शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
3
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
4
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
5
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
6
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
7
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
8
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
9
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
11
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
12
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
13
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
14
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
15
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
16
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
17
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
18
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
19
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
20
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."

शिक्षणात संभ्रमावस्था

By admin | Updated: April 9, 2017 00:12 IST

एनआयआरएफतर्फे देशातील महाविद्यालयांना रँकिंग देण्यात येते. म्हणजे देशात कोणते महाविद्यालय, विद्यापीठ अथवा संस्था अव्वल आहे, हे ठरवण्यात येते.

- राजन वेळूकर एनआयआरएफतर्फे देशातील महाविद्यालयांना रँकिंग देण्यात येते. म्हणजे देशात कोणते महाविद्यालय, विद्यापीठ अथवा संस्था अव्वल आहे, हे ठरवण्यात येते. देशातील १०० महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात येते. एनआयआरएफतर्फे यंदा जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगवर अनेक चर्चा रंगल्या. कारण या रँकिंगमध्ये अनेक महाविद्यालये पुढे गेली, तर काही नामांकित महाविद्यालये ही मागे पडली आहेत. त्यामुळे आता नॅक की एनआयआरएफ यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.देशात एकूण ७०० विद्यापीठे आहेत, पण त्यापैकी फक्त १०० क्रमांक एनआयआरएफतर्फे देण्यात आले. १००व्या क्रमांकावर असलेल्यांचे गुण इतके कमी आढळून आले आहेत की, त्यामुळे अन्य विद्यापीठांचे काय, हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे. देशातील शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शिक्षणात समानता यावी, यासाठी सरकारतर्फे १९८४ साली नॅशनल एसेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिएशन कौन्सिलची (नॅक) स्थापना करण्यात आली . नॅकतर्फे महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता तपासून त्यांना ग्रेड (ए, बी, सी) देण्यात येतात. एखाद्या महाविद्यालयाला भेट देऊन, तिथल्या गोष्टींची, कागदपत्रांची तपासणी करून ग्रेड देण्यात येते. गेल्या दोन वर्षांपासून मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे ‘नॅशनल इन्स्टिट्यूशनल रॅकिंग फ्रेमवर्क’ (एनआयआरएफ)ची सुरुवात करण्यात आली.त्याप्रमाणे, ‘नॅक’तर्फे ग्रेड दिली जाते. ग्रेडमुळे एका श्रेणीत अनेक महाविद्यालयांचा समावेश असतो, पण क्रमांक दिल्यास एकाच महाविद्यालयाला एक स्थान मिळते, त्यामुळे त्याचा क्रम लावला जातो. एनआयआरएफतर्फे हे काम केले जाते. नॅकच्या ग्रेडिंगसाठी महाविद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली जाते, पण एनआयआरएफमध्ये महाविद्यालयांना स्वत:हून त्यांचे काम सबमिट करावे लागते. नॅकतर्फे ग्रेड देताना ७ निकषांचा विचार केला जातो. कॅरिक्युलर आस्पेक्ट, टीचिंग-लर्निंग अँड इव्हॅल्युएशन, रिसर्च-कन्सल्टंसी अँड एक्स्टेंशन, इन्फ्रास्ट्रक्चर अँड लर्निंग रिसोर्सेस, स्टुडंट सपोर्ट अँड प्रोगे्रशन, गव्हर्न्सन-लीडरशीप अँड मॅनेजमेंट, इनोव्हेशन अँड बेस्ट प्रॅक्टिस या सर्व बाबींचा लेखाजोखा मांडून ग्रेड दिली जाते. एनआयआरएफतर्फे टीचिंग लर्निंग अँड रिसोर्सेस (टीएलआर), रिसर्च अँड प्रोफेशनल प्रॅक्टिस (आरपीसी), ग्रॅज्युएशन आउटकम (जीओ), आउटरिच अँड इन्क्लुझिव्हिटी (ओआय) आणि परसेप्शन (पीआर) या बाबींवर मूल्यांकन केले जाते. हे निकष महाविद्यालय, विद्यापीठ स्वत: अर्जाद्वारे एनआयआरएफकडे पाठवतात. या अर्जांमध्ये दिलेल्या माहितीवर गुण देऊन क्रमांक देण्याचे काम करण्यात येते, पण यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येत असल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. एनआयआरएफतर्फे यंदा जाहीर करण्यात आलेल्या अहवालात याच पाच निकषांवर देशातील १०० महाविद्यालायांची निवड करण्यात आली, पण या क्रमवारीत पहिल्या आणि शंभराव्या महाविद्यालयांच्या गुणांमध्ये असलेली तफावत खूप मोठी आहे. टीएलआरमध्ये पहिल्या क्रमांकाला ८३.११ गुण आहेत, तर शंभराव्या क्रमांकाला २२.६१ इतके आहेत. आरपीसीमध्ये पहिल्याला ८७.५९ तर शेवटच्या क्रमांकाला १.०४ आहेत. जीओला ९८.७१ तर शेवटच्या क्रमांकाला ३५.०८ आहेत. ओआयमध्ये ८६.४९ तर ३५.४४ मिळाले आहेत. पीआरला ८३.३३ आणि ०.०२ इतके कमी आहे. या सर्व आकडेवारीतील तफावत ही खूप मोठी आहे. पहिल्या क्रमांकात आणि शेवटच्या क्रमांकात असलेली तफावत पाहता, गुण कमी असल्याने याकडे विशेष गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. दोन क्रमांकात असलेली तफावत इतकी मोठी मानली, तर नक्की दोष कोणात आहे अथवा वास्तवात शिक्षण क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात तफावत आहे का, याची उत्तरे शोधणे गरजेचे ठरते. विद्यापीठ, संस्थांच्या शिक्षण देण्यात इतकी तफावत असल्यास, शास्त्रशुद्धपणे मोठ्या प्रमाणावर कारणमीमांसा होणे गरजेचे आहे. एनआयआरएफ आणि नॅकमध्येही यामुळे तफावत दिसून येत आहेत. नॅकप्रमाणे ए अथवा ए प्लसमध्ये असणारी काही महाविद्यालये ही एनआयआरएफ क्रमवारीत अव्वल आहेत. याउलट जी नॅक ग्रेडिंगमध्ये कमी असलेली एनआयआरएफमध्ये काही ठिकाणी अव्वल ठरली आहेत. त्यामुळे आता एक संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. शिक्षण क्षेत्रात नक्की कोणते निकष खरे, त्याचा दर्जा किती, याविषयी चित्र स्पष्ट होत नाही.

(लेखक मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.)शब्दांकन- पूजा दामले