शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
3
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
4
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
5
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
6
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
7
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
8
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
9
एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
10
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
11
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार
12
घरची कामं करा अन् फिट राहा; केर काढा, लादी पुसा, कपडे धुवा... पाहा किती कॅलरी होतात बर्न?
13
'ऑपरेशन सिंदूर'नंतर रशियाची भारताला मोठी ऑफर; पाकिस्तानसह अमेरिकेचीही झोप उडवणार
14
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
15
पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्थानचा बहिष्कार? भारत कोणत्या वस्तू आयात करतो?
16
सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला दिल्लीतील व्यावसायिकाचा जामीन अर्ज,ड्रग्ज आणि लष्कर-ए-तोयबाशी आहे कनेक्शन!
17
बारावी नापास डॉक्टर! रुग्णांच्या जीवाशी खेळ; क्लिनिक उघडून मोठे आजार बरे करण्याचा दावा
18
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
19
डिफेन्समध्ये का आहे तेजी? घसरत्या बाजारातही HAL आणि BEL मध्ये खरेदीदारांची रांग; कारण आहे खास
20
'भूत बंगला'मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार 'हा' अभिनेता, फोटो पोस्ट करत म्हणाला...

चालकांकडे गाडीची कागदपत्रे मागू नका

By admin | Updated: March 17, 2017 03:29 IST

वाहनचालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करु नयेत, असे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत

मुंबई : वाहनचालकांकडून गाडीच्या कागदपत्रांची मागणी करु नयेत, असे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. या आदेशामुळे वाहतूक पोलिसांवरील अनावश्यक ताण कमी होऊन भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. तथापि, या निर्णयामुळे पोलिसांबाबतची भीती कमी होणार असल्याचाही सूर उमटत आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत. त्यात वाहनांच्या रांगाही वाढत आहेत. वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे मुख्य काम वाहतूक विभागाकडे आहे. मुंबईचे रस्ते, जकात नाका, द्रुतगती मार्ग अशा विविध ठिकाणी तैनात असलेल्या वाहतूक पोलिसांनी चालकाला अडविल्यास सुरुवातीला त्यांच्याकडे गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली जाते. अशावेळी लायसन्स, पीयूसी, विमा, ग्रीन टॅक्ससारख्या कागदपत्रांच्या मागणीसाठी तगादा लावला जातो. कागदपत्रांअभावी चालकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जातो. तर अनेकदा यातून सुटण्यासाठी तडजोड करत लाचेचा मार्ग स्वीकारण्यात येतो. त्यामुळे पोलीस दलातील भ्रष्टाचार वाढत असल्याचा आरोप वाहतूक विभागातील सुनील टोके यांनी करत थेट हायकोर्टात धाव घेतली आणि वाहतूक पोलिसांमधील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला. मुळात वाहतूक पोलिसांवर वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि वाहतुकीत शिस्त आणणे ही मुख्य जबाबदारी आहे. तर कागदपत्रांची पूर्तता आहे की नाही यासाठी आरटीओंचे विशेष पथक तैनात आहे. त्यामुळे विनाकारण कागदपत्र तपासणीत अडकल्यामुळे भ्रष्टाचाराबरोबर वादही वाढत असल्याचे चित्र पहावयास मिळते आहे. १ जानेवारी २०१७ पासून मुंबई वाहतूक विभागातर्फे ई-चालानद्वारे कारवाई सुरु करण्यात आली आहे. वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आणि त्याचप्रमाणे कॅशलेस व्यवहार होणे अपेक्षित असताना वाहतूक विभागातील अधिकारी आणि अंमलदारांकडून पारदर्शकपणे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याची खंत वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी व्यक्त केली आहे.वाहतूक पोलीस आरटीओची कागदपत्रे मागत असल्याने वाहन चालक आणि वाहतूक पोलीस यांच्यात नाहक वाद निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांची प्रतिमा मलीन होत असल्याचेही भारंबे यांनी आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून देण्यात येणाऱ्या लायसन्स, पीयूसी, विमा, ग्रीन टॅक्ससारख्या कुठल्याच कागदपत्रांची मागणी करु नये, असे आदेश वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. जोपर्यंत नवे आदेश जारी होत नाहीत, तोपर्यंत या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.या आदेशामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार असल्याचे मत आरटीओ आणि वाहतूक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. तसेच वाहतूक पोलिसांवरील ताणही कमी होईल, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)