शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

नापासांसाठी नको आॅक्टोबरची वारी; जूनमध्येच झालेली बरी !

By admin | Updated: March 24, 2015 00:12 IST

दहावी, बारावी : कर्नाटकात सुरू आहे १४ वर्षापासून परीक्षा--पुरवणी परीक्षा घ्या नापासांचे वर्ष वाचव१ा

कर्नाटकात दहावी आणि बारावीत नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. दहावीसाठी बंगलोरमधील कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ, तर बारावीसाठी पदवीपूर्व शिक्षण परीक्षा मंडळ गेल्या चौदा वर्षांपासून यशस्वीपणे पुरवणी परीक्षा घेते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्यादृष्टीने महाराष्ट्र शासनालाही हा निर्णय घेणे शक्य आहे. मध्यंतरी शैक्षणिक वर्तुळात तशी चर्चाही झाली. अभ्यास झाला, मात्र निर्णय राहिला. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील पुरवणी परीक्षा व्यवस्था काय आहे, कशी राबविली जाते, त्याचा विद्यार्थ्यांना थेट फायदा कसा होतो याचा वेध घेणारी मालिका आजपासून....भीमगोंडा देसाई - कोल्हापूरदहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी आॅक्टोबरची वाट पहावी लागते. यात या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते. ते जाऊ नये यासाठी कर्नाटकने १४ वर्षापूर्वी उपाय शोधला. नापासांसाठी जूनमध्येच पुरवणी परीक्षा घेणे सुरू केले. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच पुढच्या वर्षात प्रवेश मिळू लागला. गेल्या १४ वर्षांत लाखो विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ झाला आहे.महाराष्ट्रात अशी परीक्षा सुरू केल्यास नापास विद्यार्थ्याना शैक्षणिक वर्ष वाया जाणे थांबवण्याची संधी मिळणार आहे.महाराष्ट्रालगत कर्नाटक असल्याने अनेक शासकीय निर्णयात साधर्म्य आहे. सन २००१ मध्ये संपूर्ण कर्नाटकात पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणी अखंडपणे सुरू आहे. तेथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षा घेणे, त्यानंतर नापासांसाठी पुरवणी परीक्षा घेणे, वेळेत निकाल लावणे यासाठी एकच परीक्षा मंडळ आहे. बारावीसाठीही अशीच व्यवस्था आहे. याउलट कामाच्या सोयीसाठी महाराष्ट्रात दहावी-बारावीसाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण असे विभाग आहेत. कार्यक्षेत्र तीन ते चार जिल्ह्यांचे आहे. विभागातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेणे, निकाल लावणे अशी प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविली जाते.कर्नाटकात मार्च, एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली जाते. दीड महिन्यांच्या आत निकाल लावला जातो. नापास विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे मुख्य परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसोबत पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश घेता येतो. जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांतून किंवा आवश्यकतेनुसार वाढीव जागा निर्माण केल्या जातात. पुरवणी परीक्षेमुळे मुख्य परीक्षेसाठी केलेला अभ्यास विसरण्यापूर्वीच पुरवणी परीक्षा होत असल्यामुळे पास होण्यासाठी फायदा होतो. महाराष्ट्रात मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते. महिन्यानंतर निकाल लागतो. या संपूर्ण प्र्रक्रियेला निम्मे वर्षे जाते. पुढच्या वर्गासाठी प्रवेशाचे दरवाजे बंद होतात. शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते. मुख्य परीक्षेनंतर सहा महिन्यांनी परीक्षा होत असल्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १५ टक्के आहे. कर्नाटकात पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा आधार ठरली आहे. वर्ष वाया जात नसल्यामुळे वैफल्याची भावना येत नाही. दहावी, बारावी पुरवणी परीक्षा १४ वर्षांपासून घेतली जाते. निकालही वेळेवर लावला जातो. पुरवणी परीक्षेचा निकाल २५ टक्क्यांपर्यंत लागतो. कोणत्याही कारणामुळे पुरवणी परीक्षा घेण्यात खंंड पडलेला नाही. निकालही वेळेवर लावण्याकडे लक्ष दिले जाते. - एस. जयकुमार, संचालक, शिक्षण संशोधन प्रशिक्षण विभाग,कर्नाटक