शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मांसाहारी लोकांना घर नाकारल्यास कारवाई - मनपाचा निर्णय

By admin | Updated: November 27, 2014 19:41 IST

मुंबई व मुंबईच्या उपनगरांमध्ये मांसाहारी लोकांना घरं नाकारण्यात येत होती. शाकाहारी लोकांना मांसाहाराचा वास सहन होत नाही अशी कारणं देत सर्रास घरं नाकारली जात.

 

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २७ - मुंबई व मुंबईच्या उपनगरांमध्ये मांसाहारी लोकांना घरं नाकारण्यात येत होती. शाकाहारी लोकांना मांसाहाराचा वास सहन होत नाही अशी कारणं देत सर्रास घरं नाकारली जात. परंतू, या घटनेची दखल मनसेने घेत याबाबत पालिकेत प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला आज (गुरुवारी) पालिकेने सहमती दर्शवली असून बांधकाम व्यावसायिकांनी यापुढे मांसाहारी लोकांना घर नाकारणा-या बिल्डरांचा परवाना रद्द केला जाईल असा आदेश जारी केला आहे. या प्रस्तावाला शिवसेना व काँग्रेसने पाठिंबा दिला असून भाजपाने मात्र या प्रस्तावाला विरोध दर्शवला आहे. 
मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये बहूतांश मराठी मंडळी ही मासाहार करणारी आहेत. त्यांना मुंबईत घर घ्यायचे झाले असता ऐपत असूनही ते घेता येत नव्हते, बांधकाम व्यावसायिक त्यांना मासाहारी असल्याचे कारण देत घर नाकारत असत.फक्त शाकाहारी असणा-या लोकांनाच घरं विकत घेता येत. अनेक मराठी लोकांना या जाचक नियमाचा त्रास होत होता. अखेर पालिकेने या घटनेची दखल घेत बांधकाम व्यावसायिकांनी जर मांसाहारी लोकांना घर विकण्यास नकार दिला तर त्यांच्या इमारतीचा परवाना रद्द केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.