शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या पिथोरागडमध्ये जीप नदीत कोसळली; ८ प्रवाशांचा जागीत मृत्यू, गाडीच्या शेजारी पडले मृतदेह
2
"अनेक दिग्गज नेते प्रदेशाध्यक्ष पदासाठी..."; पहिल्याच भाषणात शशिकांत शिंदेंची रोखठोक भूमिका, काय म्हणाले?
3
Pune Porsche Car Accident: मुलाला 'प्रौढ' ठरवून खटला चालविण्याचा पोलिसांचा अर्ज फेटाळला; बाल न्याय मंडळाचा अल्पवयीन मुलास दिलासा
4
सिराजची विकेट अन् बरंच काही! गिलनं शेअर केली किंग चार्ल्स यांच्यासोबतच्या भेटीतील खास गोष्ट (VIDEO)
5
निमिषा प्रियाची फाशी टाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे ९४ वर्षीय मुस्लीम धर्मगुरू कोण? कुठे आणि कशी झाली चर्चा?
6
सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्याच्या नादात तरुणी गेल्या तुरुंगात, अख्खा गाव विरोधात, नेमका प्रकार काय?   
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
9
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
10
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
11
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
12
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
13
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
14
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
15
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
16
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
17
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
18
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
19
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
20
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण

शेतकर्‍यांच्या ४० कोटींच्या ठेवी बुडाल्या

By admin | Updated: May 12, 2014 03:35 IST

पेणच्या २४ गावांतील शेतकर्‍यांनी सेझ प्रकल्पाला शेतजमिनी विकून आलेल्या पैशांची गुंतवणूक जादा व्याजाच्या मोहापायी पेण अर्बनमध्ये केली होती.

पेण : पेणमध्ये २००६ साली सेझ प्रकल्पासाठी शासनातर्फे भूसंपादन करण्याची रिलायन्स कंपनीला परवानगी मिळाल्यानंतर पेणच्या २४ गावांतील शेतकर्‍यांनी सेझ प्रकल्पाला शेतजमिनी विकून आलेल्या पैशांची गुंतवणूक जादा व्याजाच्या मोहापायी पेण अर्बनमध्ये केली. त्या शेतकर्‍यांच्या तब्बल ४० कोटींच्या ठेवी बँक दिवाळखोरीत गेल्याने बुडाल्याने पैसेही गेले व जमिनीही गेल्या, अशा भीषण आर्थिक संकटाचा सामना भविष्यात या शेतकर्‍यांना करावा लागणाार आहे. त्यामुळे त्यांचे कुटुंबाचे चरितार्थाचे साधनच गेल्याने तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाटणे आले, अशी परिस्थिती या शेतकरीवर्गावर ओढवली आहे. महामुंबई एसईझेडच्या भूलभुलैयात अडकलेल्या शेतकर्‍यांनी जादा व्याजाच्या हव्यासापोटी आपले पैसे पेण अर्बनमध्ये ठेवीच्या स्वरूपात ठेवले. एवढे पैसे घरात ठेवण्यापेक्षा बँकेत गुंतवणूक करून महिन्याकाठी या ठेवीवर येणार्‍या व्याजातून दरमहा कुटुंबाचा चरितार्थ चालेल, अशा वेड्या आशेपायी हा पैसा ठेवीच्या स्वरूपात गुंतवला, तर दुसरीकडे याच काळात सेझ प्रकल्प येऊन नोकरी, कामधंदा मिळेल त्यातूनही पैसे मिळतील, असे या शेतकर्‍यांचे नियोजन होते. पण, काळाचा महिमा, गणित वेगळेच होते़ २००८ ते २००९ या कालखंडात या ठेवी ठेवल्या़ २००९ मध्ये सेझ हद्दपार झाला तर २३ सप्टेंबर २०१० मध्ये अर्बनला टाळे लागले. जेमतेम वर्षभर या ठेवीवर व्याज घेणारे शेतकरी २३ सप्टेंबर २०१० रोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध लादल्याने हादरले़ ते आजपर्यंत सावरलेच नाहीत. बँक आज सुरू होणार, उद्या सुरू होणार, मंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या तसेच केंद्रीय मंत्र्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवणारा शेतकरी अखेर जमीनदोस्त झाला आणि भविष्यात वेडाही होईल, इतका मोठा आर्थिक फटका त्यांना बसला आहे. सेझ प्रकल्पातील दादर-रावे, कळवे, जोहे, सोखार, उर्णोली या गावांतील शेतकर्‍यांच्या २२ कोटींच्या ठेवी तर वाशी खारेपाटातील मोठे भाल, विठ्ठलवाडी कणे, बोर्जे, वाशी, ओढांगी, वढाव, मोठेवढाव, काळेश्री, नाखेल, बेणवले, बहिराम कोटक, दिव, कान्होबा, जनवली, लाखोले, मळेघरवाडी, मंत्रीवाडी, पैरणकरवाडी या गावांतील शेतकर्‍यांच्या १८ कोटींच्या ठेवी अशा ४० कोटींच्या ठेवी संकटाच्या बँक घोटाळ्यातील दिवाळखोरीत बुडाल्या आहेत. कामधंद्यासाठी शेती हे एकमेव साधन असलेल्या या शेतकर्‍यांचा सातबारा सेझ प्रकल्पाच्या नावावर झाल्याने प्रकल्पही गेला आणि पैसेही गेले़ आज पैसे गेले, उद्या जमिनीचा ताबा जाणाऱ खायचे काय, या घोर आर्थिक संकटाचा सामना त्यांना करावा लागणार आहे. (वार्ताहर)