शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अपंग अशोकची ‘एव्हरेस्ट भरारी’

By admin | Updated: May 21, 2016 17:06 IST

अशोक रामलाल मुन्ने या तरुणाने अपंगत्वावर मात करत जिद्द, परिश्रम आणि तपश्चर्येच्या जोरावर कठीण असे एव्हरेस्ट शिखर पार केले

गणेश खवसे - 
 
आकांक्षापुढे शिखरही ठेंगणे : जिद्दीला मिळाली यशाची किनार
 
नागपूर, दि. 21 - नियतीच्या एका डावामुळे अपंगत्व आले. मात्र त्यातून स्वत:ला सावरत दृढनिश्चयच जणू अंगी बाळगला आणि पाहता -पाहता जिद्द, परिश्रम आणि तपश्चर्येच्या जोरावर कठीण असे एव्हरेस्ट शिखर पार केले. अशोक रामलाल मुन्ने (३२) असे या ध्येयवेड्या आणि चिकाटी असलेल्या तरुणाचे नाव असून तो मुळचा मूर्ती (ता. काटोल, जि. नागपूर) येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे, अपंग म्हणून एव्हरेस्ट सर करणारा अशोक हा भारतातील दुसरा व्यक्ती आहे.
 
अशोक हा तसा जन्मत: सर्वसामान्यच. मात्र २००८ मध्ये रेल्वेने प्रवास करीत असताना तो खाली पडला. त्यात तो गंभीररीत्या जखमी झाल्याने हॉस्पिटलध्ये भरती केले. तेथील डॉक्टरांनी त्याचा पाय कापण्याचा सल्ला दिला. त्यानुसार पाय कापावा लागला. हॉस्पिटलमधून सुटी झाली आणि जणू पुनर्जन्म झालेलाच अशोक परतला. जिद्द, आत्मविश्वास अंगी बाळगलेल्या अशोकने आपणही इतरांसारखे सर्वसामान्य जीवन जगत सर्वांपेक्षा काही हटके करण्याचा दृढनिश्चय केला. त्याचवेळी म्हणजे २००९ मध्ये कृष्णा पाटीलने एव्हरेस्ट शिखर सर केले. ही बातमी त्याच्या कानावर पडताच त्यानेही ‘एव्हरेस्ट’ सर करण्याचा ‘इरादा पक्का’ केला. 
 
(औरंगाबादच्या पोलिस कॉन्स्टेबलने सर केले ' एव्हरेस्ट शिखर')
 
अपंग असल्याने ब-याच अडचणी येणार याची कल्पना असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी त्याने मार्शल आर्ट कराटे ट्रेनिंग करून ब्लॅक बेल्ट प्राप्त केले. सायकल चालविणे, सुरवातीला दोन नंतर सहा किमीपर्यत दौड, मोटारसायकल चालविणे, कार, ट्रॅक्टर चालविणे अशी सर्वसामान्यांशी निगडित दिनचर्या त्याने सुरू ठेवली. अपंगत्व आल्यामुळे रोजगार नाही; मात्र एका वीटभट्टीवर बेरोजगारासारखा जाऊन तेथील मालकाशी मैत्री वाढवून या व्यवसायाचे ज्ञान प्राप्त केले. यानंतर अशोकनेही स्वत:ची वीटभट्टी सुरू केली. इथवरच तो थांबला नाही, तर शेतात राबून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले. याच काळात त्याने इच्छेची पूर्तता करण्यासाठी मूर्ती या गावाजवळच्या आनंदगड (चिखलागड) या टेकडीवर चढणे सुरू केले. त्यात त्याला यशही आले. 
 
गावाजवळच्या मोठ्या टेकडीवर चढल्यामुळे अशोकचा आत्मविश्वास वाढला. यामुळेच त्याने सातपुडा पर्वतातील सर्वात कठीण चढाई असलेला निशानगड चढण्याचा मनोदय ठरविला. यानुसार त्याने ऑगस्ट २०१० आणि ऑगस्ट २०११ मध्ये तो पर्वत पार केला. जगावेगळे काहीतरी करण्याच्या ध्येयाने झपाटलेल्या या तरुणाने नंतर निशानगडनजीकचा ४५ किमी परिसर पायी पिंजून काढला. तसेच कार नदी प्रकल्पाची ६५ अंश कोनातील भिंतीची चढाई केली. २९ ऑक्टोबर २०११ रोजी पातालकोट (मध्यप्रदेश) जंगलातील ७० किमी परिसर आणि पहाड फिरला. यानंतर त्याच वर्षी १५ नोव्हेंबरला महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कळसूबाई (१६४६ मीटर) सर केले. अशोकला जिम्नॅस्टिक, स्विमिंग, माउंटेनिंग, मार्शल आर्ट (कराटे), अ‍ॅडव्हेंचर, रॉक क्लायमिंग, योगा आदींमध्ये आवड आहे. 
 
(महाराष्ट्र कॅडर चे IPS अधिकारी सुहेल शर्मा एन्हरेस्टवर)
 
अपंगांमध्ये अशोक भारतातून दुसरा
आशिया खंडातून अशोक मुन्ने याच्यापूर्वी नेपाळचा सुदर्शन गौतम (२० मे २०१३) आणि भारताची अरुनिमा सिन्हा (२१ मे २०१३) या अपंग व्यक्तींनीही माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केले. अरुनिमानंतर एव्हरेस्टवर जाणारा भारतातील तो दुसरा असून पुरुषांमध्ये पहिला आहे. सुदर्शन गौतमने ५७३२ मीटर, अरुनिमाने ८८४८ मीटर तर अशोकने ८५०० मीटर उंच शिखर पार केले.
 
 
निसर्गाची आडकाठी; तरीही मिशन फत्ते!
जगातील सर्वात उंच शिखर असलेल्या एव्हरेस्टवर चढण्याचा बेत अशोकने २०१२ मध्येच केला होता. ‘१२-१२-१२’ असा योग साधून त्याने ‘मिशन एव्हरेस्ट’ सर करण्याचे ठरविले होते. मात्र त्यावेळी त्याचे प्रशिक्षण पूर्ण झालेले नव्हते. कमी तापमानात राहण्यासाठीही तो परिपक्व नव्हता. त्यामुळे १२-१२-१२ चा योग जुळून आला नाही. त्यानंतर तीन वर्षांआधीही त्याने नियोजन केले होते. परंतु महाप्रलय आल्याने त्याला अपयश आले. मात्र निसर्गाच्या आडकाठीने अपयशी न होता त्याचा संघर्ष सुरूच होता. अखेर २०१६ मध्ये त्याने एव्हरेस्ट सर करून सर्वांना आश्चर्यकारक आणि सुखद असा धक्का दिला. 
 
आर्थिक मदतीसाठी ‘लोकमत’चा पुढाकार
एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी किमान ३२ लाखांचा खर्च अपेक्षित होता. यासाठी त्याने अनेकांची दारे ठोठावली. बºयाच ठिकाणी त्याचा अपेक्षाभंग झाला. याचदरम्यान त्याचा हा संघर्ष ‘लोकमत’ने जगासमोर आणला आणि पाहता - पाहता त्याला आर्थिक मदतीचा ओघ सुरू झाला. याबद्दल त्याने ‘लोकमत’चे आभार मानले होते. या मदतीनेच त्याला एव्हरेस्ट सर करण्यासाठी हातभार लागला.