शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

नळाचे पाणी शुद्ध; चाचण्यांचा अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:26 IST

लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ४५ ते ५० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण हरंगुळ व आर्वी येथील ...

लातूर शहरासाठी मांजरा प्रकल्पातून दररोज ४५ ते ५० एमएलडी पाणी उचलले जाते. या पाण्याचे शुद्धीकरण हरंगुळ व आर्वी येथील जलशुद्धीकरण केंद्रामध्ये केले जाते. त्यानंतर प्रभागनिहाय पाण्याचे वितरण त्या-त्या जलकुंभाअंतर्गत करण्यात येते. पाणी वितरणासाठी शहरात दहा जलकुंभ आहेत. बार्शी रोड, शासकीय काॅलनी, सरस्वती काॅलनी, बसवेश्वर काॅलनी, डालडा फॅक्टरी, राजधानी, गांधी चौक, आर्वी, विवेकानंद चौक आदी जलकुंभांद्वारे वेळापत्रकानुसार पाण्याचे वितरण करण्यात येते. या जलकुंभाअंतर्गत दररोज पाच ते सहा पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सदर पाणी पिण्यास योग्य अथवा अयोग्य, याची तपासणी केली जाते. पाण्यामध्ये जैविक घटक आहेत का, याचीही तपासणी होते. पाणी पिण्यास योग्य असल्याचा शेरा आल्यानंतरच त्याचे वितरण केले जाते, असे मनपा पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. ज्या भागात पाणी सोडले जाणार आहे, त्या भागातील पाणी नमुन्यांची नियमित तपासणी केली जात असल्याचे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता कलवले यांनी सांगितले.

जलकुंभनिहाय घेतले जातात पाण्याचे नमुने

जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतरही पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. जलकुंभनिहाय पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. दररोज पाच ते सहा पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. पावसाळ्यात पाण्याचे नमुने अधिक घेतले जातात. खड्ड्यात साचलेले पाणी नळाच्या पाण्यात मिसळून अशुद्ध होऊ शकते. त्यामुळे पावसाळ्यात जास्त पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते, जेणेकरून अशुद्ध पाण्याचा पुरवठा होणार नाही.

अशी हाेते तपासणी

पाण्याचा हार्डनेस तसेच कॅल्शियम व मॅग्नेशियमच्या प्रमाणाची तपासणी केली जाते. पाण्यातील जीवाणूजन्य संसर्ग घटकांची तपासणी केली जाते. पाण्यातील फ्लोराईडचे प्रमाणही तपासले जाते.

पाण्यातील या सर्व घटकांचे प्रमाण संतुलित आहे का, सदर पाणी पिण्यासाठी योग्य की अयोग्य, याबाबतची सर्व प्रक्रिया या तपासणीमध्ये केली जाते. त्याचा अहवाल पिण्यायोग्य आहे की नाही, हे पाहिल्यानंतरच पाण्याचे वितरण होते.

कोट

जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर त्या-त्या भागातील पाण्याचे नमुने पाणी पुरवठा विभागाच्या वतीने तपासणीसाठी घेतले जातात. शिवाय, आरोग्य विभागाच्या वतीनेही पाणी नमुन्यांची परस्पर तपासणी होते. या सर्व तपासण्यांच्या अहवालानुसार लातूरला दिले जाणारे पाणी १०० टक्के शुद्ध आहे.

- नागनाथ कलवले, कार्यकारी अभियंता, मनपा