शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

राज्यात 20 हजार गावे पोलीस पाटलांविना!

By admin | Updated: June 22, 2014 02:10 IST

पोलीस पाटलांची राज्यभरात 2क् हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. पर्यायाने गावचा कारभार ढेपाळला आहे.

राजेश निस्ताने - यवतमाळ
पोलीस पाटलांची राज्यभरात 2क् हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. पर्यायाने गावचा कारभार ढेपाळला आहे. गाव आणि प्रशासनातील समन्वयच यामुळे संपुष्टात आला आहे. पोलिसांनाही गावात आधार मिळेनासा झाला आहे. 
पोलीस पाटील या पदालाच सध्या ग्रहण लागले आहे. आजघडीला राज्यात पोलीस पाटलांची 4क् हजारांपैकी सुमारे 2क् हजारांवर पदे रिक्त आहेत. राज्यात 27 हजार ग्रामपंचायती आणि त्याच्या दुप्पट खेडय़ांची संख्या आहे. या प्रत्येकच खेडय़ात पोलीस पाटील असणो बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात अध्र्या गावांना पोलीस पाटीलच नाही. पूर्वी पोलीस पाटील भरतीचे अधिकार उपविभागीय दंडाधिका:यांकडे होते. काही वर्षापूर्वी हे अधिकार मंत्रलयात घेतले गेले. पोलीस पाटलांची पदे रिक्त झाली की त्याची माहिती मंत्रलयात द्यायची आणि त्यानंतर तेथून भरतीची परवानगी दिली जाईल, अशी पद्धत आहे. रिक्त पदांबाबत मंत्रलयात अहवाल गेले आहेत, मात्र अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.     
 
यवतमाळ : गेल्या पाच वर्षापासून (सन 2क्1क्) पोलिस पाटील भरतीची परवानगी मंत्रलयातून मिळालेली नाही. यापूर्वी एकदा 4क् टक्के तर एकदा 5क् टक्के पदे भरली गेली. मात्र  रिक्त जागांमुळे आज एका पोलीस पाटलाकडे चार ते पाच गावांचा कारभार सोपविला गेला आहे. 
गावात पोलीस पाटीलच उपलब्ध नसल्याने सर्वाधिक अडचण पोलीस प्रशासनाची होते आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यासाठी गावातील कुणी पुढाकार घेत नाही. गावातील सामाजिक, राजकीय वातावरण, नेत्यांच्या भेटी, कायदा व सुव्यवस्था याबाबतचे गोपनीय अहवाल प्रशासनाला मिळेनासे झाले आहेत. गावक:यांना पोलीस पाटलाच्या दाखल्यासाठी वणवण फिरावे लागते. पोलीस पाटील भरतीच्या परवानगीच्या फाईली राज्याच्या गृह सचिवांकडे पाच वर्षापासून प्रलंबित आहेत. पोलीस पाटील व कोतवाल या पदांसाठी बजेटमध्येच आर्थिक तरतूद दरवर्षी केली जात असताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त ठेवण्यामागील रहस्य उलगडलेले नाही. (वार्ताहर)
 
पोलीस पाटील पदासाठी अर्जाचा पाऊस 
च्गावातील रहिवासी आणि दहावी पास हा पोलीस पाटील पदासाठी निकष आहे. त्याला तीन हजार रुपये मानधन मिळते. पोलीस पाटील हे गावातील प्रतिष्ठेचे आणि राजकीय दृष्टय़ा वजनदार पद मानले जाते. त्यामुळे पोलीस पाटील भरतीचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अक्षरश: अर्जाचा पाऊस पडतो. एका जागेसाठी दीडशे ते दोनशे अर्ज येतात. 
कोतवालांचीही हजारो पदे रिक्त
च्तलाठय़ाचा सहायक म्हणून ओळखल्या जाणा:या कोतवालाची सुद्धा राज्यात 45 ते 5क् टक्के पदे रिक्त आहे. या पदाच्या भरतीसाठी लागणा:या मंजुरीचे अधिकार महसूल सचिवांकडे आहे. ही भरतीसुद्धा 2क्11 पासून झाली नाही. एकाकडे चार ते पाच गावचा प्रभार आहे. गावात येणा:या वरिष्ठ अधिका:यांना इत्थंभूत माहिती द्यायचा. परंतु आता कोतवालाचेच पद रिक्त असल्याने वसुली करायची कुणी, असा प्रश्न आहे. पर्यायाने गावागावात वसुलीचे कोटय़वधी रुपये थकले आहे.  
 
पोलीस पाटलांची 5क् टक्के पदे रिक्त आहेत. चार-पाच वर्षापासून भरतीच झाली नाही. या भरतीच्या परवानगीचे अधिकार गृहसचिवांकडे आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीस पाटील असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष एल. आर. राठोड यांनी सांगितले.