शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचा अनुशेष मोठा

By admin | Updated: November 29, 2014 23:46 IST

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक या जिल्ह्यांचा समावेश उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळात होतो. विदर्भ, मराठवाडय़ाप्रमाणो खान्देशचा देखील विकासाचा अनुशेष आहे,

खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक या जिल्ह्यांचा समावेश उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळात होतो. विदर्भ, मराठवाडय़ाप्रमाणो खान्देशचा देखील विकासाचा अनुशेष आहे, मात्र या वैधानिक विकास मंडळात त्याची गणतीच होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे मधूनच खान्देश विदर्भाला जोडा, अशी मागणी होत असते. भाजपा सरकारच्या काळात विदर्भ राज्य झाले तर ही मागणी पुन्हा जोर धरू शकते. अर्थात ही मागणी लावून धरणारे माजी आमदार हरिभाऊ जवरेदेखील कालवश झाले आहेत. 
आघाडी सरकारच्या काळात धुळे जिल्ह्याला मंत्रिपद मिळाले नाही. जळगावला तर कॅबिनेट मंत्रिपद नव्हते. त्यामुळे मंत्रिमंडळात खान्देशची बाजू लावून धरण्याची जबाबदारी नंदुरबारच्या डॉ. विजयकुमार गावीत व पद्माकर वळवी यांच्यावर राहिली; पण त्यांनाही मर्यादा होत्या. 15 वर्षापासून विकासाचा अनुशेष कायम आहे.  विधिमंडळ अधिवेशनात विकासाच्या अनुशेषाविषयी आवाज उठविणारे भाजपाचे आमदार आता सत्ताधारी झाल्याने त्यांच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. 
 
विमानतळ पूर्ण, सेवा नाही !
प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपती असताना त्यांच्या कार्यकाळात दोन प्रमुख प्रकल्प जळगावात मंजूर झाले. जळगावात विमानतळ पूर्णत्वाला आले, परंतु अद्याप विमानसेवा सुरू झालेली नाही. विमानतळ प्राधिकरण, खाजगी विमान कंपन्या आणि जिल्हा प्रशासनाने स्थानिक उद्योजकांशी दोन-तीनदा चर्चा केली, पण विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. मंत्री, राजकीय नेते आणि प्रमुख उद्योजकांचे विमान किंवा हेलिकॉप्टर उतरण्याची सोय मात्र झाली. 
 
उपसा योजनेचा निधी पडून 
बोदवड या प्रतिभाताईंच्या माहेरच्या तालुक्यासाठी उपसा सिंचन योजना मंजूर झाली, निधीही वर्ग झाला; पण काम मात्र सुरू झालेले नाही. 2क्क्9 मध्ये भूमिपूजन झाले. मुक्ताईनगर, जामनेर आणि विदर्भातील मलकापूर व मोताळा या 5 तालुक्यांनाही या योजनेचा लाभ होणार आहे. 21 हजार कोटी खर्चाची योजना पाच वर्षात 25 हजार कोटींवर जाऊन पोहोचली. गेल्यावर्षी केंद्र सरकारने 5क्क् कोटी रुपये राज्य सरकारकडे वर्ग केले. परंतु त्यापैकी 2क्क् कोटी रुपये तापी महामंडळाकडे आले जळगाव जिल्हा हा केळीचे आगर मानला जातो. परंतु केळी उत्पादक दोन प्रमुख प्रश्नांनी त्रस्त आहेत. केळीला फळाचा दर्जा मिळाला नाही तसेच उत्पादकांना विमा योजनेचा पुरेसा लाभ मिळत नाही.  
 
कुंभमेळ्याची कामे रखडली
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मंजूर केलेल्या 2,3क्क् कोटींपैकी शासनाने अवघे सव्वाचारशे कोटी रुपये आजवर दिले, उर्वरित कामे निधीअभावी रखडली. त्याचबरोबर कुंभमेळ्याच्या पाश्र्वभूमीवर दळणवळणाची सोय म्हणून नाशिक-पुणो रस्त्याचे भूसंपादनाअभावी रखडलेले काम, ओझर विमानतळावरून ‘टेक ऑफ’साठी विमानसेवेची प्रतीक्षा, नाशिक रोड रेल्वे स्थानकाच्या आधुनिकीकरणाबरोबरच नाशिक-पुणो रेल्वे सुरू करण्यास नेमावयाच्या तांत्रिक सल्लागारासाठी राज्य सरकारचा वाटा, असे एक नव्हे तर अनेक प्रश्न राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत. 5क् पैशाखाली पीक पैसेवारी आलेल्या गावांना दुष्काळी मदत तर अवकाळी पावसामुळे शेती, पिकाचे झालेले अतोनात नुकसान भरून काढण्यास आर्थिक मदतीची गरज आहे. 
 
नंदुरबारमध्ये सिंचन अनुशेष
राज्यातील सर्वाधिक सिंचन अनुशेष असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील अपूर्ण प्रकल्प व बहुचर्चित नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्पासाठी तीन हजार कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. कोरडी, देहली, शिवण, दरा व नागन हे पाच मध्यम प्रकल्प अर्धवट असून, ते पूर्ण करण्यास 3क्क् कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. 21 लघू पाटबंधारे योजनांची कामेही रखडली. त्यासाठी 2क्क् कोटींची आवश्यकता आहे. या जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष भरण्यासाठी खास नर्मदा-तापी नदीजोड प्रकल्प हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्याला केंद्रीय जल आयोगाने मंजुरीही दिली आहे. या प्रकल्पासाठी जवळपास अडीच हजार कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. 
 
-मिलिंद कुळकर्णी