शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

पहिल्या फेरीत ६,५०० प्रवेश

By admin | Updated: July 23, 2014 00:53 IST

बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया : महाविद्यालयांची चिंता वाढलीनागपूर : बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अ‍ॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे. पहिल्या फेरीत नागपूर विभागातील केवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे तसेच बाहेरील महाविद्यालयांना प्राधान्य दिल्यामुळे, महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या ‘कॅप’ची दुसरी फेरी सुरू आहे. परंतु पहिल्या फेरीत महाविद्यालये ‘अलॉट’ होऊनदेखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाही. निवडक आठ महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी प्रवेशाचा दुष्काळच आहे. विभागातील काही महाविद्यालयांमध्ये तर एकही प्रवेश झाला नसल्याची माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली आहे. विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २५,०५२ जागा आहेत. ‘आॅनलाईन’ प्रक्रियेत केवळ १७,१९६ म्हणजेच सुमारे ७० टक्के अर्ज दाखल झाले होते. पहिल्या फेरीत यापैकी जवळपास ६,५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत; म्हणजे अजूनही ७४ टक्के जागा रिक्त आहेत. अनेक विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी ‘अलॉट’ झालेल्या जागेवर प्रवेश घेतलेच नाही. दुसऱ्या फेरीकडून त्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत, अशी माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा कारणीभूतनिवडक नावे सोडली तर नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा ढासळतो आहे. त्यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची छबीदेखील फारशी चांगली नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यापीठात सुरू असलेले निरनिराळे वाद आणि गोंधळांमुळे प्रतिमा आणखी डागाळली आहे. शिवाय अभियांत्रिकीच्या मूल्यांकनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. त्यातून गेल्या दोन वर्षांत अनेकदा आंदोलनेदेखील झाली. ही बाब लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांनी बाहेरील विद्यापीठात प्रवेश घेण्यासच प्राधान्य दिले व पर्यायाने विभागातील महाविद्यालयांना याचा फटका बसताना दिसतो आहे.