शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी
2
“RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ वाचायला हवे”; संजय राऊत पुस्तक पाठवणार
3
आसाम ते मणिपूर पावसाचा प्रकोप! ४८ जणांचा मृत्यू, ६०० ठिकाणी भूस्खलन, १५०० गावांना फटका
4
आव्हानाची भाषा करणाऱ्या पाकिस्तानचा सूर बदलला! आता विनवणी करत म्हणतायत "दोन्ही देशांच्या..."
5
Viral Video: मुंबई विमानतळावर सुरक्षारक्षक आणि वाहनचालकांमध्ये राडा, एकमेकांना कपडे फाटेपर्यंत मारलं!
6
150 पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे नंबर, ज्योतीसोबत पाकचा दौरा अन्..; हेर जसबीर सिंगची कुंडली
7
अनुष्का शर्माची ही गोष्ट विराट कोहलीसाठी ठरली लकी, आधी जिंकला क्वालिफायर १ आणि आता RCBने जिंकली ट्रॉफी
8
अरे महाग असला म्हणून काय झाले, जगात तोच सर्वाधिक विकला जातोय...; पहिल्या दहात एक स्वस्तही स्मार्टफोन...
9
Corona Virus Update : २४ तासांत कोरोनाने घेतले ७ बळी, २७६ नव्या रुग्णांची भर! देशभरात किती सक्रिय रुग्ण? 
10
Ganga Dussehra 2025: गुरुवारी गंगा दशहरा समाप्ती; करा दहा प्रकारचे दान, मिळवा दहापट पुण्य!
11
प्रेमानंद महाराजांचा दरबार अन् विराटसोबत चमत्कार...! 18 वर्षांची प्रतीक्षा संपली, विराटच्या हाती IPLची ट्रॉफी आली
12
वैभव सूर्यवंशीला तर लॉटरीच लागली! IPL मध्ये टाटा कर्व्ह मिळाली, पण... चालवू शकणार नाही
13
बिल गेट्सना 'धक्का'! मायक्रोसॉफ्टला मागे टाकत 'ही' कंपनी बनली जगातील नंबर वन!
14
Corona Virus : कोरोना वाढतोय मास्क तर लावाच, 'या' ५ उपायांनी वाढवा प्रतिकारशक्ती-इन्फेक्शनचा धोका टाळा
15
Vodafone Idea: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कंपनीकडे कमी वेळ शिल्लक; 'करो या मरो' सारखी स्थिती
16
“जालिंदर सुपेकरांनी तुरुंगात ३०० कोटी मागितले, १०० टक्के फॉल्टी”; सुरेश धस यांचा मोठा आरोप
17
Krunal Pandya :आधी मुंबई इंडियन्स अन् आता आरसीबी! थोरल्या पांड्यानं रचला नवा इतिहास
18
३ मूलांकांवर राहते अखंड स्वामी कृपा, दत्त-गुरु कृपेने भरघोस पैसा; कधीच काहीही कमी पडत नाही!
19
Career Astro Tips: मुलांनी डॉक्टर, इंजिनीअर व्हावं हे पालकांचं स्वप्नं, पण ग्रहदशा सांगते वेगळंच भाकीत!
20
मनसे-शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम? पुण्यात मनसेची महापालिकेतील सर्व जागा स्वबळावर लढवण्याची तयारी

राज्यात 20 हजार गावे पोलीस पाटलांविना!

By admin | Updated: June 22, 2014 02:10 IST

पोलीस पाटलांची राज्यभरात 2क् हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. पर्यायाने गावचा कारभार ढेपाळला आहे.

