शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

औराद शहाजानी परिसरात परतीच्या पावसाने सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी ...

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहिल्या. या नद्यावरील औराद, तगरखेडा, सोनखेड, मदनसुरी, लिंबाळा, वांजरखेडा, किल्लारीसह सर्व उच्चस्तरीय आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. याशिवाय, या परिसरातील लघु साठवण तलाव, विहीर, विंधन विहीरींना चांगला पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध झाला. यातून यंदा तेरणा नदीवरील बंधाऱ्यात असलेल्या पाण्याचा वापर शेतीच्या सिंचन वाढीसाठी महत्वाचा ठरला आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, ऊस, भाजीपाला, फळबागा या क्षेत्राचे लागवड क्षेत्र वाढले. उत्पादनाची वाढ झाली आहे. बारमाही पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून, ऊस पिकाची लागवड यावर्षी वाढली आहे. याशिवाय भाजीपाला क्षेत्रात आणि फळबाग क्षेत्रात लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढले आहेत. तर कोरडवाहू घेणारा शेतकरी या पाण्याचा लाभ काही शेतीला झाल्याने रब्बी उत्पादन वाढीस फायदा झाला आहे. परिसरात भाजीपाला क्षेत्रात टोमॅटो, वांगी, शिमला, मिरची, साधी मिरची, फूलकाेबी, दोडका आदी भाजीपाला लागवड क्षेत्र वाढले आहे. याशिवाय, सिताफळ खरबूज, टरबूज, पपई याची लागवडही वाढली आहे.

नदीकाठावरील शेतीला झाला फायदा...

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदीकाठावरील १ हजार २७५ हेक्टर क्षेत्र यंदाच्या हंगामात सिंचनाखाली आले आहे. तर विहीर, विंधन विहीर, तळे आणि तलाव या भागातील शेतीलाही पाणी साठा झाल्याने जवळपास ६०० हेक्टर सिंचनाचा हंगामी लाभ घेतला आहे. तेरणा नदीवरील पाटबंधारे बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा यंदा झाल्याने जवळपास बाराशे ७५ हेक्टर शेती सिंचनाचा लाभ झाल्याचे जलसिंचन शाखाधिकारी एस.आर. मुळे म्हणाले,

रब्बी उत्पादन वाढले असल्याचे मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील म्हणाले. यंदा परतीचा चांगला पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रातील ज्वारी गहू, हरभरा, ऊसासह भाजीपाला, फळबागा यांचे उत्पादन वाढले आहे.

बाजारात भाव नसल्याने नुकसान...

भाजीपाला उत्पादन वाढले पण कोरोनाच्या महामारीने बाजारपेठ बंद राहिल्या आहेत. बाजारात ग्राहक नसल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहे. परिणामी, उत्पादन वाढले असले तरी शेतीमाल मात्र शेतीच्या बांधावरच पडून आहे. असे शेतकरी विठ्ठल अंचुळे म्हणाले. शेवटच्या टप्प्यात आती पाऊस झाल्याने

हाताशी आलेले तुरीच्या पिकाचेही नुकसान झाले. हे रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. झालेली नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेकडाे शेतकरी सध्याला आर्थिक संकटात सापडले आहेत.