शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

विदर्भात ४८ % कापूस शेतक-यांकडून तणनाशकांचा वापर!

By admin | Updated: September 17, 2014 02:58 IST

कृषी विद्यापीठाचा निष्कर्ष:नुकसान टाळण्यासाठीचा पर्याय; मजूर टंचाईवरील नवा उपाय.

अकोला : कापसाचे नुकसान टाळण्यासाठी विदर्भातील ४८ टक्के कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर केला आहे. वाढते तण आणि मजुरांची टंचाई यावर उपाय म्हणून शेतकरी तणनाशकांचा वापर करीत असल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत.कापसामध्ये पीक तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी पेरणीनंतरच्या २0 ते ६0 दिवसांचा आहे. या कालावधीत तणाचे नियंत्रण न केल्यास कापूस उत्पादनात लक्षणीय घट होते. राज्यातील कापसाच्या एकूण क्षेत्रापैकी अर्धेअधिक क्षेत्र विदर्भात आहे. खरीप हंगामात कापूस व इतर सर्व पिकांची पेरणी एकाचवेळी केली जाते. त्या तुलनेत मजूर मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्याप्रवण विदर्भातील सहा जिल्हय़ांतील शेतकरी त्रस्त आहेत. म्हणूनच कापूस उत्पादक शेतकर्‍यांनी तणनाशकांचा वापर सुरू केला आहे; परंतु या शेतकर्‍यांपैकी किती टक्के शेतकरी तणनाशके वापरतात, कोणती व कशी वापरतात, याची अधिकृत व अचूक माहिती आतापर्यंत उपलब्ध नव्हती. यासाठी कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून तणनाशकांचा वापर या शास्त्रीय संशोधन प्रकल्पाचे सर्वेक्षण डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यावर्षी पूर्ण केले असून, अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती व वर्धा या सहा जिल्ह्यांतील ४८ टक्के कापूस उत्पादक शेतकरी तणनाशकांचा वापर करीत असल्याचे निष्कर्ष काढले आहेत. या अभ्यासासाठी शास्त्रज्ञांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर, बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा, वाशिम जिल्ह्यांतील कारंजा लाड, अमरावती जिल्ह्यांतील अंजनगाव सुर्जी, यवतमाळ जिल्ह्यांतील नेर व वर्धा जिल्ह्यांतील देवळी या तालुक्यातील गावे व तेथील कापूस पिकाचा अभ्यास केला आहे.** अभ्यासाअंती केलेल्या शिफारशीराज्य शासनाच्या कृषी विभागाने पेरणीपूर्व तणनाशकाविषयी प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रात्यक्षिके घ्यावीत. तणनाशकांच्या वापराविषयीची छापील सामुग्री तयार करण्यासाठी कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांची मदत घ्यावी व त्या तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यामंध्ये प्रचार व प्रसार करावा. त्यामुळे शेतकर्‍यांना तणनाशकाचे तांत्रिक ज्ञान मिळेल आणि प्रभावी तणनियत्रंण होण्यास मदत होईल, अशी शिफारस डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केली आहे. या प्रकल्पात डॉ. काळे यांच्यासह विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. डी.एम. मानकर , डॉ.पी.पी. वानखडे, डॉ.जे.पी. देशमुख यांनी काम पाहिले. सहा आत्महत्याप्रवण जिल्ह्यांत कापूस पिकासाठी वापरण्यात येणार्‍या तणनाशकांचा सूक्ष्म अभ्यास केला आहे. २00९-१0 मध्ये कापूस उत्पादक शेतकरी केवळ ३ टक्के तणनाशकांचा वापर करीत होते. ते प्रमाण आता ४८ टक्क्यांपर्यंंत पोहोचले आहे. यासाठी कृषी विद्यापीठाने अभ्यास करून राज्य शासनाकडे शिफारशी केल्या आहेत, असे कृषी विद्यापीठातील कापूस तणनाशक प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. एन.एम. काळे यांनी सांगितले.