शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या ४० कोटींच्या ठेवी बुडाल्या

By admin | Updated: May 12, 2014 03:35 IST

पेणच्या २४ गावांतील शेतकर्‍यांनी सेझ प्रकल्पाला शेतजमिनी विकून आलेल्या पैशांची गुंतवणूक जादा व्याजाच्या मोहापायी पेण अर्बनमध्ये केली होती.

पेण : पेणमध्ये २००६ साली सेझ प्रकल्पासाठी शासनातर्फे भूसंपादन करण्याची रिलायन्स कंपनीला परवानगी मिळाल्यानंतर पेणच्या २४ गावांतील शेतकर्‍यांनी सेझ प्रकल्पाला शेतजमिनी विकून आलेल्या पैशांची गुंतवणूक जादा व्याजाच्या मोहापायी पेण अर्बनमध्ये केली. त्या शेतकर्‍यांच्या तब्बल ४० कोटींच्या ठेवी बँक दिवाळखोरीत गेल्याने बुडाल्याने पैसेही गेले व जमिनीही गेल्या, अशा भीषण आर्थिक संकटाचा सामना भविष्यात या शेतकर्‍यांना करावा लागणाार आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबाचे चरितार्थाचे साधनच गेल्याने तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी परिस्थिती या शेतकरीवर्गावर ओढवली आहे. महामुंबई एसईझेडच्या भूलभुलैयात अडकलेल्या शेतकर्‍यांनी जादा व्याजाच्या हव्यासापोटी आपले पैसे पेण अर्बनमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवले. एवढे पैसे घरात ठेवण्यापेक्षा बँकेत गुंतवणूक करून महिन्याकाठी या ठेवीवर येणार्‍या व्याजातून दरमहा कुटुंबाचा चरितार्थ चालेल, अशा वेड्या आशेपायी हा पैसा ठेवीच्या स्वरूपात गुंतवला, तर दुसरीकडे याच काळात सेझ प्रकल्प येऊन नोकरी, कामधंदा मिळेल त्यातूनही पैसे मिळतील, असे या शेतकर्‍यांचे नियोजन होते. पण, काळाचा महिमा, गणित वेगळेच होते़ २००८ ते २००९ या कालखंडात या ठेवी ठेवल्या़ २००९ मध्ये सेझ हद्दपार झाला तर २३ सप्टेंबर २०१० मध्ये अर्बनला टाळे लागले. जेमतेम वर्षभर या ठेवीवर व्याज घेणारे शेतकरी २३ सप्टेंबर २०१० रोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्याने हादरले़ ते आजपर्यंत सावरलेच नाहीत. बँक आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवणारा शेतकरी अखेर जमीनदोस्त झाला आणि भविष्यात वेडाही होईल, इतका मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. सेझ प्रकल्पातील दादर-रावे, कळवे, जोहे, सोखार, उर्णोली या गावांतील शेतकर्‍यांच्या २२ कोटींच्या ठेवी तर वाशी खारेपाटातील मोठे भाल, विठ्ठलवाडी कणे, बोर्जे, वाशी, ओढांगी, वढाव, मोठेवढाव, काळेश्री, नाखेल, बेणवले, बहिराम कोटक, दिव, कान्होबा, जनवली, लाखोले, मळेघरवाडी, मंत्रीवाडी, पैरणकरवाडी या गावांतील शेतकर्‍यांच्या १८ कोटींच्या ठेवी अशा ४० कोटींच्या ठेवी संकटाच्या बँक घोटाळ्यातील दिवाळखोरीत बुडाल्या आहेत. कामधंद्यासाठी शेती हे एकमेव साधन असलेल्या या शेतकर्‍यांचा सातबारा सेझ प्रकल्पाच्या नावावर झाल्याने प्रकल्पही गेला आणि पैसेही गेले़ आज पैसे गेले, उद्या जमिनीचा ताबा जाणाऱ खायचे काय, या घोर आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. (वार्ताहर)