शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण!

By हरी मोकाशे | Updated: March 22, 2024 17:01 IST

१०९ विहिरींचे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत २.१३ मीटरची घट

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी २.१३ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहण होत आहे.

गत पावसाळ्यात जिल्ह्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला होता. परिणामी, जिल्ह्यातील नद्या वाहिल्या नाही तर ओढे खळाळले नाहीत. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही अपेक्षित जलसाठा झाला नाही. दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे परतीच्या पावसावर आशा होती. मात्र, ती फोल ठरली.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अधिक गहण हाेत आहे.

नऊ तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...तालुका - पाणी पातळीतील घट मीटरमध्येअहमदपूर - -२.७४औसा - -३.३०चाकूर - -२.४१देवणी - ०.११जळकोट - -१.७७लातूर - -०.३२निलंगा - -२.७६रेणापूर - -२.७१शिरुर अनं. - -४.६०उदगीर - -०.७९एकूण - -२.१३

शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षीच्या मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -२.१३ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली असून ती -४.६० मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ औसा तालुक्याची कमी झाली आहे. -३.३० मीटर अशी घट झाली आहे.

देवणी तालुक्याची स्थिती समाधानकारक...जिल्ह्यातील दहापैकी नऊ तालुक्यांची पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. केवळ देवणी तालुक्यातील पाणीपातळी समाधानकारक असून ती ०.११ मीटर अशी आहे. त्यामुळे पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

१८९ गावे तहानली, पाणीपुरवठ्याची मागणी...सध्या जिल्ह्यातील १५६ गावे आणि ३३ वाड्या तहानलेल्या आहेत. या एकूण १८९ गावांनी अधिग्रहणासाठी २६१ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणीअंती १८ गावांचे २९ प्रस्ताव वगळले आहेत. दरम्यान, १२६ गावांचे १६२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी ४८ गावांचे ६३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

१६ गावांचे टँकरचे प्रस्ताव...जिल्ह्यातील १४ गावे आणि २ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जलस्त्रोत काेरडे पडल्याने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. लामजना, खरोसा, टेंभूर्णी या तीन गावांसाठी तीन टँकर मंजूर करण्यात येऊन तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी