शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

देहूतील पूल आजपासून बंद

By admin | Updated: August 5, 2016 01:18 IST

इंद्रायणी नदीवरील ६० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला पूल वाहतुकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने गुरुवारी पावसाळ्यापुरता बंद केला

कोल्हापूर : राजघराण्यांशी निगडित असलेली मानाच्या वस्त्रांची परंपरा किंवा पद्धती केवळ मध्ययुगापुरती मर्यादित नसून प्राचीन काळापासून चालत आल्याचे दिसते. त्याचा संबंध राजनिष्ठेशी असून भारतापासून मध्य आशियापर्यंत त्याचे संदर्भ आढळून येतात, असे प्रतिपादन अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठाचे प्रा. स्टुअर्ट गॉर्डन यांनी गुरुवारी येथे केले. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘ग्यान’ उपक्रमांतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत विद्यापीठाच्या व्हर्च्युअल क्लासरूममध्ये आयोजित ‘अठराव्या शतकातील दख्खन’ या विषयावरील कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते. ते म्हणाले, शिवाजी महाराजांच्या इतिहासाकडे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे. इतिहासाकडे पाहताना समग्र दृष्टीने पाहण्याबरोबरच इतिहास समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्तमानकाळ समजून घेणे आवश्यक आहे. परदेशी अभ्यासकांनी वैज्ञानिक दृष्टीने इतिहासाचे संशोधन केले. त्यामुळे आपण त्यांच्याकडे कुतूहलाने, आदराने पाहतो. ‘ग्यान’चे समन्वयक डॉ. आर. के. कामत यांनी स्वागत केले. डॉ. अवनीश पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. इतिहास विभागप्रमुख डॉ. पद्मजा पाटील यांनी कार्यशाळेचे महत्त्व विशद केले. यावेळी ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर यांच्यासह संजय पाटील, जगदीश पाटील, शिक्षक व संशोधक विद्यार्र्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रतिष्ठा : मिठाला जागण्याची परंपरा मध्य आशियामध्येही प्रचलित भारतभूमीमध्ये जात, धर्म यापेक्षाही मिठाला जागणे ही अत्यंत प्रतिष्ठेची गोष्ट मानली जात. आपल्या मातीशी एकनिष्ठ, इमानी राहण्यासाठी सैनिकांना मीठ देऊन शपथ दिली जात असे.ही मिठाला जागण्याची परंपरा केवळ मध्ययुगीन भारतातच नव्हे, तर मध्य आशियामध्येही प्रचलित असल्याचे दिसते, असे प्रा. गॉर्डन म्हणाले. ‘बाबरनामा’मध्येही पराभूत सैनिकांना आपल्या सैन्यात नव्याने प्रवेश देताना मिठाला जागण्याची शपथ देण्याची परंपरा प्रचलित असल्याचे संदर्भ मिळतात. मिर्झाराजे जयसिंग, शहाजी महाराज, शिवाजी महाराज, राजाराम महाराज यांच्या काळातील मीठाच्या संदर्भातील अनेक उदाहरणे त्यांनी दिली. इतिहासाकडे पाहताना समग्र दृष्टीने पाहण्याबरोबरच इतिहास समजून घेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. इतिहासाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्तमानकाळ समजून घेणे आवश्यक आहे. परदेशी अभ्यासकांनी वैज्ञानिक दृष्टीने संशोधन केले. त्यामुळे आपण त्यांच्याकडे आदराने पाहतो, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले.महाड दुर्घटनेतील कांबळे यांच्यावर अंत्यसंस्कारसावर्डेवर शोककळा : बेपत्ता मुलाकडे लक्षकुंभोज : रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या अपघातात वाहून गेलेले एस.टी. चालक श्रीकांत शामराव कांबळे यांच्यावर हातकणंगले तालुक्यातील सावर्डे गावी गुरुवारी सायंकाळी ६.३० वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तथापि, त्यांचा बेपत्ता मुलगा महेंद्र याचा अद्यापही शोध न लागल्याने गावावर शोककळा पसरलेली आहे.एस.टी. चालक श्रीकांत कांबळे व त्यांच्या मुलाच्या अपघाताची बातमी कळताच सावर्डेतील ५० पेक्षा अधिक नातेवाइकांनी बुधवारी महाड गाठले. तिथे या सर्वांनी रात्र जागून काढली. गुरुवारी पहाटे श्रीकांत यांचा मृतदेह आढळून आला. दुपारी दीड वाजता दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात मिळाला. त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता सावर्डेतील बौद्धनगराशेजारील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस पी. टी. कांबळे, संपत कांबळे, गौतम कांबळे, वसंत कांबळे, महेश कांबळे, भागवत कांबळे, बौद्धनगरातील नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.