शहरं
Join us  
Trending Stories
1
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
2
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
3
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
4
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
5
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
8
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
9
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
10
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
11
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
12
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
13
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
14
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
15
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
16
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
17
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
18
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
19
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
20
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग

By admin | Updated: July 4, 2014 06:10 IST

वरूण राजा रूसल्याने पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. एकेकाळी कपाशी हे मुख्य पीक असलेला हा भाग गत काही वर्षात सोयाबीनकडे वळला

राजेश शेगोकार, बुलडाणावरूण राजा रूसल्याने पश्चिम वऱ्हाडावर दुष्काळाचे ढग दाटून आले आहेत. एकेकाळी कपाशी हे मुख्य पीक असलेला हा भाग गत काही वर्षात सोयाबीनकडे वळला; मात्र यावर्षी सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने खरिपाच्या प्रारंभापासूनच शेतकऱ्यांसाठी संकटांची मालिका सुरू झाली होती. पावसाने त्यामध्ये आणखी भर पाडली आहे. अकोला, बुलडाणा आणि वाशिम या पश्चिम वऱ्हाडातील तिन्ही जिल्ह्यांमध्ये १६ लाख ३१ हजार ४०० हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आले; मात्र पावसाच्या हुलकावणीमुळे संपूर्ण नियोजनच कोलमडले आहे. संपूर्ण मृग नक्षत्र कोरडे गेले असून, आर्द्रार् नक्षत्रही कोरडेच जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे मूग, उडीद या दोन्ही पिकांचा पेरा करण्याची वेळ निघून गेली आहे. आता हा पेरा स्वतंत्रपणे होणारच नाही. त्यामुळे पश्चिम वऱ्हाडातून यावेळी उडीद व मूग ही दोन पिके जवळपास बाद झाल्यातच जमा आहेत. आता सूर्यफुलासारखे आपात्कालीन पीक घेऊनच शेतकऱ्यांना समाधान मानावे लागणार आहे. अकोला व बुलडाणा या दोन जिल्ह्यांमध्ये धूळ पेरणी करण्याचे प्रमाण बरेच आहे. यावर्षी अकोल्यात ६ हजार ८००, तर बुलडाण्यात ७ हजार ७०० हेक्टरवर झालेल्या धूळ पेरण्या उलटण्याच्या स्थितीत आहेत. केवळ पाण्याची सोय असलेले शेतकरीच पेरण्या जिवंत ठेवू शकले. २०१० ते २०१३ या चार वर्षांच्या पाऊस परिस्थितीवर नजर टाकली, तर पश्चिम वऱ्हाडात पहिला पाऊस साधारणत: ५ ते १५ जूनदरम्यान येऊन, खरीप हंगामाच्या पेरणीला सुरूवात होते, असे चित्र दिसते; परंतु यावर्षी अद्यापपर्यंत पाऊसच झालेला नाही. सरासरी ७०० ते ७५० मिलीमीटर पाऊस पडणाऱ्या पश्चिम वऱ्हाडात यावर्षी अद्याप दोन अंकी आकडाही गाठला गेलेला नाही. गतवर्षी ३० जूनपर्यंत नदी-नाले ओसंडून वाहत होते, धरणंही भरली होती. यावर्षी मात्र ते कोरडेठण्ण आहेत. पावसाअभावी पिण्याच्या पाण्याचे संकटही उभे ठाकण्याची चिन्हं दिसत आहेत. सद्यस्थितीत महिनाभर पुरेल इतका जलसाठा पश्चिम वऱ्हाडात आहे. बुलडाण्यात गतवर्षी गाळ काढण्याची मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्यामुळे सध्या जलसाठ्यांमध्ये बऱ्यापैकी पाणी उपलब्ध आहे; मात्र हे पाणी जिल्हावासियांना जास्तीत जास्त दीड महिना पुरू शकेल. त्यामुळे वरूणराजाची कृपा लवकर झाली नाही, तर शेतकऱ्यांसोबतच इतर घटकांचेही हाल होणार आहेत.