शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:26 IST

Killari Earthquake : भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने

आशपाक पठाणलातूर : भूकंपानंतर शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हजारो घरे उभारण्यात आली. भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगताहेत...

भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५२ गावे जमीनदोस्त झाली. यात लातूर जिल्ह्यातील ९ हजार ७४८ जणांनी प्राण गमावले. ३० हजारांवर लोक जखमी झाले. डोळ्यांदेखत ढिगाºयाखाली दबलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या किंकाळ्या अजूनही हृदय पिळवटून टाकतात. अनाथ झालेल्या १२८ मुलांना जीवन जगत असताना पदोपदी आपल्या कुटुंबाच्या आठवणींनी गहिवरून येते. ३० सप्टेंबर १९९३ च्या घटनेची माहिती काही क्षणात जगभर पसरली. मदतीचे लाखो हात किल्लारीच्या दिशेने धावले. जागोजागी जमीनदोस्त झालेली घरे, भिंतीखाली दबलेली माणसे, जखमांमुळे विव्हळत असलेले लोक, कोणी मुलांसाठी तर कोणी आपल्या आईसाठी टाहो करीत होते. प्रत्यक्षात ही सर्व घटना डोळ्यांत टिपणारी भूकंपग्रस्त गावातील माणसे आजही ‘त्या’ वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूळ जमीनधारकांना हवा भूखंड़

भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने जुन्या गावाच्या नजिक, शेत शिवाराच्या जवळ असलेली खडकाळ जमीन शोधली. भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने काळ्या जमिनीपासून दूरच्या अंतरावर पुनर्वसन झाले. त्यावेळी ज्यांनी पुनर्वसनासाठी स्वत:च्या जमिनी दिल्या, त्यांना त्यावेळी तुटपुंजा मावेजा मिळाला. आता कायद्याने वाढीव मावेजा मिळणे शक्य नाही. त्यासाठी जमीनदात्या शेतकºयांचे संघटन झाले असून, त्या सर्वांनी मिळून आम्हाला पुनर्वसित गावांमध्ये किमान खुला प्लॉट अथवा आठव्या व नवव्या फेरीतील घर द्यावे, अशी मागणी केली आहे. त्याचा शासनस्तरावर अजूनही विचार झालेला नाही. उमरगा तालुक्यातील १० गावांसाठी २६३़२२ हेक्टर्स तर लोहारा तालुक्यातील १९ गावांच्या पुनर्वसनासाठी ४१९़१८ हेक्टर्स अशी एकूण ६८३ हेक्टर्स जमीन संपादित झाली होती. 

५२ गावांत हजारो घरे झाली होती जमीनदोस्त... भूकंपाला २५ वर्षे पूर्ण झाली. घटनेनंतर महाराष्ट्र शासनासह अनेकांनी मदतीचा हात दिला. औसा, उमरगा, लोहारा तालुक्यांतील ५२ गावे जमीनदोस्त झाल्यावर प्रशासनाने त्यांना मदतीचा हात देत घरे उभारून दिली. भूकंपाचा पुन्हा प्रकोप होऊ नये, यासाठी आधुनिक पद्धतीने घरांची उभारणी करण्यात आली.  देश-विदेशातून धावून आलेले मदतीचे हात आजही भूकंपग्रस्तांच्या हृदयात घर करून आहेत. मात्र काही गावांमध्ये घरांच्या बांधकाम दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २५ वर्षांतच अनेकांची घरे खिळखिळी झाली आहेत.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर