शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

मंदीचे ग्रहण सुटतेय

By admin | Updated: December 24, 2015 02:30 IST

२००८ ते २०१४ हा कालावधी देशाच्याच नव्हे तर जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीने अतिशय भयावह असा होता. याचे कारण म्हणजे, अमेरिका आणि युरोपात आलेल्या मंदीची छाया अवघ्या जगभरात मोठी झाली

मनोज गडनीस,  मुंबई२००८ ते २०१४ हा कालावधी देशाच्याच नव्हे तर जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीने अतिशय भयावह असा होता. याचे कारण म्हणजे, अमेरिका आणि युरोपात आलेल्या मंदीची छाया अवघ्या जगभरात मोठी झाली आणि विकसित देशांसोबत विकसनशील देशांच्या अनेक अर्थव्यवस्थांना या मंदीने आपल्या कवेत घेतले. तेथील प्रगतीला खीळ घातली. पण २०१४ च्या शेवटापासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आणि अनेक देशांतून आयात-निर्यातीच्या व्यवहारांनी जोर पकडण्यास सुरुवात केली, तसेच विकसनशील देशांतील अर्थव्यवस्थेतील चलन ही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बळकट होताना दिसू लागले. या सर्वांचा परिणाम हा मंदीचे सावट उठून तेजीची चाहूल जाणविण्याच्या रूपाने दिसू लागला. २०१४ हे वर्ष उजाडले, अमेरिका तेलाच्या निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाली आणि यातून तेल उत्पादन करणारे देश आणि अमेरिका यांच्यात दरयुद्ध छेडले गेले. या युद्धाचा फायदा म्हणजे, तेलाच्या किमती झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झाली. प्रति बॅरल १४५ डॉलरवरून या किमती आता प्रति बॅरल ३५ अमेरिकी डॉलर इथवर घसरल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळीत बचत झाली. वित्तीय तूट आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आणि याचा परिणाम देशाच्या अर्थकारणात सुधार प्रतिबिंबित होण्याच्या रूपाने दिसून आला. मंदीच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने सातत्याने चालू खात्यातील वित्तीय तूट आणि चलनवाढ या मुद्द्यांवर बोट ठेवत एक तर व्याजदरात वाढ करणे किंवा आहे ते व्याजदर स्थिर ठेवण्याचे कडक धोरण अवलंबिले होते. मात्र, सरत्या दीड वर्षात जसा परिस्थिती सुधार येताना दिसला तसे रिझर्व्ह बँकेनेही काही प्रमाणात लवचीक धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली आणि याचा परिणाम गेल्या सव्वा वर्षांत व्याजदरात सुमारे एक टक्का कपात झाली आहे. व्याजदरात झालेल्या या कपातीमुळे मंदीत आणि कर्जाच्या खाईत पिचलेल्या बांधकाम उद्योगाला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळताना दिसत आहे. > दसरा-दिवाळीत विक्रमी विक्रीगेल्या सहा वर्षांपासून भयावह मंदीचा सामना केल्यानंतर, २०१५ मध्ये प्रथमच दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त बांधकाम उद्योगात चैतन्य निर्माण होताना दिसले. घटलेल्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी अनेक बिल्डरांनी बँकांशी करारबद्ध होण्यास सुरुवात केली. बँकांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक आकर्षक योजना आखल्या तर बिल्डरांनी ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचे पैसे स्वत: भरण्याची तयारी दर्शविली. काही बिल्डरांनी तर इंटिरियर किंवा घर खदेरीसोबत वाहन मोफत देणे वगैरे योजनांची घोषणा केली. याचा परिणाम वार्षिक पातळीवर घरांच्या विक्रीत १२ टक्क्यांनी वाढ होण्याच्या रूपाने दिसून आला. टक्केवारीत ही वाढ किरकोळ वाटत असली तरी मंदीच्या पार्श्वभूमीवर विचार करता रघुराम राजन यांची भूमिका मोलाचीव्याजदरात घसघशीत कपात करूनही थकीत कर्जाचा बोजा वाढलेल्या बँकांनी व्याजदरात झालेली कपात ही ग्राहकांपर्यंत पोहोचविली नाही. या संदर्भात मग भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी ठोस भूमिका घेत बँकांना फटकारले. तसेच जोपर्यंत बँका या दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवीत नाहीत तोवर पुढील दरकपात करणार नसल्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर देशातील एकूण १२१ बँकांपैकी आता सुमारे ५० बँकांनी ही दरकपात ग्राहकांपर्यंत पोहोचविली आहे. अर्थकारणातील सुधार लक्षात घेता आगामी काळात व्याजदरात कपात अपेक्षित असून लाभ ग्राहकांना मिळेल अशी आशा आहे.