शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बीडचे अर्थकारण संकटात़़!

By admin | Updated: November 17, 2014 03:51 IST

राज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे

प्रताप नलावडे, बीडराज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिन्यांत ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण राज्यात बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजूर पुरविले जातात. ऊसतोडणी मजुरांचा जिल्हा अशीच बीडची ओळख आहे. जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांनी आता कारखान्यांचा रस्ता धरला असून, याचा मोठा आर्थिक फटका ग्रामीण भागातील बाजारपेठेवर होणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आणि तांडे अक्षरश: ओस पडतात. वयोवृद्ध मंडळी सोडली तर गावात इतर कोणीही थांबत नाही. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना तब्बल सहा महिने हा फटका सहन करावा लागतो. गावातील किराणा दुकानात अनेकदा तर भोवणीही होत नसल्याचे चित्र असते.शेतात काम करण्यासाठी या सहा महिन्यांत मजूर मिळणे अवघड होऊन बसते. मजुरीचे दर या सहा महिन्यांसाठी अव्वाच्या सव्वा होऊन बसतात. ग्रामीण भागात मजूरच नसल्याने शेतीचेही संपूर्ण गणित बिघडून जाते. शेतकऱ्यांना इतर भागातून मजूर आणावे लागतात. यासाठी मोठी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागते. ऊसतोडणीसाठी मिळणारी मजुरी ही एका कोयत्याला म्हणजे पती आणि पत्नीला मिळून एका टनासाठी १९० रुपये इतकी मिळते. शेतातील एका दिवसाची मजुरी यापेक्षा अधिक मिळत असली तरी ऊसतोडणी कामगारांना काम संपल्यानंतर मिळणाऱ्या ‘उचली’मुळे या मजुरांना ऊसतोडणीसाठी जावेच लागते. १५ ते २० जणांची एक टोळी असते. पती आणि पत्नी मिळून एक कोयता असे म्हटले जाते. साधारणत: या टोळीतील पुरुष ऊस तोडतात आणि उसाची मोळी बांधण्याचे काम महिला करतात. या टोळीला कारखान्यावरून काम संपवून परत निघताना लाख रुपयांपेक्षाही अधिक उचल या टोळीचा मुकादम देतो आणि नव्या हंगामासाठी त्याचे तोडणीचे काम निश्चित केले जाते. एकरकमी मिळणारी ही उचल हाच या मजुरांसाठी आकर्षणाचा भाग आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांतून हे मजूर जात असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर याचा परिणाम होतो. आठवडी बाजार ओस पडतात. उदाहरणार्थ धारूर या तालुक्यातून ५० हजारांवर मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत व्यवसायाचे गणित बिघडते आणि व्यवसाय ३० टक्क्यांवर येतो़ परिणामी व्यापाऱ्यांना कमी माल मागवावा लागतो. देणी थकतात. धारूर येथील भूसार व्यापारी नितेश चिद्रवार सांगतात, मजूर असले की २० हजार रुपयांपर्यंत दररोजची आमची विक्री ठरलेली असते. परंतु एकदा मजूर गेले की पुढील सहा महिने ५ हजार रुपयांचा आकडाही ओलांडणे शक्य नसते.