शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

देशात दरदिवशी जातोय एका बिबट्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 06:34 IST

वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षात देशात दररोज एका बिबट्याला आपला जीव गमवावा लागत आहे.

- राजेश शेगोकार अकोला : वन्यजीव आणि मानव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला असून या संघर्षात देशात दररोज एका बिबट्याला आपला जीव गमवावा लागत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये जंगलावर होत असलेल्या मानवी अतिक्रमणामुळे बिबटे अन्नाच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेऊ लागले आहेत. माणसांवर बिबट्यांचे हल्ले वाढत असले तरी, दुसरीकडे बिबट्यांची संख्याही घटत चालली आहे. गेल्या दोन वर्षांत भारतात एकूण ८८६ बिबटे मृत पावल्याच्या घटना घडल्या आहेत. वन्यजीव विभागाकडे असलेल्या माहितीनुसार १९९८ मध्ये भारतात बिबट्यांची संख्या सुमारे ४५००० इतकी होती; मात्र २०१५ मध्ये केवळ ७९१० इतकेच बिबटे शिल्लक राहिले आहेत. गेल्या १७ वर्षांत बिबट्यांच्या संख्येत सुमारे ८२ टक्के इतकी घट झाली आहे. अकोल्यात सलग दोन दिवसांत दोन बिबट मृतावस्थेत आढळले, तर मंगळवारी वाहनाच्या धडकेत नाशिकमध्ये एका बिबट्याचा मृत्यू झाला.मुंबई, नाशिक व इतर भागात बिबट्यांच्या अधिवासावर काँक्रिटचे जंगल उभे राहिल्यामुळे बिबट्यांनी शहरांकडे धाव घेतली आहे. मुंबईत आरे कॉलनी, राजीव गांधी राष्टÑीय अभयारण्य परिसरात बिबट्यांचा सहज वावर आपल्याला दिसून येतो. नाशिक विभागात तर बिबट्यांचा जुना अधिवास संपल्यामुळे पर्याय म्हणून बिबट्याने उसाच्या शेतात धाव घेतली आहे. मानवी सहजीवनात बिबट्या रमला असला तरी मानवी हल्ल्यामध्ये वाघांच्यातुलनेत बिबट्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.वन्यजीव अभ्यासकांच्या मते, बिबट्याची मानसिकता जाणून घेणारे कुठलेच तंत्रज्ञान आजवर विकसित झालेले नाही. बिबट्याच्या नैसर्गिक राहणीमानावर फरक पडला की त्याचा परिणाम मानवी जीवनावर होतो. म्हणूनच हल्ल्याच्याही घटना वाढत आहेत; मात्र बिबट्यांचा स्वभाव माणसाला मारणेनसून, त्याला टाळणे आहे. ‘सेल्फ प्रोटेक्शन’ हा प्रत्येकाचा स्वभाव असतो. त्यामुळे ते स्वरक्षणासाठी हल्ला करतात.२०१८ मध्ये एकूण २६० बिबट मृत पावले. त्यात ९० बिबट्यांची शिकार करण्यात आली, तर २२ बिबटे गावकऱ्यांनी मारले. उर्वरित बिबट्यांच्या मृत्यूबाबत थांगपत्ता नाही.>50 प्रकल्प वाघांच्या संवर्धनासाठी देशातउभारले गेले आहेत; मात्र बिबट्याच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी कुठलेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. बिबट्याची जगण्याची जिद्द भरपूर आहे. पक्षी खाऊन, कुत्रे खाऊन म्हणजे कोणत्याही परिस्थितीततो जगतो, हे विशेष!>वाढती शिकार, संवर्धनाअभावी बिबट्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. रानडुक्कर आणि काळवीट बिबट्याचे आवडते खाद्य आहे. म्हणून शेतकºयांना रानडुक्कर, हरीण व नीलगायींच्या त्रासापासून वाचायचे असेल, तर त्यांनी बिबट संवर्धनात हातभार लावणे आवश्यक आहे.- यादव तरटे पाटील,वन्यजीव अभ्यासक.

टॅग्स :leopardबिबट्या