शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण!

By हरी मोकाशे | Updated: March 22, 2024 17:01 IST

१०९ विहिरींचे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत २.१३ मीटरची घट

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी २.१३ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहण होत आहे.

गत पावसाळ्यात जिल्ह्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला होता. परिणामी, जिल्ह्यातील नद्या वाहिल्या नाही तर ओढे खळाळले नाहीत. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही अपेक्षित जलसाठा झाला नाही. दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे परतीच्या पावसावर आशा होती. मात्र, ती फोल ठरली.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अधिक गहण हाेत आहे.

नऊ तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...तालुका - पाणी पातळीतील घट मीटरमध्येअहमदपूर - -२.७४औसा - -३.३०चाकूर - -२.४१देवणी - ०.११जळकोट - -१.७७लातूर - -०.३२निलंगा - -२.७६रेणापूर - -२.७१शिरुर अनं. - -४.६०उदगीर - -०.७९एकूण - -२.१३

शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षीच्या मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -२.१३ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली असून ती -४.६० मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ औसा तालुक्याची कमी झाली आहे. -३.३० मीटर अशी घट झाली आहे.

देवणी तालुक्याची स्थिती समाधानकारक...जिल्ह्यातील दहापैकी नऊ तालुक्यांची पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. केवळ देवणी तालुक्यातील पाणीपातळी समाधानकारक असून ती ०.११ मीटर अशी आहे. त्यामुळे पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

१८९ गावे तहानली, पाणीपुरवठ्याची मागणी...सध्या जिल्ह्यातील १५६ गावे आणि ३३ वाड्या तहानलेल्या आहेत. या एकूण १८९ गावांनी अधिग्रहणासाठी २६१ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणीअंती १८ गावांचे २९ प्रस्ताव वगळले आहेत. दरम्यान, १२६ गावांचे १६२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी ४८ गावांचे ६३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

१६ गावांचे टँकरचे प्रस्ताव...जिल्ह्यातील १४ गावे आणि २ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जलस्त्रोत काेरडे पडल्याने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. लामजना, खरोसा, टेंभूर्णी या तीन गावांसाठी तीन टँकर मंजूर करण्यात येऊन तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी