शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० वर्षांपू्र्वी देशात हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याला २० मे १९६१ राेजी राष्ट्रपतींची अनुमती मिळाली आणि हा कायदा १ जुलै १९६१ राेजी लागू झाला. अर्थात १ जुलै २०२१ राेजी हा कायदा साठ वर्षांचा झाला. कायद्याच्या साठीनंतरही लातूर जिल्ह्यात तब्बल ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे पाेलीस दप्तरी नाेंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरुन समाेर आले आहे. धक्कादायक म्हणजे... यातील १४ महिलांचा हुंडाबळी गेला आहे. लातूरसह जिल्ह्यातील एकूण २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये जानेवारी २०१९ ते जून २०२१ या अडीच वर्षांच्या कालावधीत माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये ५३६ आणि जानेवारी ते जून २०२१ अखेर २८३ घटनांची नाेंद झाली आहे. ‘लाॅकडाऊन’मध्येही महिलांच्या छळांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनलाॅकमध्ये ‘भराेसा सेल’कडे तब्बल ५३८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील अनेक प्रकरणांत महिला तक्रार निवारण केंद्राच्यावतीने सुनावणी अन् समुपदेशन करण्यात आले आहे. यातून घटस्फाेटाच्या उंबरठ्यावर असलेल्या जाेडप्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ प्रकरणांची लातूरच्या भराेसा सेलने चाैकशी केली आहे. यात १६९ प्रकरणांत तडजाेड झाली असून, ३२३ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे तर ५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हुंड्याबाबत मानसिकता कायम...

माहेरची परिस्थिती हालाखीची... आई-वडील माेलमजुरी करुन प्रपंच चालविणारे... अशास्थितीत सासरकडून विवाहितेचा हुंड्यासाठी छळ... या विचित्र काेंडीत अडकलेल्या महिला वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळतात. तर काही महिला धाडस करत पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. यातून हुंडा आणि छळाची व्याप्ती समार येते. हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही सासरच्या मंडळींची मानसिकता बदलायला तयार नाही, हेच यातून समाेर आले आहे.

समुपदेशन आणि कायदेशीर सल्ला...

क्षुल्लक कारणावरुन सासरी विवाहितेचा छळ हाेताे. त्यातच पती-पत्नीत यातून बेबनाव निर्माण हाेताे. मग सुखी संसारात वादाची ठिणगी पडते आणि घटस्फाेटापर्यंत निर्णय हाेताे. अशावेळी महिलांचे मानसिक खच्चीकरण हाेते. त्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्राच्या ‘भराेसा सेल’कडून आधार दिला जाताे. त्यांचे समुपदेशन केले जाते, कायदेशीर सल्लाही दिला जाताे. हुंड्यासाठी हाेणारा छळ महिला सहन न करता, कायद्याचा आधार घेत बंड करतात.

- दीपा गीते, सहाय्यक पाेलीस निरीक्षक, लातूर