शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

जीवनसाथी शोधण्यात चूक करू नका

By admin | Updated: March 6, 2017 03:57 IST

आयुष्यात काही बनलेलो नसतो, तेव्हा आपण तणावमुक्त असतो.

स्रेहा पावसकर,ठाणे- आयुष्यात काही बनलेलो नसतो, तेव्हा आपण तणावमुक्त असतो. मात्र काही बनल्यानंतरचे आयुष्य तणावपूर्ण असते. नोकरी मिळवताना ताणतणाव, मिळाल्यानंतर कामाचा ताण, प्रगती करताना वाटेत येणाऱ्या अडथळ्यांमुळे ताण येतच राहतो. संघर्ष कमी होत नाही. तो सुरूच राहतो. अशावेळी आपल्याला साथ देणारा, धीर देणारा जीवनसाथी असावा. एखाद्यावेळी नोकरी शोधताना चूक झाली तरी चालेल, पण जीवनसाथी शोधण्यात चूक करू नका, असा सल्ला मुंबई परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त डॉ. मनोज शर्मा यांनी दिला.पॉवर कपल या सत्रात त्यांच्यासमवेत पत्नी आयकर सहआयुक्त श्रद्धा शर्मा यांची मुलाखत रंगली. यूपीएससी, एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मुलांची खूप स्वप्ने असतात. मात्र प्रेमभावनांमध्ये गुंतलेल्या मुलांसाठी अभ्यास आणि प्रेम दोन्हीसाठी वेळ देणे कठीण असते. ठराविक काळानंतर आपल्या सोबत्याला याचे महत्त्व पटवून अभ्यासाला लागा. खरं म्हणजे प्रत्येकाने आपल्या व्यक्तिला ध्येयांवर लक्ष केंद्रित करून ते पूर्ण करण्यासाठी धीर दिला पाहिजे. ज्यांच्या घरचे, वैयक्तिक आयुष्यातील जीवन चांगले असते त्यांचे बाहेरील अर्थात नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणचे आयुष्यही चांगले राहते, असे निरीक्षण मनोज यांनी व्यक्त केले. तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी कधीच अपयशी होत नाहीत. अधिकारीपदाची नोकरी नाही मिळाली तरी ते विद्यार्थी ज्या क्षेत्रात जातात तिथे यशस्वी होतात. विशेषत: या क्षेत्रात येणाऱ्या मुलींनी जीवनसाथी निवडण्यापासून ते नोकरीची निवड असो स्वत:चे निर्णय स्वत: घ्यायला शिकले पाहिजे. >महाराष्ट्र कोणाला निराश करत नाहीमी स्वत: महाराष्ट्रीयन नाही. मात्र गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात नोकरी केली. येथे खूप चांगल्या माणसांनी बनलेला आहे. महाराष्ट्र कधीच कोणाला निराश करत नाही. फक्त आपल्यामध्ये जिद्द, मेहनत आणि प्रामाणिकपणा पाहिजे. महाराष्ट्रात आलेला प्रत्येक जण यशस्वी होतो, असेही मत डॉ. मनोज शर्मा यांनी व्यक्त केले.