शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भिवंडीतील कापड उद्योगास उतरती कळा

By admin | Updated: July 18, 2016 04:00 IST

आठ लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग असल्याने या व्यवसायातील तेजीमंदीचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत असतो.

भिवंडी- आठ लाखांपेक्षा जास्त यंत्रमाग असल्याने या व्यवसायातील तेजीमंदीचा परिणाम शहरातील नागरिकांवर होत असतो. गेल्या काही महिन्यांपासून कापड व्यवसायातील मंदीचा अलीकडेच झालेल्या ‘रमजान ईद’च्या काळात चांगलाच प्रभाव जाणवला. अशीच स्थिती राहिली तर पुढे काय होईल, या भीतीने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. भिवंडीत बनवलेल्या कापडास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांगली मागणी आहे. तसेच त्यापासून बनवलेले रेडिमेड कपडे परदेशी जातात. मात्र, हा सर्व व्यवहार मुंबईतील मोठे कापड व्यापारी करीत असल्याने सर्वसाधारण विणकर व कापड उत्पादक यांना योग्य भाव न मिळाल्याने त्यांची आर्थिक पिळवणूक होते. शासनाने शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय जसा घेतला, तसाच यार्न दलाल, कापड व्यापारी व मास्टर विव्हर्स यांना वगळून थेट व्यापाऱ्यांपर्यंत विणकर व यंत्रमागधारक यांचा माल पोहोचवून त्यांच्या मालास योग्य भाव मिळवून दिला पाहिजे.परदेशात साध्या कापडाच्या बाहुलीवर त्यास लागलेले सामान व त्याची किंमत प्रिंट केलेली असते. मात्र, भारतातील सूत गिरण्यांतून निघालेल्या यार्नच्या गोळ्यावर (कोम) किंमत लिहिलेली नसते. त्यामुळे या कोमपासून कापड उद्योगात सट्टाबाजारी सुरू होते. विणकर व छोटे कापड व्यापारी त्याचे बळी ठरतात. शहरात चार यंत्रमागांपासून हजारो यंत्रमाग चालवणारे व्यापारी आहेत. परंतु, मास्टर विव्हर्ससारखे मोठे व्यापारी स्वत:च्या फायद्यासाठी कापडाचा माल विणून देणाऱ्याचा कधीच विचार करीत नाही. ते कमी मजुरी देऊन विणकरांकडून कापड विणून घेतात आणि बाजारात जास्त भावाने आपले कापड विकतात. शासनदरबारी या सर्व व्यवहाराची कोणतीही नोंद नसल्याने विणकरांची आर्थिक पिळवणूक होत आहे. मास्टर विव्हर्सच्या अशा वर्तनास कंटाळून काही व्यापाऱ्यांनी आपला ग्रुप बनवून आपल्या कापड व्यवसायास स्थैर्य दिले. मात्र, त्यांचे प्रमाण फारच अत्यल्प आहे. कापड विणून देणे व स्वत: कापड बनवून विकणे, असे दोन प्रकारचे कापड उत्पादक यंत्रमागधारक आहेत. मात्र, कापड व यार्न मार्केटमधील सट्टेबाजारी यामुळे त्यांना स्थैर्य लाभत नाही. कधीकधी कामगार नसतात तर कधी मास्ट विव्हर्स कापड विणण्यासाठी बिम देत नाही. अशा स्थितीत यंत्रमागास लागणारा खर्च सुरू असतो. त्यामुळे अनेकदा यंत्रमागधारक अथवा यंत्रमागचालक कर्जबाजारी होतो.शहरातील कापड व्यवसायास ६० वर्षांपेक्षा जास्त वर्षे झाली असतानादेखील या व्यावसायिकांना संघर्षाचा सामना करावा लागत आहे. भारताबाहेरील कापड विक्रीस येत असल्याने कापड बाजारात भाव मिळत नसल्याची कापड विक्रेत्यांची तक्रार आहे. कापड बनवण्यासाठी कमी खर्च यावा, यासाठी शासनाच्या सवलती मिळवण्याकरिता कापड व्यापारी व मजुरीने बिम चालवणाऱ्या विणकरांची धडपड सुरू आहे. मात्र, सवलती मिळवल्यानंतरही या व्यवसायास स्थैर्य देण्याचा प्रयत्न व्यापाऱ्यांकडून होत नसल्याने वारंवार विविध समस्यांचा सामना विणकरांना करावा लागत आहे. राज्यातील यंत्रमागधारकांनी आधुनिक व जास्त उत्पादन देणारे यंत्रमाग लावावेत, यासाठी केंद्राने वारंवार योजना जाहीर केल्या. मात्र, ८० टक्के यंत्रमाग जुन्या धाटणीचे आहेत. नवीन अ‍ॅटोमॅटीक यंत्रमाग लावण्यास स्थानिक व्यापारी तयार नाही. त्याचा परिणाम कापड बाजारात दिसतो. मार्केटमधील तेजीच्या काळात व्यवसाय स्थिर करण्याचा प्रयत्न करीत नाही.