शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्यायला पाणी नाही, दारुचा मात्र महापूर

By admin | Updated: April 27, 2016 06:50 IST

गरजेहून तिप्पटीहून अधिक पाणी राज्यातील एकटा मद्यनिर्मिती उद्योग वापरतो, अशी माहिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या आदेशात ठळकपणे नमूद केली.

औरंगाबाद: एकाही शहराला गरजेएवढा पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही, अशी स्थिती असताना या शहरांच्या पिण्याच्या पाण्याच्या एकूण गरजेहून तिप्पटीहून अधिक पाणी राज्यातील एकटा मद्यनिर्मिती उद्योग वापरतो, अशी माहिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या आदेशात ठळकपणे नमूद केली.उपलब्ध पाणी सर्वोच्च प्राधान्याने पिण्यासाठी पुरविण्याचे राज्य सरकारचे कागदोपत्री धोरण असूनही पिण्याचे पाणी न मिळाल्याने राज्यात माणसांना व पशु-पक्ष्यांना प्राणास मुकावे लागत आहे, याची गंभीर दखल घेत न्यायालयाने येत्या १० जूनपर्यंत मद्यनिर्मितीसह इतर उद्योगांचा पाणीपुरवठा निम्म्याने कमी करण्याचा आदेश दिला. हा आदेश देताना न्यायालयाने इतर बाबींखेरीज मद्यउद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या आकडेवारीची प्रकर्षाने नोंद घेतली.याचिकाकर्त्यांनी अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेली आकडेवारी न्यायालायने अंतरिम निकालपत्रात सविस्तरपणे नमूद केली. यानुसार राज्यातील सर्व मोठ्या शहरांची मिळून पिण्याच्या पाण्याची गरज वर्षाला २० दशलक्ष घनफूटाहून कमी आहे. याउलट राज्यातील मद्य व बियर उत्पादन करणारे कारखाने अधिकृतपणे ६० दशलक्ष घनफूट व अनधिकृतपणे ३० दशलक्ष घनफूट असे मिळून वर्षाला सुमारे ९० दशलक्ष घनफूट पाणी वापरतात. म्हणजेच मद्यउद्योगाची पाण्याची गरज शहरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेच्या तुलनेत तिप्पटीहून जास्त आहे.सरकारनेच दिलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात मद्याचे सेवन, साठवणूक व वाहतूक करण्यासाठी दिलेल्या परवान्यांची संख्या चार लाख ५४ हजार ७७२ होती. या परानाधारकांची गरज भागविण्यासाठी त्यावर्षी राज्यात ३६८ कोटी ५४ लाख ६६ हजार ५१३ बल्क लिटर एवढ्या मद्याचे व बियरचे उत्पादन केले गेले होते. (एक बल्क लिटर म्हणजे एक हजार लिटर). राज्यातील दारुबंदी धोरण किती हास्यास्पद पद्धतीने राबविले जात आहे, हेही यावरून दिसून येते. साडेचार लाख अट्टल मद्यपींनी पोहायचे म्हटले तरी त्यांना एवढी दारू पुरुन उरेल!मद्य उत्पादनाचे हे प्रमाण व त्यासाठी लागणारे पाणी याचा हिशेब केला तर एरवी जे पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरता आले असते असे तब्बल ४,०४५ दशलक्ष घनफूट पाणी मद्यनिर्मि तीसाठी वापरले गेले, याचीही न्यायालयाने दखल घेतली. (प्रतिनिधी)