शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
4
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
5
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
6
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
7
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती
8
"तरुण दिसण्यासाठी ती गेली ५ वर्ष.."; शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी केला मोठा खुलासा
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
खराब हवामानामुळे पिकाचे होणारे नुकसान टाळता येणार, नव्या टेक्नोलॉजीचा शेतकऱ्यांना फायदाच!
11
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
12
Shefali Jariwala Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
13
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
14
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
15
११वी प्रवेशाचा घोळ थांबेना, विद्यार्थ्यांची चिंता मिटेना; तांत्रिक अडचणींचे ग्रहण सुटणार कधी?
16
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
17
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
18
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
19
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
20
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध

प्रकल्पग्रस्त आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

By admin | Updated: July 18, 2016 02:34 IST

गावठाणमधील घरांवर कारवाईविरोधात सोमवारी पुकारलेल्या बंदवरून तुर्भे येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी भाजपासह सर्वपक्षीय नेत्यांना धारेवर धरले.

नवी मुंबई : गावठाणमधील घरांवर कारवाईविरोधात सोमवारी पुकारलेल्या बंदवरून तुर्भे येथे झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी भाजपासह सर्वपक्षीय नेत्यांना धारेवर धरले. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर बंदमधून माघार घेत असल्याचे सांगण्यासाठी आमदार मंदा म्हात्रे यांनी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर अविश्वास दाखवत बंद होणारच अशा घोषणा केल्या. यावेळी इतर पक्षीय नेत्यांनी बंदला पाठिंबा दर्शवत भाजपाची कोंडी केली.गावठाणमधील प्रकल्पग्रस्तांच्या घरांवर होत असलेल्या कारवाईच्या विरोधात भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी सर्वपक्षीयांना सोबत घेवून सोमवारी बंदची घोषणा केली होती. तुर्भे येथील होणाऱ्या कारवाईच्या अनुषंगाने आमदार म्हात्रे पालिका आयुक्तांच्या भेटीला गेल्या होत्या. यावेळी आयुक्तांनी त्यांना धुडकावून लावले होते. त्यानंतर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात हा लढा उभारण्यात आलेला आहे. परंतु आंदोलनापूर्वीच रविवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आमदार मंदा म्हात्रे यांची बैठक झाली. या बैठकीत पावसाळ्यापुरती कारवाईला स्थगिती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. ही माहिती प्रकल्पग्रस्तांपर्यंत पोहोचवण्याकरिता त्यांनी दुपारी तुर्भे येथे पत्रकार परिषद तसेच बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्तांनी मंदा म्हात्रे यांनाच धारेवर धरले. आंदोलनाची घोषणा करताना सर्वपक्षीयांना सोबत घेतले असताना, मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीला त्या एकट्याच कशा गेल्या, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी उपस्थित काँग्रेस जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी भाजपा व मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांनी देखील मुंढे यांची प्रशंसा केलेली असल्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. मंदा म्हात्रे यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न करूनही प्रकल्पग्रस्तांमधील उद्रेक शांत झाला नाही. यावेळी इतकी वर्षे दुसरे मुख्यमंत्री होते, तेव्हा का कारवाया थांबल्या नाहीत, असा आमदार म्हात्रे यांनी उलट प्रश्न विचारताच वातावरण अधिकच तापले. अखेर नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावापुढे नमते घेत त्यांना बैठकीतून काढता पाय घ्यावा लागला.त्यानंतर सभागृहात उपस्थित १५० ते २०० च्या जमावाने त्या बैठकीवर ताबा घेतला. आम्हाला कोणत्याच राजकीय पक्षाची भूमिका इथे नको असून, केवळ प्रकल्पग्रस्तांची भूमिका हवी असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित इतर सर्वपक्षीय नेत्यांनाही धारेवर धरले. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच शाब्दिक चकमक उडू लागली. अखेर शिवसेनेच्या वतीने विठ्ठल मोरे, नामदेव भगत यांनी, काँग्रेसच्या वतीने दशरथ भगत यांनी तर राष्ट्रवादीच्या वतीने चंद्रकांत पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांना आंदोलनात पाठिंबा दर्शवला. (प्रतिनिधी)