शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
2
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
3
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
4
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
5
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
6
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
7
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
8
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!
9
प्रत्येक शेअरवर ५०,००० रुपयांचा फायदा; ना बोनस, ना स्टॉक स्प्लिट तरीही गुंतवणूकदार झाले मालामाल
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांना उच्च न्यायालयात चांगल्या पगारी नोकरी, २६ जुलैआधीच करा अर्ज!
11
Shravan 2025: शिवपुराणात दिलेल्या 'या' मंत्राने श्रावणात रोज जप केल्यास होते मनोकामनापूर्ती!
12
"दुसऱ्याच दिवशी वडील वारले, ठरलेलं लग्न मोडलं...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितली लाबुबू डॉलची भयानक स्टोरी
13
रॉबर्ट वाड्रांची ED कडून १८ तास चौकशी; चार्जशीटही दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या...
14
IT आणि बँकिंग शेअर्समध्ये मोठी पडझड; पण, टाटांच्या 'या' शेअर्ससह २ स्टॉक्सनी वाचवली इज्जत!
15
"शाकिबला मीच घरी आणलं पण पत्नीने त्याच्यासोबत..."; घरगुती वादातून तरुणाने स्वतःला संपवलं, व्हिडीओही काढला
16
“प्रताप सरनाईकांनी एकदा तरी शिवनेरीने प्रवास करावा”; बसची दुरवस्था, प्रवाशांचा संताप
17
मौलवींना बोलावून नाव बदललं, धर्मांतरण करण्यास भाग पाडलं; पीडित तरुणाचे पत्नीवर गंभीर आरोप!
18
"खूप मारलं, उपाशी ठेवलं, गोळ्या देऊन गर्भपात..."; सासरी अमानुष छळ, 'तिने' आयुष्य संपवलं
19
वडापाव, समोसा... आता वर्तमानपत्रात गुंडाळल्यास दुकान बंद? 'या' चुकीमुळे ७५ वर्षांची बेकरी झाली सील!

कपाशीचे २० हजार नमुने नापास!

By admin | Updated: March 8, 2015 02:01 IST

भरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

गजानन मोहोड ल्ल अमरावतीभरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या मूलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाने बीज परीक्षण प्रयोगशाळेत सन २०१४-१५ या वर्षात ३७,७४० बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता, उगवणशक्ती व गुणवत्ता तपासणी करण्यात आली. यामध्ये ४८३७ नमुने हे नापास ठरविण्यात आले आहेत. कुठलेही पीक असो अधिकाधिक उत्पन्नासाठी सुधारित जातीच्या बियाण्यांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकरी पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी करतात. सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची पेरणी विभागात होते. कपाशीचे संकरित बियाणे हे सर्वात महाग आहेत. त्यामुळे या बियाण्यांची शुद्धता पारखणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी शेतातील बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी साठवण केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांनादेखील विकण्यात येते. मात्र या बियाण्यांचा दर्जा, प्रतवारी, गुणवत्ता प्रमाणित केलेला नसतो. अशा बियाण्यांबाबत खात्री देता येत नाही. परस्पर विश्वासावर या बियाण्यांची खरेदी-विक्री होते. अशा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांची तपासणी करुन खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार, आनुवंशिक शुद्धता, गुणवत्ता असणारे बियाणे शेतकऱ्यांना बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा व बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे, परभणी व नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत. तेथे प्रामुख्याने बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता व उगवण्याची शक्ती तपासण्यात येते. कायद्यांतर्गत नियमांचे पालन करुन काढलेल्या नमुन्यांची आवश्यकतेनुसार आनुवंशिक शुद्धता, बियाण्यातील आर्द्रता, ओलावा आदी बाबींची तपासणी करण्यात येते. या निकषावर कापूस बियाण्यांची तपासणी करण्यात आली. मागील पाच वर्षांत १ लाख ८१ हजार बियाण्यांची तपासणी केली असून यामध्ये १९ हजार ७३७ बियाणे हे अप्रमाणित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खातरजमा करुनच बियाणे खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा परस्पर विश्वासावर बियाण्यांची करण्यात आलेली खरेदी शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ शकते. बियाण्यांचे दोन वेळा नमुने घेतले जातात. पहिल्यांदा बियाण्यांचा लॉट अलॉटमेंट झाल्यानंतर व दुसऱ्यांदा बियाणे बाजारात आल्यावर नक्की बियाणे कुठले अप्रमाणित आहे, याविषयीची माहिती घेतो. - दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.असा आहे कायदाच्बी-बियाणे अधिनियम १९६६, बियाणे अधिनियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९६६ या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर करणे बंधनकारक आहे. यासाठी कायद्यांतर्गत तीन ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.च्विदर्भात नागपूर येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ व वाशीम आदी जिल्ह्यांतून कापूस बियाण्यांची तपासणी केली जाते. पाच वर्षांचा गोषवारावर्षतपासलेले नमुनेअप्रमाणित नमुने२००९-१०३७,२९३३,२३०२०१०-११३१,४२७४,६०५२०११-१२३६,५२२३,६३९२०१२-१३३८,३१९३,४१६२०१३-१४३७,७४०४,८४७च्दरवर्षी कापूस बियाण्यांची गुणवत्ता कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसून सरासरी उत्पन्नात घट येत आहे.च् दशकाचा आढावा घेता विभागात कापसाची लागवड कमी होऊन याची जागा सोयाबीनने घेतली आहे. कापसाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.