शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

मंदीचे ग्रहण सुटतेय

By admin | Updated: December 24, 2015 02:30 IST

२००८ ते २०१४ हा कालावधी देशाच्याच नव्हे तर जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीने अतिशय भयावह असा होता. याचे कारण म्हणजे, अमेरिका आणि युरोपात आलेल्या मंदीची छाया अवघ्या जगभरात मोठी झाली

मनोज गडनीस,  मुंबई२००८ ते २०१४ हा कालावधी देशाच्याच नव्हे तर जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीने अतिशय भयावह असा होता. याचे कारण म्हणजे, अमेरिका आणि युरोपात आलेल्या मंदीची छाया अवघ्या जगभरात मोठी झाली आणि विकसित देशांसोबत विकसनशील देशांच्या अनेक अर्थव्यवस्थांना या मंदीने आपल्या कवेत घेतले. तेथील प्रगतीला खीळ घातली. पण २०१४ च्या शेवटापासून आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये घट होण्यास सुरुवात झाली आणि अनेक देशांतून आयात-निर्यातीच्या व्यवहारांनी जोर पकडण्यास सुरुवात केली, तसेच विकसनशील देशांतील अर्थव्यवस्थेतील चलन ही अमेरिकी डॉलरच्या तुलनेत बळकट होताना दिसू लागले. या सर्वांचा परिणाम हा मंदीचे सावट उठून तेजीची चाहूल जाणविण्याच्या रूपाने दिसू लागला. २०१४ हे वर्ष उजाडले, अमेरिका तेलाच्या निर्मितीबाबत स्वयंपूर्ण झाली आणि यातून तेल उत्पादन करणारे देश आणि अमेरिका यांच्यात दरयुद्ध छेडले गेले. या युद्धाचा फायदा म्हणजे, तेलाच्या किमती झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झाली. प्रति बॅरल १४५ डॉलरवरून या किमती आता प्रति बॅरल ३५ अमेरिकी डॉलर इथवर घसरल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर परकीय गंगाजळीत बचत झाली. वित्तीय तूट आटोक्यात येण्यास सुरुवात झाली आणि याचा परिणाम देशाच्या अर्थकारणात सुधार प्रतिबिंबित होण्याच्या रूपाने दिसून आला. मंदीच्या काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने सातत्याने चालू खात्यातील वित्तीय तूट आणि चलनवाढ या मुद्द्यांवर बोट ठेवत एक तर व्याजदरात वाढ करणे किंवा आहे ते व्याजदर स्थिर ठेवण्याचे कडक धोरण अवलंबिले होते. मात्र, सरत्या दीड वर्षात जसा परिस्थिती सुधार येताना दिसला तसे रिझर्व्ह बँकेनेही काही प्रमाणात लवचीक धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली आणि याचा परिणाम गेल्या सव्वा वर्षांत व्याजदरात सुमारे एक टक्का कपात झाली आहे. व्याजदरात झालेल्या या कपातीमुळे मंदीत आणि कर्जाच्या खाईत पिचलेल्या बांधकाम उद्योगाला काही प्रमाणात नवसंजीवनी मिळताना दिसत आहे. > दसरा-दिवाळीत विक्रमी विक्रीगेल्या सहा वर्षांपासून भयावह मंदीचा सामना केल्यानंतर, २०१५ मध्ये प्रथमच दसरा आणि दिवाळीच्या सणानिमित्त बांधकाम उद्योगात चैतन्य निर्माण होताना दिसले. घटलेल्या व्याजदराचा फायदा घेण्यासाठी अनेक बिल्डरांनी बँकांशी करारबद्ध होण्यास सुरुवात केली. बँकांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अधिक आकर्षक योजना आखल्या तर बिल्डरांनी ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशनचे पैसे स्वत: भरण्याची तयारी दर्शविली. काही बिल्डरांनी तर इंटिरियर किंवा घर खदेरीसोबत वाहन मोफत देणे वगैरे योजनांची घोषणा केली. याचा परिणाम वार्षिक पातळीवर घरांच्या विक्रीत १२ टक्क्यांनी वाढ होण्याच्या रूपाने दिसून आला. टक्केवारीत ही वाढ किरकोळ वाटत असली तरी मंदीच्या पार्श्वभूमीवर विचार करता रघुराम राजन यांची भूमिका मोलाचीव्याजदरात घसघशीत कपात करूनही थकीत कर्जाचा बोजा वाढलेल्या बँकांनी व्याजदरात झालेली कपात ही ग्राहकांपर्यंत पोहोचविली नाही. या संदर्भात मग भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी ठोस भूमिका घेत बँकांना फटकारले. तसेच जोपर्यंत बँका या दरकपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवीत नाहीत तोवर पुढील दरकपात करणार नसल्याचा इशारा दिला. या इशाऱ्यानंतर देशातील एकूण १२१ बँकांपैकी आता सुमारे ५० बँकांनी ही दरकपात ग्राहकांपर्यंत पोहोचविली आहे. अर्थकारणातील सुधार लक्षात घेता आगामी काळात व्याजदरात कपात अपेक्षित असून लाभ ग्राहकांना मिळेल अशी आशा आहे.