शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

बेहरामपाड्यात इमारत कोसळून ६ ठार; ५ जखमी

By admin | Updated: October 14, 2016 03:40 IST

वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाड्यात गुरुवारी दुपारी चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण ठार तर ५ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरामपाड्यात गुरुवारी दुपारी चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जण ठार तर ५ जण जखमी झाले. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता अग्निशमन दलाने वर्तवली आहे. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते.

आयेशा अकबर खान (१२), अली निसार अहमद खान (३), ओसामा निसार खान (१४), अफिफा सादाब (१), अरिबी सदर निसार खान (२), रुसुदा निसार अहमद खान (१६) अशी मृतांची नावे आहेत. तर दौलत शेख, झुल्फेखान निसार खान, साखिया निसार अहमद खान, अब्दुल सलाम शेख, इस्लाम इकबाल शेख अशी जखमींची नावे आहेत. वांद्रे पूर्वेकडील अनंत काणेकर मार्गालगत बेहरामपाडा ही वस्ती आहे. कोसळलेले बांधकाम हे नॅशनल शाळेजवळील आहे.

जागा रेल्वेची, नियोजन एमएमआरडीएकडे-

बेहराम पाड्यातील अनधिकृत मजल्यांच्या टॉवरची उंची दिवसेंदिवस वाढतच आहे. संबंधित प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. महत्त्वाचे म्हणजे जुहू येथे दुर्घटना घडली तेव्हा पालिका आयुक्त अजय मेहता यांनी रेल्वे प्रशासनाला पत्र पाठवत १४ फुटांवरील झोपड्यांवर कारवाई करण्याबाबतची विनंती केली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाहीत तोच आता बेहरामपाडा येथे दुर्घटना घडली. कोसळलेले बांधकाम हे रेल्वे प्रशासनाच्या भूखंडावरील असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणावर या परिसराची ‘प्लानिंग अ‍ॅथोरिटी’ म्हणून जबाबदारी टाकण्यात आली आहे.

उपचारापूर्वीच मृत्यू-

वांद्रे येथील भाभा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजेपर्यंत या दुर्घटनेत जखमी झालेल्या ११ लोकांना रुग्णालयात आणण्यात आले. त्यापैकी ६ जणांचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.शोधकार्य सुरूचबांधकामाचा ढिगारा उपसण्यासाठी २ जेसीबी आणि ३० कामगारांची मदत घेण्यात आली. प्रत्यक्षात घटनास्थळी काम करण्यास अपुरी जागा असल्याने १० कामगार आणि अग्निशमन दलाच्या जवानांमार्फत शोधकार्य हाती घेण्यात आले होते.

दाटीवाटीचा परिसर-

गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हे चार मजली बांधकाम पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळले आणि परिसरात एकच घबराट उडाली. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. हा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्याने सुरुवातीपासून अग्निशमन दलाच्या कार्यात अडथळा येऊ लागला. चिंचोळ्या गल्ल्या आणि अरुंद मार्गामुळे अग्निशमन दलाची अग्निरोधक उपकरणेही घटनास्थळी पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. अग्निशमन दलाचे जवान, महापालिकेचे कर्मचारी आणि पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून स्थानिकांना दिलासा देत वेगाने मदतकार्य हाती घेतले. (प्रतिनिधी)