राजेश निस्ताने - यवतमाळ
पोलीस पाटलांची राज्यभरात 2क् हजारांपेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. पर्यायाने गावचा कारभार ढेपाळला आहे. गाव आणि प्रशासनातील समन्वयच यामुळे संपुष्टात आला आहे. पोलिसांनाही गावात आधार मिळेनासा झाला आहे. 
पोलीस पाटील या पदालाच सध्या ग्रहण लागले आहे. आजघडीला राज्यात पोलीस पाटलांची 4क् हजारांपैकी सुमारे 2क् हजारांवर पदे रिक्त आहेत. राज्यात 27 हजार ग्रामपंचायती आणि त्याच्या दुप्पट खेडय़ांची संख्या आहे. या प्रत्येकच खेडय़ात पोलीस पाटील असणो बंधनकारक असले तरी प्रत्यक्षात अध्र्या गावांना पोलीस पाटीलच नाही. पूर्वी पोलीस पाटील भरतीचे अधिकार उपविभागीय दंडाधिका:यांकडे होते. काही वर्षापूर्वी हे अधिकार मंत्रलयात घेतले गेले. पोलीस पाटलांची पदे रिक्त झाली की त्याची माहिती मंत्रलयात द्यायची आणि त्यानंतर तेथून भरतीची परवानगी दिली जाईल, अशी पद्धत आहे. रिक्त पदांबाबत मंत्रलयात अहवाल गेले आहेत, मात्र अद्याप त्याची दखल घेतलेली नाही.     
 
यवतमाळ : गेल्या पाच वर्षापासून (सन 2क्1क्) पोलिस पाटील भरतीची परवानगी मंत्रलयातून मिळालेली नाही. यापूर्वी एकदा 4क् टक्के तर एकदा 5क् टक्के पदे भरली गेली. मात्र  रिक्त जागांमुळे आज एका पोलीस पाटलाकडे चार ते पाच गावांचा कारभार सोपविला गेला आहे. 
गावात पोलीस पाटीलच उपलब्ध नसल्याने सर्वाधिक अडचण पोलीस प्रशासनाची होते आहे. घटना घडल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यासाठी गावातील कुणी पुढाकार घेत नाही. गावातील सामाजिक, राजकीय वातावरण, नेत्यांच्या भेटी, कायदा व सुव्यवस्था याबाबतचे गोपनीय अहवाल प्रशासनाला मिळेनासे झाले आहेत. गावक:यांना पोलीस पाटलाच्या दाखल्यासाठी वणवण फिरावे लागते. पोलीस पाटील भरतीच्या परवानगीच्या फाईली राज्याच्या गृह सचिवांकडे पाच वर्षापासून प्रलंबित आहेत. पोलीस पाटील व कोतवाल या पदांसाठी बजेटमध्येच आर्थिक तरतूद दरवर्षी केली जात असताना एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पदे रिक्त ठेवण्यामागील रहस्य उलगडलेले नाही. (वार्ताहर)
 
पोलीस पाटील पदासाठी अर्जाचा पाऊस 
च्गावातील रहिवासी आणि दहावी पास हा पोलीस पाटील पदासाठी निकष आहे. त्याला तीन हजार रुपये मानधन मिळते. पोलीस पाटील हे गावातील प्रतिष्ठेचे आणि राजकीय दृष्टय़ा वजनदार पद मानले जाते. त्यामुळे पोलीस पाटील भरतीचा जाहीरनामा प्रसिद्ध होताच अक्षरश: अर्जाचा पाऊस पडतो. एका जागेसाठी दीडशे ते दोनशे अर्ज येतात. 
कोतवालांचीही हजारो पदे रिक्त
च्तलाठय़ाचा सहायक म्हणून ओळखल्या जाणा:या कोतवालाची सुद्धा राज्यात 45 ते 5क् टक्के पदे रिक्त आहे. या पदाच्या भरतीसाठी लागणा:या मंजुरीचे अधिकार महसूल सचिवांकडे आहे. ही भरतीसुद्धा 2क्11 पासून झाली नाही. एकाकडे चार ते पाच गावचा प्रभार आहे. गावात येणा:या वरिष्ठ अधिका:यांना इत्थंभूत माहिती द्यायचा. परंतु आता कोतवालाचेच पद रिक्त असल्याने वसुली करायची कुणी, असा प्रश्न आहे. पर्यायाने गावागावात वसुलीचे कोटय़वधी रुपये थकले आहे.  
 
पोलीस पाटलांची 5क् टक्के पदे रिक्त आहेत. चार-पाच वर्षापासून भरतीच झाली नाही. या भरतीच्या परवानगीचे अधिकार गृहसचिवांकडे आहेत. त्याचा पाठपुरावा सुरू असल्याचे पोलीस पाटील असोसिएशनचे राज्य उपाध्यक्ष एल. आर. राठोड यांनी सांगितले.