शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्याची भूजल पातळी खालावली; पाणीटंचाईचे संकट अधिक गहण!

By हरी मोकाशे | Updated: March 22, 2024 17:01 IST

१०९ विहिरींचे निरीक्षण : पाच वर्षांच्या तुलनेत २.१३ मीटरची घट

लातूर : गत पावसाळ्यात पावसाने वार्षिक सरासरीही न गाठल्याने जलसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले असता मागील पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी २.१३ मीटरने खालावली असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट अधिक गहण होत आहे.

गत पावसाळ्यात जिल्ह्यात उशिरा आणि अल्प प्रमाणात पाऊस झाला. ऑगस्टमध्ये तर वरुणराजाने मोठा ताण दिला होता. परिणामी, जिल्ह्यातील नद्या वाहिल्या नाही तर ओढे खळाळले नाहीत. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पातही अपेक्षित जलसाठा झाला नाही. दरवर्षी परतीचा पाऊस होतो. त्यामुळे परतीच्या पावसावर आशा होती. मात्र, ती फोल ठरली.

वार्षिक सरासरीच्या तुलनेत फार कमी पाऊस झाल्याने जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. वाढत्या उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे संकट अधिक गहण हाेत आहे.

नऊ तालुक्यांच्या पाणीपातळीत घट...तालुका - पाणी पातळीतील घट मीटरमध्येअहमदपूर - -२.७४औसा - -३.३०चाकूर - -२.४१देवणी - ०.११जळकोट - -१.७७लातूर - -०.३२निलंगा - -२.७६रेणापूर - -२.७१शिरुर अनं. - -४.६०उदगीर - -०.७९एकूण - -२.१३

शिरुर अनंतपाळची पाणीपातळी सर्वात कमी...भूजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेकडून दरवर्षीच्या मार्चमध्ये जिल्ह्यातील १०९ निरीक्षण विहिरींची पाणीपातळी तपासली जाते. यात मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याच्या पाणी पातळीत -२.१३ मीटरने घट झाली आहे. विशेषत: सर्वाधिक पाणी पातळी शिरुर अनंतपाळ तालुक्याची कमी झाली असून ती -४.६० मीटरने घटली आहे. त्यापाठोपाठ औसा तालुक्याची कमी झाली आहे. -३.३० मीटर अशी घट झाली आहे.

देवणी तालुक्याची स्थिती समाधानकारक...जिल्ह्यातील दहापैकी नऊ तालुक्यांची पाणीपातळी गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत कमी झाली आहे. केवळ देवणी तालुक्यातील पाणीपातळी समाधानकारक असून ती ०.११ मीटर अशी आहे. त्यामुळे पाणीटंचाई अधिक प्रमाणात जाणवणार असल्याचे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेकडून सांगण्यात आले.

१८९ गावे तहानली, पाणीपुरवठ्याची मागणी...सध्या जिल्ह्यातील १५६ गावे आणि ३३ वाड्या तहानलेल्या आहेत. या एकूण १८९ गावांनी अधिग्रहणासाठी २६१ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने पाहणीअंती १८ गावांचे २९ प्रस्ताव वगळले आहेत. दरम्यान, १२६ गावांचे १६२ प्रस्ताव मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे सादर केले आहेत. त्यापैकी ४८ गावांचे ६३ प्रस्ताव मंजूर करण्यात येऊन तिथे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

१६ गावांचे टँकरचे प्रस्ताव...जिल्ह्यातील १४ गावे आणि २ वाड्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. जलस्त्रोत काेरडे पडल्याने टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. लामजना, खरोसा, टेंभूर्णी या तीन गावांसाठी तीन टँकर मंजूर करण्यात येऊन तिथे टँकरने पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणी