शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! ३७ जणांना अटक
2
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
3
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
6
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
7
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
8
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
9
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
10
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
11
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
12
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
13
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
15
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
16
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
17
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
18
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
19
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
20
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...

गरिबांचा बर्गर महाग झाला; वडापाव, आता २० रुपयांना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST

म्हणून महागला वडापाव... काेराेनापूर्वी खाद्यतेलाचे प्रतिकिलाे दर ९० रुपयांच्या घरात आहे. आता तेच दर १७० रुपयांच्या घरात आहे. दहा ...

म्हणून महागला वडापाव...

काेराेनापूर्वी खाद्यतेलाचे प्रतिकिलाे दर ९० रुपयांच्या घरात आहे. आता तेच दर १७० रुपयांच्या घरात आहे. दहा रुपयांना पूर्वी वडापाव विकला जात हाेता. त्यावेळी त्यातून नफा मिळत हाेता. आता खाद्यतेल, कांदा आणि बटाटे महागल्याने हा वडापाव दहा रुपयांना विक्री करणे शक्य नाही. परिणामी, काही विक्रेत्यांनी पंधरा रुपये, तर काहींनी २० रुपयांना केला आहे.

वडापावशिवाय दिवस जाणे कठीण...

मी दरराेज वडापाव खाताे. वडापावशिवाय दिवस जाणे कठीण आहे. अनेकदा नाश्ता म्हणून, वडापावचा वापर केला जाताे. महाविद्यालयात असताना दुपारच्यावेळी वडापाव, कचाेरी आणि समाेसाला प्राधान्य देत असत. आता दहा रुपयांचा वडापाव २० रुपयांना झाल्याने खाण्यावर निर्बंध आले आहेत. - पवन जाधव, लातूर

वडापावच्या भावामध्ये गत अनेक वर्षांपासून भाववाढ झालीच नव्हती. सध्याला तेल, कांदा, बटाट्याचे भाव दुपटीवर गेले आहेत. अशा स्थितीत दहा रुपयांना वडापाव देणे परवडणारे नाही. याचा विचार करून भाववाढ केली आहे ती याेग्य आहे. ग्राहकांना मात्र खिशाचा विचार करून मर्यादित प्रमाणात वडापाव खावा लागत आहे. - शादुल आवाळे, लातूर

काेराेना काळात व्यवसाय ठप्प, आर्थिक फटका...

काेराेनाच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० पासून छाेट्या-माेठ्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. लाॅकडाऊन काळात अनेक सर्व उलाढालच थांबली हाेती. या काळात अनेक दुकानांचे भाडे थकले, तर अनेकांनी आपला व्यवसायच बंद केला. आता पुन्हा व्यवसाय सुरू केला; मात्र महागाईमुळे भाववाढ करण्याशिवाय पर्याय उरला नाही. - इस्माइल बागवान, लातूर

खाद्यतेल, कांदे, बडाटे आणि इतर किराणा मालाचे दर वाढले आहेत. अशा स्थितीत काेराेनामुळे व्यवसायातील उलाढाल मंदावली आहे. दिवसभर झालेल्या व्यवसायातून राेजगार आणि दुकानचे भाडेही निघणे कठीण झाले आहे. केवळ व्यवसायातील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी आहे त्या ठिकाणी तग धरून आहे. सध्याला ताेट्यातच व्यवसाय करावा लागत आहे.

- अमृत शेंडगे, लातूर