शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीचे २० हजार नमुने नापास!

By admin | Updated: March 8, 2015 02:01 IST

भरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

गजानन मोहोड ल्ल अमरावतीभरघोस उत्पादनासाठी बियाणे शुद्ध व दर्जेदार असावे लागते. सदोष व अप्रमाणित बियाण्यांमुळे उत्पादनात मोठी घट येते. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या मूलभूत बाबींचा विचार करुन कृषी विभागाने बीज परीक्षण प्रयोगशाळेत सन २०१४-१५ या वर्षात ३७,७४० बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता, उगवणशक्ती व गुणवत्ता तपासणी करण्यात आली. यामध्ये ४८३७ नमुने हे नापास ठरविण्यात आले आहेत. कुठलेही पीक असो अधिकाधिक उत्पन्नासाठी सुधारित जातीच्या बियाण्यांची पेरणी करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. शेतकरी पेरणीसाठी बियाण्यांची खरेदी करतात. सर्वाधिक सोयाबीन व कपाशीची पेरणी विभागात होते. कपाशीचे संकरित बियाणे हे सर्वात महाग आहेत. त्यामुळे या बियाण्यांची शुद्धता पारखणे महत्त्वाचे ठरते. शेतकरी शेतातील बियाणे पुढील वर्षासाठी राखून ठेवतात. ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी साठवण केलेले बियाणे इतर शेतकऱ्यांनादेखील विकण्यात येते. मात्र या बियाण्यांचा दर्जा, प्रतवारी, गुणवत्ता प्रमाणित केलेला नसतो. अशा बियाण्यांबाबत खात्री देता येत नाही. परस्पर विश्वासावर या बियाण्यांची खरेदी-विक्री होते. अशा बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसगत होत असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व बियाण्यांची तपासणी करुन खातरजमा करणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार, आनुवंशिक शुद्धता, गुणवत्ता असणारे बियाणे शेतकऱ्यांना बियाणे प्रमाणिकरण यंत्रणा व बीज परीक्षण प्रयोगशाळा पुणे, परभणी व नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आहेत. तेथे प्रामुख्याने बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता व उगवण्याची शक्ती तपासण्यात येते. कायद्यांतर्गत नियमांचे पालन करुन काढलेल्या नमुन्यांची आवश्यकतेनुसार आनुवंशिक शुद्धता, बियाण्यातील आर्द्रता, ओलावा आदी बाबींची तपासणी करण्यात येते. या निकषावर कापूस बियाण्यांची तपासणी करण्यात आली. मागील पाच वर्षांत १ लाख ८१ हजार बियाण्यांची तपासणी केली असून यामध्ये १९ हजार ७३७ बियाणे हे अप्रमाणित करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. त्यामुळे शेतकऱ्यांनी खातरजमा करुनच बियाणे खरेदी करणे महत्त्वाचे ठरते. अन्यथा परस्पर विश्वासावर बियाण्यांची करण्यात आलेली खरेदी शेतकऱ्यांच्या अंगलट येऊ शकते. बियाण्यांचे दोन वेळा नमुने घेतले जातात. पहिल्यांदा बियाण्यांचा लॉट अलॉटमेंट झाल्यानंतर व दुसऱ्यांदा बियाणे बाजारात आल्यावर नक्की बियाणे कुठले अप्रमाणित आहे, याविषयीची माहिती घेतो. - दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती.असा आहे कायदाच्बी-बियाणे अधिनियम १९६६, बियाणे अधिनियम १९६८, बियाणे नियंत्रण आदेश १९६६ या कायद्याच्या अंमलबजावणीकरिता विविध बियाणे नमुन्यांची गुणवत्ता तपासणी वेगवेगळ्या स्तरावर करणे बंधनकारक आहे. यासाठी कायद्यांतर्गत तीन ठिकाणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत.च्विदर्भात नागपूर येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा आहे. या प्रयोगशाळेत नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, अमरावती, बुलडाणा, अकोला, यवतमाळ व वाशीम आदी जिल्ह्यांतून कापूस बियाण्यांची तपासणी केली जाते. पाच वर्षांचा गोषवारावर्षतपासलेले नमुनेअप्रमाणित नमुने२००९-१०३७,२९३३,२३०२०१०-११३१,४२७४,६०५२०११-१२३६,५२२३,६३९२०१२-१३३८,३१९३,४१६२०१३-१४३७,७४०४,८४७च्दरवर्षी कापूस बियाण्यांची गुणवत्ता कमी होत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसून सरासरी उत्पन्नात घट येत आहे.च् दशकाचा आढावा घेता विभागात कापसाची लागवड कमी होऊन याची जागा सोयाबीनने घेतली आहे. कापसाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शासनाने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.