कल्याण उपविभागात महावितरणचा दणकाखडवली - महावितरणने कल्याण उपविभागात वीज देयक थकबाकी वसुलीची जोरदार मोहीम सुरू केली आहे. आठ अधिकारी तसेच कर्मचारी या कामात गुंतले असून आतापर्यंत दोन लाख रूपयांची वसुली केली असून १०० हून अधिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला आहे़ तर वीज चोरी करणार्या दोन ग्राहकांकडून प्रत्येकी ५० हजार रूपये वसूल केले आहेत़ यापुढे वीज बिल न भरल्यास वीजजोडणी कापण्याचा इशारा दिला आहे. महावितरणच्या या झटक्याने थकबाकीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. कल्याण उभारणी उपविभागात थकबाकीदारांची वाढती संख्या लक्षात घेऊन सहाय्यक अभियंता पी. एस. वाटपाडे हे आपल्या पथकासह गावागात फिरत आहेत. यानुसार कल्याण ग्रामीणमध्ये उत्कृष्ट कामगिरी करुन वसुलीत चांगले यश मिळविल्याबद्दल त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन महावितरणचे अधीक्षक अभियंता नरेंद्र इंदुरकर यांनी गौरविले आहे. वीज थकबाकी वाढली तर भारनियमन वाढते आणि भारनियमन झाले तर नाहक जनतेला त्रास सोसावा लागतो म्हणून थकबाकीदारांनी आपली थकबाकी भरावी, असे आवाहन वाटपाडे यांनी केले आहे
थकबाकीदारांचा वीज पुरवठा खंडित
By admin | Updated: May 9, 2014 22:44 IST