शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

गरिबांचा बर्गर महाग झाला; वडापाव, आता २० रुपयांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

म्हणून महागला वडापाव... काेराेनापूर्वी खाद्यतेलाचे प्रतिकिलाे दर ९० रुपयांच्या घरात आहे. आता तेच दर १७० रुपयांच्या घरात आहे. दहा ...

म्हणून महागला वडापाव...

काेराेनापूर्वी खाद्यतेलाचे प्रतिकिलाे दर ९० रुपयांच्या घरात आहे. आता तेच दर १७० रुपयांच्या घरात आहे. दहा रुपयांना पूर्वी वडापाव विकला जात हाेता. त्यावेळी त्यातून नफा मिळत हाेता. आता खाद्यतेल, कांदा आणि बटाटे महागल्याने हा वडापाव दहा रुपयांना विक्री करणे शक्य नाही. परिणामी, काही विक्रेत्यांनी पंधरा रुपये, तर काहींनी २० रुपयांना केला आहे.

वडापावशिवाय दिवस जाणे कठीण...

मी दरराेज वडापाव खाताे. वडापावशिवाय दिवस जाणे कठीण आहे. अनेकदा नाश्ता म्हणून, वडापावचा वापर केला जाताे. महाविद्यालयात असताना दुपारच्यावेळी वडापाव, कचाेरी आणि समाेसाला प्राधान्य देत असत. आता दहा रुपयांचा वडापाव २० रुपयांना झाल्याने खाण्यावर निर्बंध आले आहेत. - पवन जाधव, लातूर

वडापावच्या भावामध्ये गत अनेक वर्षांपासून भाववाढ झालीच नव्हती. सध्याला तेल, कांदा, बटाट्याचे भाव दुपटीवर गेले आहेत. अशा स्थितीत दहा रुपयांना वडापाव देणे परवडणारे नाही. याचा विचार करून भाववाढ केली आहे ती याेग्य आहे. ग्राहकांना मात्र खिशाचा विचार करून मर्यादित प्रमाणात वडापाव खावा लागत आहे. - शादुल आवाळे, लातूर

काेराेना काळात व्यवसाय ठप्प, आर्थिक फटका...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून छाेट्या-माेठ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. लाॅकडाऊन काळात अनेक सर्व उलाढालच थांबली हाेती. या काळात अनेक दुकानांचे भाडे थकले, तर अनेकांनी आपला व्यवसायच बंद केला. आता पुन्हा व्यवसाय सुरू केला; मात्र महागाईमुळे भाववाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. - इस्माइल बागवान, लातूर

खाद्यतेल, कांदे, बडाटे आणि इतर किराणा मालाचे दर वाढले आहेत. अशा स्थितीत काेराेनामुळे व्यवसायातील उलाढाल मंदावली आहे. दिवसभर झालेल्या व्यवसायातून राेजगार आणि दुकानचे भाडेही निघणे कठीण झाले आहे. केवळ व्यवसायातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आहे त्या ठिकाणी तग धरून आहे. सध्याला ताेट्यातच व्यवसाय करावा लागत आहे.

- अमृत शेंडगे, लातूर