शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

नापासांसाठी नको आॅक्टोबरची वारी; जूनमध्येच झालेली बरी !

By admin | Updated: March 24, 2015 00:12 IST

दहावी, बारावी : कर्नाटकात सुरू आहे १४ वर्षापासून परीक्षा--पुरवणी परीक्षा घ्या नापासांचे वर्ष वाचव१ा

कर्नाटकात दहावी आणि बारावीत नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. दहावीसाठी बंगलोरमधील कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ, तर बारावीसाठी पदवीपूर्व शिक्षण परीक्षा मंडळ गेल्या चौदा वर्षांपासून यशस्वीपणे पुरवणी परीक्षा घेते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्यादृष्टीने महाराष्ट्र शासनालाही हा निर्णय घेणे शक्य आहे. मध्यंतरी शैक्षणिक वर्तुळात तशी चर्चाही झाली. अभ्यास झाला, मात्र निर्णय राहिला. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील पुरवणी परीक्षा व्यवस्था काय आहे, कशी राबविली जाते, त्याचा विद्यार्थ्यांना थेट फायदा कसा होतो याचा वेध घेणारी मालिका आजपासून....भीमगोंडा देसाई - कोल्हापूरदहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी आॅक्टोबरची वाट पहावी लागते. यात या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते. ते जाऊ नये यासाठी कर्नाटकने १४ वर्षापूर्वी उपाय शोधला. नापासांसाठी जूनमध्येच पुरवणी परीक्षा घेणे सुरू केले. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच पुढच्या वर्षात प्रवेश मिळू लागला. गेल्या १४ वर्षांत लाखो विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ झाला आहे.महाराष्ट्रात अशी परीक्षा सुरू केल्यास नापास विद्यार्थ्याना शैक्षणिक वर्ष वाया जाणे थांबवण्याची संधी मिळणार आहे.महाराष्ट्रालगत कर्नाटक असल्याने अनेक शासकीय निर्णयात साधर्म्य आहे. सन २००१ मध्ये संपूर्ण कर्नाटकात पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणी अखंडपणे सुरू आहे. तेथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षा घेणे, त्यानंतर नापासांसाठी पुरवणी परीक्षा घेणे, वेळेत निकाल लावणे यासाठी एकच परीक्षा मंडळ आहे. बारावीसाठीही अशीच व्यवस्था आहे. याउलट कामाच्या सोयीसाठी महाराष्ट्रात दहावी-बारावीसाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण असे विभाग आहेत. कार्यक्षेत्र तीन ते चार जिल्ह्यांचे आहे. विभागातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेणे, निकाल लावणे अशी प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविली जाते.कर्नाटकात मार्च, एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली जाते. दीड महिन्यांच्या आत निकाल लावला जातो. नापास विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे मुख्य परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसोबत पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश घेता येतो. जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांतून किंवा आवश्यकतेनुसार वाढीव जागा निर्माण केल्या जातात. पुरवणी परीक्षेमुळे मुख्य परीक्षेसाठी केलेला अभ्यास विसरण्यापूर्वीच पुरवणी परीक्षा होत असल्यामुळे पास होण्यासाठी फायदा होतो. महाराष्ट्रात मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते. महिन्यानंतर निकाल लागतो. या संपूर्ण प्र्रक्रियेला निम्मे वर्षे जाते. पुढच्या वर्गासाठी प्रवेशाचे दरवाजे बंद होतात. शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते. मुख्य परीक्षेनंतर सहा महिन्यांनी परीक्षा होत असल्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १५ टक्के आहे. कर्नाटकात पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा आधार ठरली आहे. वर्ष वाया जात नसल्यामुळे वैफल्याची भावना येत नाही. दहावी, बारावी पुरवणी परीक्षा १४ वर्षांपासून घेतली जाते. निकालही वेळेवर लावला जातो. पुरवणी परीक्षेचा निकाल २५ टक्क्यांपर्यंत लागतो. कोणत्याही कारणामुळे पुरवणी परीक्षा घेण्यात खंंड पडलेला नाही. निकालही वेळेवर लावण्याकडे लक्ष दिले जाते. - एस. जयकुमार, संचालक, शिक्षण संशोधन प्रशिक्षण विभाग,कर्नाटक