शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

औराद शहाजानी परिसरात परतीच्या पावसाने सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:20 IST

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी ...

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात यंदा परतीचा जोरदार पाऊस झाला. परिणामी, या पावसाने या परिसरातील तेरणा आणि मांजरा नदी पूर्ण क्षमतेने दुथडी भरून वाहिल्या. या नद्यावरील औराद, तगरखेडा, सोनखेड, मदनसुरी, लिंबाळा, वांजरखेडा, किल्लारीसह सर्व उच्चस्तरीय आणि कोल्हापुरी बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा झाला होता. याशिवाय, या परिसरातील लघु साठवण तलाव, विहीर, विंधन विहीरींना चांगला पाणी उपसा करण्यासाठी उपलब्ध झाला. यातून यंदा तेरणा नदीवरील बंधाऱ्यात असलेल्या पाण्याचा वापर शेतीच्या सिंचन वाढीसाठी महत्वाचा ठरला आहे. यामध्ये गहू, ज्वारी, हरभरा, ऊस, भाजीपाला, फळबागा या क्षेत्राचे लागवड क्षेत्र वाढले. उत्पादनाची वाढ झाली आहे. बारमाही पाणीसाठा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना नगदी पीक म्हणून, ऊस पिकाची लागवड यावर्षी वाढली आहे. याशिवाय भाजीपाला क्षेत्रात आणि फळबाग क्षेत्रात लागवडीचे क्षेत्र दुपटीने वाढले आहेत. तर कोरडवाहू घेणारा शेतकरी या पाण्याचा लाभ काही शेतीला झाल्याने रब्बी उत्पादन वाढीस फायदा झाला आहे. परिसरात भाजीपाला क्षेत्रात टोमॅटो, वांगी, शिमला, मिरची, साधी मिरची, फूलकाेबी, दोडका आदी भाजीपाला लागवड क्षेत्र वाढले आहे. याशिवाय, सिताफळ खरबूज, टरबूज, पपई याची लागवडही वाढली आहे.

नदीकाठावरील शेतीला झाला फायदा...

औराद शहाजानी परिसरातून वाहणाऱ्या तेरणा नदीकाठावरील १ हजार २७५ हेक्टर क्षेत्र यंदाच्या हंगामात सिंचनाखाली आले आहे. तर विहीर, विंधन विहीर, तळे आणि तलाव या भागातील शेतीलाही पाणी साठा झाल्याने जवळपास ६०० हेक्टर सिंचनाचा हंगामी लाभ घेतला आहे. तेरणा नदीवरील पाटबंधारे बंधाऱ्यात चांगला पाणीसाठा यंदा झाल्याने जवळपास बाराशे ७५ हेक्टर शेती सिंचनाचा लाभ झाल्याचे जलसिंचन शाखाधिकारी एस.आर. मुळे म्हणाले,

रब्बी उत्पादन वाढले असल्याचे मंडळ कृषी अधिकारी एच.एम. पाटील म्हणाले. यंदा परतीचा चांगला पाऊस झाल्याने रब्बी क्षेत्रातील ज्वारी गहू, हरभरा, ऊसासह भाजीपाला, फळबागा यांचे उत्पादन वाढले आहे.

बाजारात भाव नसल्याने नुकसान...

भाजीपाला उत्पादन वाढले पण कोरोनाच्या महामारीने बाजारपेठ बंद राहिल्या आहेत. बाजारात ग्राहक नसल्याने भाजीपाल्याचे दर कोसळले आहे. परिणामी, उत्पादन वाढले असले तरी शेतीमाल मात्र शेतीच्या बांधावरच पडून आहे. असे शेतकरी विठ्ठल अंचुळे म्हणाले. शेवटच्या टप्प्यात आती पाऊस झाल्याने

हाताशी आलेले तुरीच्या पिकाचेही नुकसान झाले. हे रब्बी हंगामातील पिकाचे मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागले. झालेली नुकसान भरपाई अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. शेकडाे शेतकरी सध्याला आर्थिक संकटात सापडले आहेत.