शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

आजीबार्इंनी बनविली ८६ वर्षांची दिनदर्शिका

By admin | Updated: August 30, 2016 03:02 IST

मीरारोड येथे राहणाऱ्या ९० वर्षांच्या हिराबाई आबासाहेब निकम (माई) यांनी २१०१ पर्यंतची दिनदर्शिका हाताने लिहून काढली आहे.

नवी मुंबई : मीरारोड येथे राहणाऱ्या ९० वर्षांच्या हिराबाई आबासाहेब निकम (माई) यांनी २१०१ पर्यंतची दिनदर्शिका हाताने लिहून काढली आहे. पुढील ८६ वर्षांतील कोणत्या तारखेला कोणता वार असणार हे त्या तत्काळ सांगू शकतात. प्रत्येक नातेवाइकांचे मोबाइल नंबर या वयातही तोंडपाठ आहेत. सातारा जिल्ह्यातील सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या अपशिंगेमधील या आजीबार्इंना ९ दशकातील प्रत्येक घटना मुखोद्गत असून त्यांची स्मरणशक्ती पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. गावातील प्रत्येक घरातील किमान एकतरी तरुण देशाच्या संरक्षणासाठी सैन्यदलात भरती झालेला आहे. स्वातंत्र्यापासून प्रत्येक युद्धात अपशिंगे गावातील सैनिकांचा सहभाग आहे, असे माई अभिमानाने सर्वांना सांगत असतात. २८ आॅगस्टला त्यांना ९० वर्षे पूर्ण झाली. या वयातही त्यांची स्मरणशक्ती उत्तम आहे. घरातीलच नाही तर सर्व नातेवाइकांचे मोबाइल नंबर त्यांच्या मुखोद्गत आहेत. अनेकांना स्वत:च्या नंबर व्यतिरिक्त इतर कोणाचाही नंबर लक्षात ठेवता येत नाही. परंतु वृद्धापकाळातही एवढी स्मरणशक्ती असल्यामुळे माई सर्वांच्याच कौतुकाचा विषय बनला आहे. वाचन व लिखाणासह चित्रकलेचा छंद त्यांनी जोपासला आहे. सहज म्हणून पुढील काही वर्षांची दिनदर्शिका हाताने लिहून काढण्यास सुरवात केली व तब्बल २१०१ पर्यंतची दिनदर्शिका तयार केली आहे. या कालावधीत कधी कोणता वार असणार हे त्या काही क्षणात सांगू शकतात. प्रत्येकाचा वाढदिवस व माहिती त्यांच्या दिनदर्शिकेमध्ये पाहता येते. स्वत:चे हस्तलिखित असलेल्या दिनदर्शिकेला लॅमिनेशन करून त्यांनी जपून ठेवल्या आहेत. त्यांचा हा छंद सर्वांच्या कौतुकाचा विषय बनला आहे. भविष्यातील ८६ वर्षांची दिनदर्शिका तयार करणाऱ्या मार्इंना भूतकाळातील ९ दशकामधील प्रत्येक महत्त्वाची घटना लक्षात आहे. लहानपणी महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील, यशवंतराव चव्हाण, आचार्य अत्रे, इंदिरा गांधी यांची ऐकलेली भाषणे व त्या कार्यक्रमांचे प्रसंग कालच घडल्याप्रमाणे त्या सांगतात. पती सैन्यात असल्यामुळे त्यांच्याकडून ऐकलेल्या व उत्तर भारतात वास्तव्यास असताना अनुभवलेल्या युद्धाच्या कथा, प्रसंग व इतर घडामोडीही त्यांच्या लक्षात आहेत. युद्धाच्या कथा सांगताना त्यांचा उत्साह ओसांडून वाहत असतो. बाहेर फिरण्यासाठी गेल्यानंतर पाहिलेली वास्तू व इतर घटना कागदावर चित्राद्वारे रेखाटण्याचा छंदही त्या जोपासत आहेत. ९० वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्यांना कधीच औषध घ्यावे लागले नाही. काठीचा आधार न घेता चालू शकतात.