शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

७० टक्के पाणीपट्टी अनिवार्य

By admin | Updated: May 8, 2016 03:48 IST

राज्यात जिल्हा परिषदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील बंद पडलेल्या योजनांसाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी देतानाच या योजना पुनरुज्जीवित झाल्यानंतर

- यदु जोशी, मुंबई

राज्यात जिल्हा परिषदा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील बंद पडलेल्या योजनांसाठी पहिल्या टप्प्यात १३० कोटी रुपयांचा निधी देतानाच या योजना पुनरुज्जीवित झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींकडून पाणीपट्टीची वसुली दरमहा किमान ७० टक्के झाली नाही, तर पाणीपुरवठा बंद करण्यात येणार आहे. ग्रामीण पाणीपुरवठ्याच्या नवीन योजना हाती घेणे, बंद योजनांचे पुनरुज्जीवन आणि प्रादेशिक ग्रामीण पाणीपुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती ही त्रिसूत्री असलेल्या मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमाचा आदेश शासनाने शनिवारी जारी केला. पाणीपट्टीची वसुली दरमहा ७० टक्के न झाल्यास पाणीपुरवठा बंद करण्यात येईल आणि आम्हाला या योजनेतून वगळले जाईल, असा ठरावच आता ग्रामपंचायतींकडून/ग्राम सभेकडून करून घेण्यात येणार आहे. या योजनांच्या देखभाल, दुरुस्तीची आणि त्या चालविण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणाकडे देण्यात आली आहे. या कार्यक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांना प्रशासकीय मान्यता देण्याचे कोणतेही अधिकार ग्रामसभा वा ग्राम पंचायतींकडे नसतील. हे अधिकार पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला असतील. स्वतंत्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या तांत्रिक मान्यतेचे अधिकार तिच्या खर्चानुसार जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांना असतील. ज्या योजनांना यापूर्वी राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमामधून मान्यता देण्यात आलेली आहे व ज्या योजनांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत अशा योजनांचे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमामधील प्रशासकीय मान्यतेचे आदेश रद्द करण्यात येतील. अशांना मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमामधून नव्याने प्रशासकीय मान्यता देण्यात येणार आहे. कार्यक्रमातील सर्व कामे ही ई-टेंडरद्वारेच करण्यात येणार आहेत. योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार शासनाकडे प्राप्त झाली व त्यामध्ये तथ्य आढळून आले तर संपूर्ण योजना रद्द करण्याचे अधिकार राज्य शासनाला असतील. अनियमिततेस जबाबदार अधिकारी/कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. पाणीपुरवठ्याची कोणतीही योजना जास्तीतजास्त २४ महिन्यांच्या आत वेळापत्रकानुसार पूर्ण होईल.तीन टप्प्यांत देणार निधी- नवीन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा परिषद किंवा जीवन प्राधिकरणास चार टप्प्यांमध्ये निधी दिला जाईल.- योजना मंजूर झाल्यानंतर ३० टक्के रक्कम, योजनेचे काम ३० टक्के पूर्ण झाल्यानंतर ३० टक्क्यांचा दुसरा हप्ता, काम ६० टक्के पूर्ण झाल्यानंतर ३० टक्के रकमेचा तिसरा हप्ता आणि योजना पूर्ण होऊन ती पुढील एक वर्ष यशस्वीपणे चालविल्यानंतर १० टक्क्यांचा चौथा हप्ता दिला जाईल. - मोबिलायझेशन अ‍ॅडव्हान्स हा प्रकार बंद करण्यात आला आहे. कामे सुरू होण्याआधीच कंत्राटदारांना हा अ‍ॅडव्हान्स देण्याची पूर्वीच्या आघाडीच्या सरकारची पद्धत भ्रष्टाचाराच्या मुळाशी होती.कंत्राटदारांना पळणे कठीण- आघाडी सरकारच्या काळात अनेक ठिकाणी कंत्राटदार पाणीपुरवठा योजना अर्धवट टाकून पळून गेले. योजनांची कामे रखडली. - या पूर्वानुभवानंतर आता स्वतंत्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असेल. योजना अंमलात आल्यानंतर किमान तीन वर्षे ही योजना चालविणे कंत्राटदारांवर बंधनकारक असेल. दरडोई ४० लीटर पाणीया कार्यक्रमांतर्गत राज्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांना दररोज दरडोई ४० लीटर पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट आहे.