शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

वेळा अमावस्यानिमित्त चाकरमान्यांना ओढ गावच्या मातीची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:49 IST

उदगीर : महाराष्‍ट्र- कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील गावांत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते. ...

उदगीर : महाराष्‍ट्र- कर्नाटक व तेलंगणाच्या सीमावर्ती भागातील गावांत मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वेळा अमावस्या म्हणून साजरी केली जाते. या सणाला खूप महत्व आहे. या सणानिमित्ताने माती व संस्कृतीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नोकरी व कामधंद्यासाठी बाहेरगावी असलेली मंडळी सहकुटुंब गावची वाट धरतात. चाकरमान्यांना या सणासाठी गावची ओढ लागते. त्यामुळे मंगळवारी लातूर जिल्ह्यासह, उस्मानाबाद, बीड, कर्नाटक व तेलंगणातील शेत- शिवार माणसांनी फुलणार आहेत.

ग्रामीण भागात येळवस असे म्हटले जाते. यंदा हा सण जानेवारीत साजरा होत आहे. मुळात हा सण कर्नाटकातला असता तरी मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद व पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर तसेच तेलंगणा व सीमाभागातील कांही गावात हा सण शेतकरी मोठ्या उत्साहात साजरा करतात. कृषी संस्कृतीशी या सणाचे जवळचे नाते आहे. सणादिवशी शहर व ग्रामीण भागात एकप्रकारे अघोषित संचार बंदीचं असते.

रब्बी हंगामातील पिके बहरलेली असतात. त्यामुळे शेतशिवारं हिरवागार असतो. या सणासाठी बाहेरगावी राहणारी मंडळी शेताकडे येण्याचा प्रयत्न करतात. शेजारी, मित्रपरिवारांना जेवणाचे निमंत्रण दिले जाते. जेवणात भज्जी, रोडगा, अंब्बील, खिचडा गोड भात हा मेनू असतो. विशेषत: ज्यांच्याकडे शेती नाही, जे दुसऱ्या गावात स्थायिक झालेले आहेत, अशांना आवर्जून शिवारात भोजनासाठी निमंत्रण दिले जाते.

कडब्याच्या कोपीत पांडवांची पूजा

सकाळपासून बळीराजा साहित्य घेऊन शेतात जातात. पूर्वी सर्वजण बैलगाडीने जायचे. आता बैलगाडीची जागा दुचाकी, ट्रॅक्टर, कार, टेम्पो आदींनी घेतली आहे. शेतात पाच कडब्याच्या पेंड्या उभ्या करुन कोप तयार केली जाते. ती कोप म्हणजे आधार व सावलीचे प्रतीक होय. पांडव लक्ष्मीला दैवत मानून पूजा केली जाते. बळीराजा सपत्नीक पूजा करुन कोपीच्याभोवती ओलगे ओलगे सालम पलगे म्हणत फेऱ्या मारतो.