शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

बीडचे अर्थकारण संकटात़़!

By admin | Updated: November 17, 2014 03:51 IST

राज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे

प्रताप नलावडे, बीडराज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिन्यांत ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण राज्यात बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजूर पुरविले जातात. ऊसतोडणी मजुरांचा जिल्हा अशीच बीडची ओळख आहे. जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांनी आता कारखान्यांचा रस्ता धरला असून, याचा मोठा आर्थिक फटका ग्रामीण भागातील बाजारपेठेवर होणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आणि तांडे अक्षरश: ओस पडतात. वयोवृद्ध मंडळी सोडली तर गावात इतर कोणीही थांबत नाही. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना तब्बल सहा महिने हा फटका सहन करावा लागतो. गावातील किराणा दुकानात अनेकदा तर भोवणीही होत नसल्याचे चित्र असते.शेतात काम करण्यासाठी या सहा महिन्यांत मजूर मिळणे अवघड होऊन बसते. मजुरीचे दर या सहा महिन्यांसाठी अव्वाच्या सव्वा होऊन बसतात. ग्रामीण भागात मजूरच नसल्याने शेतीचेही संपूर्ण गणित बिघडून जाते. शेतकऱ्यांना इतर भागातून मजूर आणावे लागतात. यासाठी मोठी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागते. ऊसतोडणीसाठी मिळणारी मजुरी ही एका कोयत्याला म्हणजे पती आणि पत्नीला मिळून एका टनासाठी १९० रुपये इतकी मिळते. शेतातील एका दिवसाची मजुरी यापेक्षा अधिक मिळत असली तरी ऊसतोडणी कामगारांना काम संपल्यानंतर मिळणाऱ्या ‘उचली’मुळे या मजुरांना ऊसतोडणीसाठी जावेच लागते. १५ ते २० जणांची एक टोळी असते. पती आणि पत्नी मिळून एक कोयता असे म्हटले जाते. साधारणत: या टोळीतील पुरुष ऊस तोडतात आणि उसाची मोळी बांधण्याचे काम महिला करतात. या टोळीला कारखान्यावरून काम संपवून परत निघताना लाख रुपयांपेक्षाही अधिक उचल या टोळीचा मुकादम देतो आणि नव्या हंगामासाठी त्याचे तोडणीचे काम निश्चित केले जाते. एकरकमी मिळणारी ही उचल हाच या मजुरांसाठी आकर्षणाचा भाग आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांतून हे मजूर जात असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर याचा परिणाम होतो. आठवडी बाजार ओस पडतात. उदाहरणार्थ धारूर या तालुक्यातून ५० हजारांवर मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत व्यवसायाचे गणित बिघडते आणि व्यवसाय ३० टक्क्यांवर येतो़ परिणामी व्यापाऱ्यांना कमी माल मागवावा लागतो. देणी थकतात. धारूर येथील भूसार व्यापारी नितेश चिद्रवार सांगतात, मजूर असले की २० हजार रुपयांपर्यंत दररोजची आमची विक्री ठरलेली असते. परंतु एकदा मजूर गेले की पुढील सहा महिने ५ हजार रुपयांचा आकडाही ओलांडणे शक्य नसते.