शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
2
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
3
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
4
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
5
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
6
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
7
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
8
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
9
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
10
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
11
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी
12
संतापजनक! २ मुलांची आई पडली १७ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात, दोघंही झाले फरार; आता महिलेवर POCSO कारवाई!
13
जरांगेंचा होकार, पण जर जीआरमध्ये काही दगा फटका झाला तर...; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा
14
"मला मावशीच्या मिठीतच शांतता मिळते"; पतीचं बोलणं मनाला लागलं, नवविवाहितेनं टोकाचं पाऊल उचललं!
15
रात्री ९ वाजेपर्यंत मुंबई खाली करतो, मराठ्यांची पोरं नाचत जातील, पण...; मनोज जरांगेंचा विखेंना शब्द
16
श्रीसंतची दुखापत अन् RR फ्रँचायझीचा ८२ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा! विमा कंपनीची सर्वोच्च न्यायालयात धाव
17
Manoj Jarange: मनोज जरांगे आजच उपोषण सोडणार? हैदराबाद गॅझेटचा जीआर निघणार, सातारा गॅझेटीयरची जबाबदारी शिवेंद्रराजेंनी घेतली...
18
Pitru Paksha 2025: गणेशोत्सवानंतर लगेचच पितृपक्ष का? ९० टक्के लोकांना माहीतच नाही खरे कारण!
19
"कुठलाही विषय असू दे, मी नेहमी धावून जातो, पण...!" जरांगेंच्या आंदोलनावर उदयनराजेंची पहिली प्रतिक्रिया; स्पष्टच बोलले
20
Viral Video : गर्लफ्रेंडचा फोन सतत लागत होता व्यस्त, संतापलेल्या बॉयफ्रेंडनं काय केलं बघाच!

दुग्ध व्यवसायावर ब्रुसेलोसिसचे संकट

By admin | Updated: August 5, 2014 23:37 IST

संसर्गजन्य आजार : प्राण्यांपासून मानवामध्ये संक्रमण

प्रकाश पाटील -कोपार्डे ,, ब्रुसेलोसिस या अत्यंत संसर्गजन्य आजाराचे विषाणू जिल्ह्यातील जनावरांमध्ये आढळल्याने दुग्ध व्यवसायात खळबळ उडाली आहे. हा रोग जनावरांकडून मानवाकडे संक्रमित होऊन यापासून ताप येणे, गर्भपात होणे, अशक्तपणाबरोबर घाम येणे व स्नायूंमध्ये वेदना निर्माण होणे, आदी त्रास होतो. यामुळे दुग्ध व्यवसायावर नवीनच संकट आले आहे. ब्रुसेलोसिस हा अत्यंत संसर्गजन्य झुनोटिक आजार असून तो विषाणूंमुळे होतो. जनावरांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांत गर्भपात होईपर्यंत इतर कोणतीच लक्षणे न दिसल्यामुळे हा आजार झाल्याचे लवकर लक्षात येत नाही. हा आजार झालेल्या मादी प्राण्यांच्या दुधामध्ये याचे विषाणू आढळतात. आजाराचे संक्रमण झालेल्या वळूच्या वीर्यामध्ये हे विषाणू आढळतात. ज्यामुळे मादीलाही नर असे विषाणू संक्रमित करतात. हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे संक्रमण झालेल्या जनावरांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजविलेले मांस खाल्ल्याने किंवा अशा संक्रमित जनावरांच्या स्रावानेदेखील हा आजार पसरतो. या आजाराचा प्रसार गर्भपात झाल्यानंतर एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यास संपर्काद्वारे होतो. याचबरोबर ब्रुसेलोसिस आजार झालेल्या प्राण्याच्या जखमेद्वारेही हा आजार पसरतो. पशुपालक, जनावरांचे, डॉक्टर, कत्तलखान्यात काम करणारी व्यक्ती या रोगास बळी पडते.या आजाराची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत. बऱ्याच प्राण्यांमध्ये संक्रमण झाल्यानंतर पहिल्याच गर्भधारणेदरम्यान गर्भपात होतो. त्यानंतर गर्भधारणा व्यवस्थित होते. तरीदेखील संक्रमित जनावरे आयुष्यभर या विषाणूची वाहक राहतात. काही जनावरांच्या हाडांच्या सांध्यामध्ये हे विषाणू आढळतात. येथे सूज येऊन अशा जनावरांच्या हालचालींवर मर्यादा येतात.हा आजार मनुष्यामध्ये संक्रमित झाला की त्यामुळे ताप येणे, गर्भपात, अशक्तपणा, घाम येणे, डोकेदुखी, नैराश्य येणे, स्नायूंच्या व शारीरिक वेदना होतात. मात्र, यावर योग्यवेळी उपचार न झाल्यास ते घातक ठरते. ट्रेटासायक्लीन आणि रिफॅँमपिसिनसारखी प्रतिजैविके व स्ट्रिप्टोमायसिन आणि जेंटामाइसिनसारखी अमाइनोग्लाइकोसाईड ब्रुसेला या विषाणूंविरोधात प्रभावी ठरलीआहेत. हे विषाणू पेशींच्या आत आढळत असल्याने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एकापेक्षा जास्त प्रतिजैविकांचा वापर अनेक आठवड्यांपर्यंत करणे गरजेचे आहे. ब्रुसेलोसिस हा रोग अत्यंत संसर्गजन्य व घातक आहे. याची लक्षणे चटकन लक्षात येत नाहीत. यासाठी तो होऊच नये यासाठी जनावरांची व गोठ्यांची नियमित स्वच्छता व लसीकरण ही प्राथमिक काळजी घेणे गरजेचे आहे.डॉ. वर्षा थोरात, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबईकोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांतीनंतर धवलक्रांतीने आर्थिक प्रगती झाली. ताजा पैसा देणारा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे ग्रामीण भागातील ९५ टक्के लोक वळले आहेत. जिल्ह्यात गाय, म्हैस व मेंढ्या यांचे एकत्रित पशुधन सात लाखांपर्यंत आहे. हे वाचविण्यासाठी शासनानेही या ब्रुसेलोसिस आजाराचे लसीकरण सुरू केले.