शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

बीडचे अर्थकारण संकटात़़!

By admin | Updated: November 17, 2014 03:51 IST

राज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे

प्रताप नलावडे, बीडराज्यातील साखर कारखान्यांचे धुरांडे पेटू लागल्याने बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजुरांचे स्थलांतर सुरू झाले असून, जिल्ह्यातून ६ लाख मजुरांचे स्थलांतर होणार आहे. त्यामुळे आता पुढील सहा महिन्यांत ग्रामीण भागातील अर्थकारण संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. संपूर्ण राज्यात बीड जिल्ह्यातून ऊसतोडणी मजूर पुरविले जातात. ऊसतोडणी मजुरांचा जिल्हा अशीच बीडची ओळख आहे. जिल्ह्यातील ऊसतोडणी मजुरांनी आता कारखान्यांचा रस्ता धरला असून, याचा मोठा आर्थिक फटका ग्रामीण भागातील बाजारपेठेवर होणार आहे. जिल्ह्यातील अनेक गावे आणि तांडे अक्षरश: ओस पडतात. वयोवृद्ध मंडळी सोडली तर गावात इतर कोणीही थांबत नाही. ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना तब्बल सहा महिने हा फटका सहन करावा लागतो. गावातील किराणा दुकानात अनेकदा तर भोवणीही होत नसल्याचे चित्र असते.शेतात काम करण्यासाठी या सहा महिन्यांत मजूर मिळणे अवघड होऊन बसते. मजुरीचे दर या सहा महिन्यांसाठी अव्वाच्या सव्वा होऊन बसतात. ग्रामीण भागात मजूरच नसल्याने शेतीचेही संपूर्ण गणित बिघडून जाते. शेतकऱ्यांना इतर भागातून मजूर आणावे लागतात. यासाठी मोठी रक्कम शेतकऱ्यांना मोजावी लागते. ऊसतोडणीसाठी मिळणारी मजुरी ही एका कोयत्याला म्हणजे पती आणि पत्नीला मिळून एका टनासाठी १९० रुपये इतकी मिळते. शेतातील एका दिवसाची मजुरी यापेक्षा अधिक मिळत असली तरी ऊसतोडणी कामगारांना काम संपल्यानंतर मिळणाऱ्या ‘उचली’मुळे या मजुरांना ऊसतोडणीसाठी जावेच लागते. १५ ते २० जणांची एक टोळी असते. पती आणि पत्नी मिळून एक कोयता असे म्हटले जाते. साधारणत: या टोळीतील पुरुष ऊस तोडतात आणि उसाची मोळी बांधण्याचे काम महिला करतात. या टोळीला कारखान्यावरून काम संपवून परत निघताना लाख रुपयांपेक्षाही अधिक उचल या टोळीचा मुकादम देतो आणि नव्या हंगामासाठी त्याचे तोडणीचे काम निश्चित केले जाते. एकरकमी मिळणारी ही उचल हाच या मजुरांसाठी आकर्षणाचा भाग आहे. जिल्ह्यातील सर्वच गावांतून हे मजूर जात असल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर याचा परिणाम होतो. आठवडी बाजार ओस पडतात. उदाहरणार्थ धारूर या तालुक्यातून ५० हजारांवर मजूर ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. त्यामुळे नेहमीच्या तुलनेत व्यवसायाचे गणित बिघडते आणि व्यवसाय ३० टक्क्यांवर येतो़ परिणामी व्यापाऱ्यांना कमी माल मागवावा लागतो. देणी थकतात. धारूर येथील भूसार व्यापारी नितेश चिद्रवार सांगतात, मजूर असले की २० हजार रुपयांपर्यंत दररोजची आमची विक्री ठरलेली असते. परंतु एकदा मजूर गेले की पुढील सहा महिने ५ हजार रुपयांचा आकडाही ओलांडणे शक्य नसते.