शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

प्यायला पाणी नाही, दारुचा मात्र महापूर

By admin | Updated: April 27, 2016 06:50 IST

गरजेहून तिप्पटीहून अधिक पाणी राज्यातील एकटा मद्यनिर्मिती उद्योग वापरतो, अशी माहिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या आदेशात ठळकपणे नमूद केली.

औरंगाबाद: एकाही शहराला गरजेएवढा पाणीपुरवठा केला जाऊ शकत नाही, अशी स्थिती असताना या शहरांच्या पिण्याच्या पाण्याच्या एकूण गरजेहून तिप्पटीहून अधिक पाणी राज्यातील एकटा मद्यनिर्मिती उद्योग वापरतो, अशी माहिती उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी दिलेल्या आदेशात ठळकपणे नमूद केली.उपलब्ध पाणी सर्वोच्च प्राधान्याने पिण्यासाठी पुरविण्याचे राज्य सरकारचे कागदोपत्री धोरण असूनही पिण्याचे पाणी न मिळाल्याने राज्यात माणसांना व पशु-पक्ष्यांना प्राणास मुकावे लागत आहे, याची गंभीर दखल घेत न्यायालयाने येत्या १० जूनपर्यंत मद्यनिर्मितीसह इतर उद्योगांचा पाणीपुरवठा निम्म्याने कमी करण्याचा आदेश दिला. हा आदेश देताना न्यायालयाने इतर बाबींखेरीज मद्यउद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या आकडेवारीची प्रकर्षाने नोंद घेतली.याचिकाकर्त्यांनी अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेली आकडेवारी न्यायालायने अंतरिम निकालपत्रात सविस्तरपणे नमूद केली. यानुसार राज्यातील सर्व मोठ्या शहरांची मिळून पिण्याच्या पाण्याची गरज वर्षाला २० दशलक्ष घनफूटाहून कमी आहे. याउलट राज्यातील मद्य व बियर उत्पादन करणारे कारखाने अधिकृतपणे ६० दशलक्ष घनफूट व अनधिकृतपणे ३० दशलक्ष घनफूट असे मिळून वर्षाला सुमारे ९० दशलक्ष घनफूट पाणी वापरतात. म्हणजेच मद्यउद्योगाची पाण्याची गरज शहरांच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजेच्या तुलनेत तिप्पटीहून जास्त आहे.सरकारनेच दिलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०१०-११ मध्ये राज्यात मद्याचे सेवन, साठवणूक व वाहतूक करण्यासाठी दिलेल्या परवान्यांची संख्या चार लाख ५४ हजार ७७२ होती. या परानाधारकांची गरज भागविण्यासाठी त्यावर्षी राज्यात ३६८ कोटी ५४ लाख ६६ हजार ५१३ बल्क लिटर एवढ्या मद्याचे व बियरचे उत्पादन केले गेले होते. (एक बल्क लिटर म्हणजे एक हजार लिटर). राज्यातील दारुबंदी धोरण किती हास्यास्पद पद्धतीने राबविले जात आहे, हेही यावरून दिसून येते. साडेचार लाख अट्टल मद्यपींनी पोहायचे म्हटले तरी त्यांना एवढी दारू पुरुन उरेल!मद्य उत्पादनाचे हे प्रमाण व त्यासाठी लागणारे पाणी याचा हिशेब केला तर एरवी जे पाणी नागरिकांना पिण्यासाठी वापरता आले असते असे तब्बल ४,०४५ दशलक्ष घनफूट पाणी मद्यनिर्मि तीसाठी वापरले गेले, याचीही न्यायालयाने दखल घेतली. (प्रतिनिधी)