शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

Killari Earthquake : घरे उभारली; आठवणींच्या वेदना कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:26 IST

Killari Earthquake : भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने

आशपाक पठाणलातूर : भूकंपानंतर शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने हजारो घरे उभारण्यात आली. भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगताहेत...

भूकंपात संपूर्ण कुटुंब गमावलेल्या अनेक व्यक्ती आजही वेदनांवर फुंकर घालून जीवन जगत आहेत. ३० सप्टेंबर १९९३ रोजी पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी ६.३ रिश्टर स्केलच्या धक्क्याने लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ५२ गावे जमीनदोस्त झाली. यात लातूर जिल्ह्यातील ९ हजार ७४८ जणांनी प्राण गमावले. ३० हजारांवर लोक जखमी झाले. डोळ्यांदेखत ढिगाºयाखाली दबलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या किंकाळ्या अजूनही हृदय पिळवटून टाकतात. अनाथ झालेल्या १२८ मुलांना जीवन जगत असताना पदोपदी आपल्या कुटुंबाच्या आठवणींनी गहिवरून येते. ३० सप्टेंबर १९९३ च्या घटनेची माहिती काही क्षणात जगभर पसरली. मदतीचे लाखो हात किल्लारीच्या दिशेने धावले. जागोजागी जमीनदोस्त झालेली घरे, भिंतीखाली दबलेली माणसे, जखमांमुळे विव्हळत असलेले लोक, कोणी मुलांसाठी तर कोणी आपल्या आईसाठी टाहो करीत होते. प्रत्यक्षात ही सर्व घटना डोळ्यांत टिपणारी भूकंपग्रस्त गावातील माणसे आजही ‘त्या’ वेदनांवर फुंकर घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. मूळ जमीनधारकांना हवा भूखंड़

भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी शासनाने जुन्या गावाच्या नजिक, शेत शिवाराच्या जवळ असलेली खडकाळ जमीन शोधली. भूकंप प्रवण क्षेत्र असल्याने काळ्या जमिनीपासून दूरच्या अंतरावर पुनर्वसन झाले. त्यावेळी ज्यांनी पुनर्वसनासाठी स्वत:च्या जमिनी दिल्या, त्यांना त्यावेळी तुटपुंजा मावेजा मिळाला. आता कायद्याने वाढीव मावेजा मिळणे शक्य नाही. त्यासाठी जमीनदात्या शेतकºयांचे संघटन झाले असून, त्या सर्वांनी मिळून आम्हाला पुनर्वसित गावांमध्ये किमान खुला प्लॉट अथवा आठव्या व नवव्या फेरीतील घर द्यावे, अशी मागणी केली आहे. त्याचा शासनस्तरावर अजूनही विचार झालेला नाही. उमरगा तालुक्यातील १० गावांसाठी २६३़२२ हेक्टर्स तर लोहारा तालुक्यातील १९ गावांच्या पुनर्वसनासाठी ४१९़१८ हेक्टर्स अशी एकूण ६८३ हेक्टर्स जमीन संपादित झाली होती. 

५२ गावांत हजारो घरे झाली होती जमीनदोस्त... भूकंपाला २५ वर्षे पूर्ण झाली. घटनेनंतर महाराष्ट्र शासनासह अनेकांनी मदतीचा हात दिला. औसा, उमरगा, लोहारा तालुक्यांतील ५२ गावे जमीनदोस्त झाल्यावर प्रशासनाने त्यांना मदतीचा हात देत घरे उभारून दिली. भूकंपाचा पुन्हा प्रकोप होऊ नये, यासाठी आधुनिक पद्धतीने घरांची उभारणी करण्यात आली.  देश-विदेशातून धावून आलेले मदतीचे हात आजही भूकंपग्रस्तांच्या हृदयात घर करून आहेत. मात्र काही गावांमध्ये घरांच्या बांधकाम दर्जाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २५ वर्षांतच अनेकांची घरे खिळखिळी झाली आहेत.

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर