शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

पहिल्या फेरीत ६,५०० प्रवेश

By admin | Updated: July 23, 2014 00:53 IST

बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया : महाविद्यालयांची चिंता वाढलीनागपूर : बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे. पहिल्या फेरीत नागपूर विभागातील केवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे तसेच बाहेरील महाविद्यालयांना प्राधान्य दिल्यामुळे, महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या ‘कॅप’ची दुसरी फेरी सुरू आहे. परंतु पहिल्या फेरीत महाविद्यालये ‘अलॉट’ होऊनदेखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाही. निवडक आठ महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी प्रवेशाचा दुष्काळच आहे. विभागातील काही महाविद्यालयांमध्ये तर एकही प्रवेश झाला नसल्याची माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली आहे. विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २५,०५२ जागा आहेत. ‘आॅनलाईन’ प्रक्रियेत केवळ १७,१९६ म्हणजेच सुमारे ७० टक्के अर्ज दाखल झाले होते. पहिल्या फेरीत यापैकी जवळपास ६,५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत; म्हणजे अजूनही ७४ टक्के जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी ‘अलॉट’ झालेल्या जागेवर प्रवेश घेतलेच नाही. दुसऱ्या फेरीकडून त्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत, अशी माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा कारणीभूतनिवडक नावे सोडली तर नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा ढासळतो आहे. त्यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची छबीदेखील फारशी चांगली नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यापीठात सुरू असलेले निरनिराळे वाद आणि गोंधळांमुळे प्रतिमा आणखी डागाळली आहे. शिवाय अभियांत्रिकीच्या मूल्यांकनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. त्यातून गेल्या दोन वर्षांत अनेकदा आंदोलनेदेखील झाली. ही बाब लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांनी बाहेरील विद्यापीठात प्रवेश घेण्यासच प्राधान्य दिले व पर्यायाने विभागातील महाविद्यालयांना याचा फटका बसताना दिसतो आहे.