शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

कुपोषण निर्मूलनाची अजब तऱ्हा !

By admin | Updated: January 25, 2015 01:16 IST

राज्य शासन आदिवासींची कशी थट्टा करते, याचा प्रत्यय कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या फळबाग व भाजीपाला लागवड योजनेतून आला आहे़

आदिवासींतील कुटुंबे ६़२६ लाख : मात्र निधी मिळाला अवघा ६ लाखनारायण जाधव- ठाणेठाणे-पालघरसह राज्यातील १२ आदिवासीबहुल जिल्ह्यांतील कुपोषण निर्मूलनाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असताना यावर ठोस उपाययोजनेऐवजी राज्य शासन आदिवासींची कशी थट्टा करते, याचा प्रत्यय कृषी विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या फळबाग व भाजीपाला लागवड योजनेतून आला आहे़राज्यात ६ लाख २६ हजार ५२४ आदिवासी कुटुंबे असून, परसबागेत फळबाग आणि भाजीपाला लागवड करण्यास राज्य शासनाने अवघा सहा लाखांचा निधी नववर्षाच्या सुरुवातीस वितरीत केला आहे़ प्रत्येक जिल्ह्याच्या वाट्याला ५० हजार, तर आदिवासी कुटुंबाच्या वाट्याला प्रत्येकी एक हजारपेक्षा कमी रक्कम येणार आहे़ यातून कोणत्या प्रकारे आदिवासींचे कुपोषण निर्मूलन होऊ शकते, असा प्रश्न आता आदिवासींकडून विचारण्यात येत आहे़ राज्यातील ठाणे, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर आणि अमरावती या १२ जिल्ह्यांकरिता २००३ पासून ही योजना सुरू केली आहे़ आदिवासींमधील कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास आहारात जीवनसत्त्व व इतर आवश्यक पोषकद्रव्ये उपलब्ध करणे, हा तिचा उद्देश आहे़ गेल्या वर्षी कृषी विभागाने या योजनेसाठी आठ लाख रुपये दिले होते़ यंदा त्यात दोन लाखांची कपात करून अवघे सहा लाख रुपयेच कृषी आयुक्तांकडे वर्ग केले आहेत़ यामुळे फळे, भाजीपाला आदिवासींच्या आहारात कसे येणार? कोणत्या प्रकारची फळे, भाजीपाला कुपोषण निर्मूलनास आवश्यक आहेत, हे आदिवासींपर्यंत कसे पोचविणार? लागवडीनंतरही ते खरोखरच त्यांचा उपभोग घेतात की नाही, हे सारे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत़ विशेष म्हणजे हा निधी कृषी विभागाने आदिवासी विकास विभागाशी सल्लामसलत करून वितरीत केला आहे़ या पार्श्वभूमीवर आता सव्वासहा लाखांवर आदिवासी कुटुंबांना प्रत्येकी एक हजारापेक्षा कमी निधी देऊन (प्रशासकीय खर्च नाहीच असे गृहीत धरले तर) कृषी विभाग त्यांची परसबागेत कोणती फळे व भाजीपाला पिकविणार अन् आदिवासी विकास विभाग त्यांचा कसा उत्कर्ष साधणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे़राज्यात कुपोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे, हे पाहायचे झाल्यास तीन वर्षांपूर्वी सरकारने केलेल्या आरोग्य तपासणीत जानेवारी २०१२ अखेरपर्यंत राज्यात तब्बल १० लाख ६७ हजार ६५९ कुपोषित बालके आढळली होती़नऊ लाख ४३ हजार २१८ मध्यम कुपोषित, तर एक लाख २४ हजार ४४१ तीव्र कुपोषित बालकांचा समावेश होता़ धक्कादायक बाब म्हणजे यापैकी २४ हजार ३६५ बालमृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली होती़ यात आदिवासी भागांतील बालकांची संख्या मोठी होती़ मात्र हे मृत्यू कुपोषणाने झाले नसून कॅल्शिअमची कमतरता, अ‍ॅनिमिया, न्यूमोनिया, श्वसन विकार अन् डायरियामुळे झाल्याचे तेव्हा शासनाने सांगितले होते़