शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Killari Earthquake : घर पुरेना, जमीन मिळेना, 25 वर्षानंतरही पीडितांची पडझड सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2018 11:24 IST

कुटुंबे वाढली, पण घर वाढवता येत नाही : वेगळे राहावे म्हटले, तर जमीन मालकीची नाही

चेतन धनुरे 

उस्मानाबाद : भूकंपानंतर बाधितांना पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या जागेमध्ये भूकंप अवरोधक घरे बांधून देण्यात आली़ अनेक ठिकाणी कॉर्पोरेट कंपन्यांनी आपल्या सीएसआर फंडातून घरे बांधून दिली आहेत़ यापैकी काही कंपन्यांनी बांधून दिलेल्या घरांचा बांधकामाचा दर्जा सुमार निघाला. तर अवघ्या २५ वर्षांतच यातील काही घरे गळू लागली आहेत, काही घरांच्या भिंतीना तडे गेले आहेत.

लोहारा तालुक्यातील होळी गावात अशी प्रातिनिधिक उदाहरणे पहावयास मिळाली़ येथे एका बँकेने ४३४ घरे बांधून दिली आहेत़ तर अन्य एका  व्यवसायिक कंपनीने ९४ घरे बांधली आहेत़ बँकेची घरे अजूनही मजबूत आहेत़ तर दुसºया कंपनीने बांधून दिलेल्या घराला तडे गेले आहेत़ छत गळू लागले आहे़ हीच स्थिती राहिल्यास घरे पुन्हा एखाद्या धक्क्याने कोलमडतील, अशी भीती होळीचे सरपंच व्यंकट माळी यांना आहे.अशीच काहिशी अवस्था येथील पायाभूत सुविधांची झाली आहे़ २५ वर्षांपूर्वी झालेले रस्ते पूर्णत: उखडले आहेत़ अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था दूर करण्याचे प्रयत्न २५ वर्षांत झाले नाहीत. भूकंप बाधितांना पुनर्वसित ठिकाणी तीन खोल्यांची घरे देण्यात आली आहेत़ यादरम्यानच्या काळात घरातील मुले मोठी झाली़ अनेकांची लग्ने झाली आहेत़ त्यामुळे आता या कुटूंबांना घराची समस्या भेडसावत आहे़ 

विभक्त राहून दुसरीकडे घर बांधावे तर जागाही नाही़ कारण; पुनर्वसित गावांची जमीन आजही महसूल विभागाच्या च्या ताब्यात आहे़ याठिकाणच्या मोकळ्या जागांची खरेदी-विक्री होऊ शकत नाही़ आहे त्या जागेतच बांधकाम वाढविण्याइतकी मजबुती सध्याच्या घरांची नाही.

या अडचणींमुळे कुटूंबे बेजार आहेत़ आता नवे घर बांधायचे तर गावाबाहेर जागा घ्यावी लागते अन् मगच बांधकाम करावे लागते़ वस्ती सोडून एकट्याने गावाबाहेर राहण्यात धोका असल्याने तसे धाडसही कोणी करेना. घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठीही याच अडचणींचा ब्रेक लागत आहे. सध्या वास्तव्यास असलेले घर हे ‘आरसीसी’ असल्याने घरकुलाच्या निकषात भूकंपग्रस्त भागातील लोक अपात्र ठरत आहेत़ शिवाय, लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे गावात जागाही नाही़ त्यामुळे ही योजना जणू या पुनर्वसित गावांसाठी कागदावरच आहे.  या अडचणीतून मार्ग निघत नसल्याने अनेकांनी घरापुढील मोकळ्या जागेतच पत्र्याचे शेड उभारुन घराचा तात्पुरता विस्तार साधला आहे.

‘रह गुजर ही को ठिकाणा कर लिया, कब तलक हम ख्वाब घर के देखते’ असे गझलकार मनिष शुक्ला यांनी आपल्या एका गझलेत म्हटले आहे़ अगदी तशीच अवस्था इथल्या भूकंप बाधितांची आहे़

टॅग्स :Killari Earthquakeकिल्लारी भूकंपlaturलातूर