शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

कपाशीचे २० हजार नमुने नापास!

By admin | Updated: March 8, 2015 02:01 IST

भरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

गजानन मोहोड ल्ल अमरावतीभरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या मूलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाने बीज परीक्षण प्रयोगशाळेत सन २०१४-१५ या वर्षात ३७,७४० बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता, उगवणशक्ती व गुणवत्ता तपासणी करण्यात आली. यामध्ये ४८३७ नमुने हे नापास ठरविण्यात आले आहेत. कुठलेही पीक असो अधिकाधिक उत्पन्नासाठी सुधारित जातीच्या बियाण्यांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकरी पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी करतात. सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची पेरणी विभागात होते. कपाशीचे संकरित बियाणे हे सर्वात महाग आहेत. त्यामुळे या बियाण्यांची शुद्धता पारखणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी शेतातील बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी साठवण केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांनादेखील विकण्यात येते. मात्र या बियाण्यांचा दर्जा, प्रतवारी, गुणवत्ता प्रमाणित केलेला नसतो. अशा बियाण्यांबाबत खात्री देता येत नाही. परस्पर विश्वासावर या बियाण्यांची खरेदी-विक्री होते. अशा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांची तपासणी करुन खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार, आनुवंशिक शुद्धता, गुणवत्ता असणारे बियाणे शेतकऱ्यांना बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा व बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे, परभणी व नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत. तेथे प्रामुख्याने बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता व उगवण्याची शक्ती तपासण्यात येते. कायद्यांतर्गत नियमांचे पालन करुन काढलेल्या नमुन्यांची आवश्यकतेनुसार आनुवंशिक शुद्धता, बियाण्यातील आर्द्रता, ओलावा आदी बाबींची तपासणी करण्यात येते. या निकषावर कापूस बियाण्यांची तपासणी करण्यात आली. मागील पाच वर्षांत १ लाख ८१ हजार बियाण्यांची तपासणी केली असून यामध्ये १९ हजार ७३७ बियाणे हे अप्रमाणित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खातरजमा करुनच बियाणे खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा परस्पर विश्वासावर बियाण्यांची करण्यात आलेली खरेदी शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ शकते. बियाण्यांचे दोन वेळा नमुने घेतले जातात. पहिल्यांदा बियाण्यांचा लॉट अलॉटमेंट झाल्यानंतर व दुसऱ्यांदा बियाणे बाजारात आल्यावर नक्की बियाणे कुठले अप्रमाणित आहे, याविषयीची माहिती घेतो. - दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.असा आहे कायदाच्बी-बियाणे अधिनियम १९६६, बियाणे अधिनियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९६६ या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर करणे बंधनकारक आहे. यासाठी कायद्यांतर्गत तीन ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.च्विदर्भात नागपूर येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ व वाशीम आदी जिल्ह्यांतून कापूस बियाण्यांची तपासणी केली जाते. पाच वर्षांचा गोषवारावर्षतपासलेले नमुनेअप्रमाणित नमुने२००९-१०३७,२९३३,२३०२०१०-११३१,४२७४,६०५२०११-१२३६,५२२३,६३९२०१२-१३३८,३१९३,४१६२०१३-१४३७,७४०४,८४७च्दरवर्षी कापूस बियाण्यांची गुणवत्ता कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसून सरासरी उत्पन्नात घट येत आहे.च् दशकाचा आढावा घेता विभागात कापसाची लागवड कमी होऊन याची जागा सोयाबीनने घेतली आहे. कापसाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.