शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
4
दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
5
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
6
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
7
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
8
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
9
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
10
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
11
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
12
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
13
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
14
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
15
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
16
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
17
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
18
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
19
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
20
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई

हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ ।

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लातूर : हुंडा प्रथेसारख्या कुप्रथा, रुढी राेखण्यासाठी, निरपराध विवाहित महिलांचा छळ अन् हुंडाबळी थांबावेत, यासाठी ६० वर्षांपू्र्वी देशात हुंडाबंदीचा कायदा अस्तित्वात आला. या कायद्याला २० मे १९६१ राेजी राष्ट्रपतींची अनुमती मिळाली आणि हा कायदा १ जुलै १९६१ राेजी लागू झाला. अर्थात १ जुलै २०२१ राेजी हा कायदा साठ वर्षांचा झाला. कायद्याच्या साठीनंतरही लातूर जिल्ह्यात तब्बल ४४५ महिलांचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे पाेलीस दप्तरी नाेंदविण्यात आलेल्या आकडेवारीवरुन समाेर आले आहे. धक्कादायक म्हणजे... यातील १४ महिलांचा हुंडाबळी गेला आहे. लातूरसह जिल्ह्यातील एकूण २३ पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये जानेवारी २०१९ ते जून २०२१ या अडीच वर्षांच्या कालावधीत माेठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ महिला अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०२०मध्ये ५३६ आणि जानेवारी ते जून २०२१ अखेर २८३ घटनांची नाेंद झाली आहे. ‘लाॅकडाऊन’मध्येही महिलांच्या छळांच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनलाॅकमध्ये ‘भराेसा सेल’कडे तब्बल ५३८ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यातील अनेक प्रकरणांत महिला तक्रार निवारण केंद्राच्यावतीने सुनावणी अन् समुपदेशन करण्यात आले आहे. यातून घटस्फाेटाच्या उंबरठ्यावर असलेल्या जाेडप्यांचे संसार पुन्हा जुळले आहेत. जानेवारी ते डिसेंबर २०१९मध्ये ६१८ प्रकरणांची लातूरच्या भराेसा सेलने चाैकशी केली आहे. यात १६९ प्रकरणांत तडजाेड झाली असून, ३२३ जणांनी न्यायालयात धाव घेतली आहे तर ५७ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हुंड्याबाबत मानसिकता कायम...

माहेरची परिस्थिती हालाखीची... आई-वडील माेलमजुरी करुन प्रपंच चालविणारे... अशास्थितीत सासरकडून विवाहितेचा हुंड्यासाठी छळ... या विचित्र काेंडीत अडकलेल्या महिला वेळप्रसंगी मृत्यूला कवटाळतात. तर काही महिला धाडस करत पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल करतात. यातून हुंडा आणि छळाची व्याप्ती समार येते. हुंडाबंदी कायद्याच्या साठीनंतरही सासरच्या मंडळींची मानसिकता बदलायला तयार नाही, हेच यातून समाेर आले आहे.

समुपदेशन आणि कायदेशीर सल्ला...

क्षुल्लक कारणावरुन सासरी विवाहितेचा छळ हाेताे. त्यातच पती-पत्नीत यातून बेबनाव निर्माण हाेताे. मग सुखी संसारात वादाची ठिणगी पडते आणि घटस्फाेटापर्यंत निर्णय हाेताे. अशावेळी महिलांचे मानसिक खच्चीकरण हाेते. त्यासाठी महिला तक्रार निवारण केंद्राच्या ‘भराेसा सेल’कडून आधार दिला जाताे. त्यांचे समुपदेशन केले जाते, कायदेशीर सल्लाही दिला जाताे. हुंड्यासाठी हाेणारा छळ महिला सहन न करता, कायद्याचा आधार घेत बंड करतात.

- दीपा गीते, सहाय्यक पाेलीस निरीक्षक, लातूर