शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

भाजीपाल्याच्या दरात आणखीन घसरण; टोमॅटो ८, कोबी १० रुपये प्रतिकिलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:46 IST

उदगीर : येथील बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत दर निम्म्यावर आले आहेत. टोमॅटोचे दर ...

उदगीर : येथील बाजारपेठेत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गेल्या महिन्याच्या तुलनेत दर निम्म्यावर आले आहेत. टोमॅटोचे दर तर प्रचंड गडगडले असून, केवळ ८ रुपये किलोपर्यंत भाव मिळत आहे. महाग असलेला हिरवा वाटाणाही ४० रुपये किलो रुपयांपर्यंत उतरला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

तालुक्यात परतीच्या जोरदार पावसामुळे खरिपाच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले; परंतु या पावसाने विहिरी, नाले, तलावांत बऱ्यापैकी पाण्याचा साठा झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील कुमठा, लोहारा, माळेवाडी, नागलगाव, मोघा, बनशेळकीसह अन्य गावांतील शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड केली. दोन आठवड्यांपासून भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. सध्या टोमॅटोची व कोबीची आवक मोठ्या प्रमाणावर झाली असून, चांगल्या प्रतीचे टोमॅटो पाच रुपयांपासून आठ रुपयांपर्यंत मिळत आहेत, तर कोबी १० रुपये प्रतिकिलो दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. मध्यंतरी भाजीपाल्याचे दर वाढले होते; पण आवक कमी होती. त्यामुळे काही प्रमाणात मागणी वाढली.

सध्या कोथिंबिरीची जुडीही पाच रुपयांना झाली आहे. इतर भाज्यांचे दर गेल्या आठवड्यापेक्षा सध्या निम्म्यावर आले आहेत. मेथीच्या दोन जुड्या १० रुपयांना, तर पालकसुद्धा त्याच दराने विक्री होत आहे.

३० रुपये किलो दराने मिळणारी वांगी १५ रुपयांवर, तर ४० रुपये किलो असणारी सिमला मिरची २० रुपये किलो झाली आहे. मिरचीचीही आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने ३५ रुपयांवरून दर निम्मे होत १२ ते १५ रुपयांपर्यंत झाले आहेत. हिरव्या वाटाण्याचा दर मागील आठवड्यात ८० ते १०० रुपये असा होता. या आठवड्यात भाव उतरून ४० रुपये किलोवर आले आहेत. कोबीचाही दर निम्म्यावर आला असून, ती १० रुपये किलोने मिळत आहे. कांदा व बटाट्याचा दर मात्र थोडासा वधारला आहे. चांगल्या प्रतीचा कांदा २५ ते ४० रुपयांपर्यंत मिळत आहे, तर बटाटे ४० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्याने दर घसरले आहेत. दररोज आवक चांगली होत असून, त्या तुलनेत मागणी नसल्याने दरात वाढ होण्याची शक्यता नाही.

भाजीपाला विक्रेते शेख फैयाज म्हणाले, मागील महिन्यापेक्षा सध्या तालुक्याच्या काही भागांतून आवक वाढल्याने दर कमी झाले आहेत. एवढे दर कमी होऊनसुद्धा ग्राहक खरेदीसाठी धजावत नाहीत. अशावेळी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला दर कसा मिळेल? त्यामुळे शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही निघेनासा झाला आहे.