शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

विकासाचा अनुशेष मोठा

By admin | Updated: November 29, 2014 23:46 IST

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक या जिल्ह्यांचा समावेश उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळात होतो. विदर्भ, मराठवाडय़ाप्रमाणो खान्देशचा देखील विकासाचा अनुशेष आहे,

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक या जिल्ह्यांचा समावेश उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळात होतो. विदर्भ, मराठवाडय़ाप्रमाणो खान्देशचा देखील विकासाचा अनुशेष आहे, मात्र या वैधानिक विकास मंडळात त्याची गणतीच होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मधूनच खान्देश विदर्भाला जोडा, अशी मागणी होत असते. भाजपा सरकारच्या काळात विदर्भ राज्य झाले तर ही मागणी पुन्हा जोर धरू शकते. अर्थात ही मागणी लावून धरणारे माजी आमदार हरिभाऊ जवरेदेखील कालवश झाले आहेत. 
आघाडी सरकारच्या काळात धुळे जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नाही. जळगावला तर कॅबिनेट मंत्रिपद नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळात खान्देशची बाजू लावून धरण्याची जबाबदारी नंदुरबारच्या डॉ. विजयकुमार गावीत व पद्माकर वळवी यांच्यावर राहिली; पण त्यांनाही मर्यादा होत्या. 15 वर्षापासून विकासाचा अनुशेष कायम आहे.  विधिमंडळ अधिवेशनात विकासाच्या अनुशेषाविषयी आवाज उठविणारे भाजपाचे आमदार आता सत्ताधारी झाल्याने त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. 
 
विमानतळ पूर्ण, सेवा नाही !
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना त्यांच्या कार्यकाळात दोन प्रमुख प्रकल्प जळगावात मंजूर झाले. जळगावात विमानतळ पूर्णत्वाला आले, परंतु अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. विमानतळ प्राधिकरण, खाजगी विमान कंपन्या आणि जिल्हा प्रशासनाने स्थानिक उद्योजकांशी दोन-तीनदा चर्चा केली, पण विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. मंत्री, राजकीय नेते आणि प्रमुख उद्योजकांचे विमान किंवा हेलिकॉप्टर उतरण्याची सोय मात्र झाली. 
 
उपसा योजनेचा निधी पडून 
बोदवड या प्रतिभाताईंच्या माहेरच्या तालुक्यासाठी उपसा सिंचन योजना मंजूर झाली, निधीही वर्ग झाला; पण काम मात्र सुरू झालेले नाही. 2क्क्9 मध्ये भूमिपूजन झाले. मुक्ताईनगर, जामनेर आणि विदर्भातील मलकापूर व मोताळा या 5 तालुक्यांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. 21 हजार कोटी खर्चाची योजना पाच वर्षात 25 हजार कोटींवर जाऊन पोहोचली. गेल्यावर्षी केंद्र सरकारने 5क्क् कोटी रुपये राज्य सरकारकडे वर्ग केले. परंतु त्यापैकी 2क्क् कोटी रुपये तापी महामंडळाकडे आले जळगाव जिल्हा हा केळीचे आगर मानला जातो. परंतु केळी उत्पादक दोन प्रमुख प्रश्नांनी त्रस्त आहेत. केळीला फळाचा दर्जा मिळाला नाही तसेच उत्पादकांना विमा योजनेचा पुरेसा लाभ मिळत नाही.  
 
कुंभमेळ्याची कामे रखडली
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर केलेल्या 2,3क्क् कोटींपैकी शासनाने अवघे सव्वाचारशे कोटी रुपये आजवर दिले, उर्वरित कामे निधीअभावी रखडली. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर दळणवळणाची सोय म्हणून नाशिक-पुणो रस्त्याचे भूसंपादनाअभावी रखडलेले काम, ओझर विमानतळावरून ‘टेक ऑफ’साठी विमानसेवेची प्रतीक्षा, नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाबरोबरच नाशिक-पुणो रेल्वे सुरू करण्यास नेमावयाच्या तांत्रिक सल्लागारासाठी राज्य सरकारचा वाटा, असे एक नव्हे तर अनेक प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. 5क् पैशाखाली पीक पैसेवारी आलेल्या गावांना दुष्काळी मदत तर अवकाळी पावसामुळे शेती, पिकाचे झालेले अतोनात नुकसान भरून काढण्यास आर्थिक मदतीची गरज आहे. 
 
नंदुरबारमध्ये सिंचन अनुशेष
राज्यातील सर्वाधिक सिंचन अनुशेष असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प व बहुचर्चित नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. कोरडी, देहली, शिवण, दरा व नागन हे पाच मध्यम प्रकल्प अर्धवट असून, ते पूर्ण करण्यास 3क्क् कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. 21 लघू पाटबंधारे योजनांची कामेही रखडली. त्यासाठी 2क्क् कोटींची आवश्यकता आहे. या जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरण्यासाठी खास नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्याला केंद्रीय जल आयोगाने मंजुरीही दिली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. 
 
-मिलिंद कुळकर्णी