शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

वीज कोसळण्याचे संकट कायम!

By admin | Updated: July 4, 2014 06:12 IST

वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये वीजरोधक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला

बुलडाणा : वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढतच आहे. यावर उपाय म्हणून राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांमध्ये वीजरोधक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला असला, तरी पश्चिम वऱ्हाडात ही यंत्रे लावण्याच्या कामात नियोजनाचा अभाव दिसून येत आहे. त्यामुळे या भागात वीज कोसळण्याचे संकट कायम असल्याचे चित्र आहे़ मान्सूनपूर्व तसेच परतीच्या पावसाच्या वेळी वीज कोसळण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे शेकडो लोकांचे बळी जातात. शेतात काम करताना वीज कोसळून मृत्युमुखी पडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक असते. यावर उपाय म्हणून वीज कधी व कुठे पडून शकते, याची माहिती मिळावी आणि वीजरोधक यंत्रे बसवावी, यासाठी शासनाने पाऊल उचलले. राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने ९ मे २००९ रोजी राज्यभरात वीजरोधक टॉवर्स उभारण्याबाबत आदेश पारित केला होता. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दीड लाखांचा निधीही उपलब्ध करून देण्यात आला. यातून नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला तसेच बीड, धुळे, चिपळूण आणि नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा टप्याटप्याने उभारली जात आहे; मात्र नियोजनअभावी यंत्र उभारणीचे प्रमाण व्यस्त असल्याचे दिसून येते. पश्चिम वऱ्हाडाचा विचार केला, तर अकोला जिल्ह्यात ५५ वीजरोधक यंत्रे लावण्यात आली आहेत. बुलडाणा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये मात्र प्रत्येकी केवळ ४ यंत्रे लावण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)