या