शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सहा मध्यम प्रकल्पांत केवळ २७ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:20 IST

उन्हाची तीव्रता महिनाभरापासून सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत घट होत आहे. लातूर ...

उन्हाची तीव्रता महिनाभरापासून सुरू झाली आहे. त्यात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीपातळीत घट होत आहे. लातूर तालुक्यातील तावरजा आणि रेणापूर तालुक्यातील व्हटी या दोन मध्यम प्रकल्पांतील पाणीपातळी जोत्याखाली गेली आहे. त्यामुळे तिथे उपयुक्त पाणीसाठा शून्य आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात २.२२८ दलघमी, तिरु-२.९१०, देवर्जन- ५.६९१, साकोळ- ४.९८८, घरणी- १०.३५५ आणि निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात ६.७६२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या शेतकरी उसासाठी पाण्याचा वापर करीत आहेत. त्याचबरोबर बाष्पीभवनही वाढले आहे. त्यामुळे जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे.

एकूण ३२.९९४ दलघमी पाणी

जिल्ह्यातील ६ मध्यम प्रकल्पांत सध्या ३२.९९४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. रेणापूर मध्यम प्रकल्पात ११.१३ टक्के, तिरुमध्ये १९.०३ टक्के, देवर्जनमध्ये ५३.२८, साकोळ ४५.५५, घरणी ४६.०९, मसलगा प्रकल्पात ४९.७२ टक्के असा एकूण २७.०१ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील १३२ लघु प्रकल्पांत ८९.३८३ दलघमी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे.