शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

१४ टन विषारी वायू हवेत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2016 19:26 IST

आंध्रप्रदेशातून बडोद्याकडे अ‍ॅसीड घेऊन जाणाऱ्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला. यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता.

- सोमनाथ खताळ/फकिरा देशमुख/शाम पुंगळे

राजूर (जि.जालना) - आंध्रप्रदेशातून बडोद्याकडे अ‍ॅसीड घेऊन जाणाऱ्या टँकरमधील गॅसकीट लिकेज झाल्याने तब्बल १४ टन विषारी वायू हवेत मिसळला. यामुळे आठ कि.मी. पर्यंत सगळीकडे धूरच धूर दिसत होता. परिसरातील हजारो नागरिकांनी भयभीत होऊन सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. सोमवारी रात्री आठ वाजता भोकरदन तालुक्यातील भोकरदन-जालना राज्य रस्त्यावर राजूरजवळ ही घटना घडली. या मार्गावरील वाहतूक इतरत्र वळविण्यात आली असून २१ तासांनंतरही गळतीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले नव्हते.आंध्रप्रदेश राज्यातून ‘क्लोरोसल्फोनिक’ नावाचा १४ टन विषारी वायू घेऊन हा टँकर ट्रक (जीजे ०६, एव्ही ३४८३) बडोद्याकडे जात होता. टँकरच्या बॉटम व्हॉल्वमधील गॅसकीट अचानक लिकेज झाली आणि वायूगळतीला सुरूवात झाली. ही बाब चालकाच्या लक्षात येताच त्याने टँकर उभा करून पळ काढला. त्यानंतर ही बाब परिसरातील काही लोकांच्या लक्षात आली आणि त्यांनी प्रशासनाला कळविले. स्थानिक पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परंतु रात्रीची वेळ असल्याने पुढे जाण्यास कोणीच धजावत नव्हते. मंगळवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत वायू गळतीवर नियंत्रण आणण्यात प्रशासनाला यश आले नव्हते. शेवटी हतबल झालेल्या प्रशासनाने टँकर जागेवरच खाली केव्हा होतो, याची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, उपविभागीय पोलिस अधिकारी इश्वर वसावे, तहसीलदार रूपा चित्रक, सपोनि एस.एम.मेहेत्रे, तलाठी अविनाश देवकर, बारोटे हे तळ ठोकून होते. सरपंच शिवाजी पुंगळे आणि शिवसेनेचे तालुकाप्रमुख कैलास पुंगळे यांनी प्रशासनाला लागणारी मदत केली. जिल्हाधिकारी शिवाजीराव जोंधळे यांनीही पाहणी केली. यावेळी परिसरातील लोकांना सुरक्षेबाबत सुचना देण्याचे आदेश त्यांनी दिले, तसेच तज्ज्ञांना पाचारण करण्यास सांगितले. गळतीचा धुर आठ कि.मी. पर्यंत पसरला. त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली होती. या परिसरातील पिंपळगाव थोटे, अंबेगाव, खामखेडा, थिगळखेडा, पळसखेडा पिंपळे या मोठ्या गावांसह वाड्या- वस्त्यांवर राहणाऱ्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला. अनेकांना श्वसनाचे त्रास होऊ लागल्याने त्यांनी सुरक्षित स्थळी जाणे पसंत केले. तसेच डोळ्यात जळजळ होत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले.

अन् धूर अधिकच वाढला टँकरला आग लागली आहे, हा गैरसमज झाल्याने धावतपळत आलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी टँकरवर पाणी मारले. परंतु हे वायू ‘वॉटर रिअ‍ॅक्ट’ होणारे असल्याने धुर अधिकच वाढला. औरंगाबाद, जालना, भोकरन येथील अग्निमन विभागाचे बंब दाखल झाले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. सुदैवाने पाऊस नसल्याने दुर्घटना टळल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

पिकांचे नुकसानया अ‍ॅसीडमध्ये क्लोरक सल्फर नावाचे केमीकल होते. त्यामुळे यापासून मानवी जिवीतास धोका नाही, असे औरंगाबादचे औद्यागिक व आरोग्य सुरक्षा उपसंचालक प्रमोद सुरसे यांनी सांगितेले. परंतु या अ‍ॅसीडमुळे दोन कि.मी.पर्यंतची पिके पुर्णता: करपून गेली होती. झाडांचीही पाने पिवळी पडून झडल्याचे दिसून आले.

विद्यार्थी पाठविले परतराजूर परिसरातील अनेक गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी राजूर येथे येतात. परंतु या गळतीमुळे परिसरात सर्वत्र धुर पसरला होता. त्यामुळे परिसरातील पाचशे फुटापर्यंत येण्यास मज्जाव करण्यात आला होता. सकाळी शाळेत जाणाऱ्या मुलींनाही पोलिसांनी समजूत काढून परत पाठविले.

तज्ज्ञ आले अन् गेलेअ‍ॅसीड नियंत्रणासाठी प्रशासनाने औरंगाबाद येथील तीन खासगी कंपनीतील तज्ज्ञांना बोलविले. पाच तास प्रयत्न करूनही त्यांना यावर नियंत्रण आणण्यात यश आले नाही. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे समजताच आपल्या सहकाऱ्यांसोबत फोटो काढून ते औरंगाबादच्या दिशेने परतले.

अवैध वाळू आली कामालाअ‍ॅसीड गळती रोखण्यासाठी पाणी मारणे योग्य नव्हते. म्हणून तज्ज्ञांनी वाळू आणण्यास सांगितले. परंतु ऐनवेळी वाळू आणणार कोठुन असा प्रश्न प्रशासनासमोर होता. एवढ्यात तहसीलदार रूपा चित्रक यांनी सोमवारी अवैध वाळू वाहतूक करणारा पकडलेला ट्रक (एमएच२० एटी ६६७४) बोलविला. यातील सर्व वाळू याठिकाणी टाकण्यात आली, परंतु तरीही धुर आटोक्यात आला नाही.

वाहतूक वळवली भोकरदन, टेंभूर्णीचे पोलीस आणि जालन्याहून १२ राज्य राखीव दलाचे जवान बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. भोकरदन-जालना या मार्गावरील वाहतूक जाफराबादमार्गे वळविण्यात आली होती.