शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

यड्रावमधील युवकांची जिद्द प्रेरणादायी!

By admin | Updated: October 2, 2014 23:50 IST

प्रतिकू ल परिस्थितीत यश : परिश्रमास मार्गदर्शन मिळाल्यास अनेकांना संधी प्राप्त

घनश्याम कुंभार- यड्राव-‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ हे संतवचन प्रत्यक्ष कृतीत उतरविल्याने ध्येय गाठण्यासाठी बाळगलेल्या जिद्दीस कसे घवघवीत यश मिळते, हे येथील चार युवकांनी पोलीसपदी व एका युवकाची पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंतापदी निवड झाल्याने सिद्ध करून दाखविले आहे. परिसरातील प्रयत्नवादी युवकांना मार्गदर्शनाचे पाठबळ मिळाल्यास त्यांना नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होतील.आर्थिक परिस्थिती बेताची, शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले घर, सराव व अभ्यासासाठी आवश्यक साधनांची कमतरता, मार्गदर्शनाचा अभाव, समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन यांसारख्या अनेक प्रश्नांचा बाऊ न करता प्रयत्न केले, तर निश्चित यश मिळेल, ही सद्भावना व मिळेल त्या साधनसामग्रीच्या वापराने घेतलेल्या परिश्रमाचे यशात रूपांतर झाले.तेजस्विनी दादासो आदमाने हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शक्य होईल तिथे धावण्याचा सराव. मिळेल त्या पुस्तकातून अभ्यास करीत घरच्यांच्या आधारावर यड्रावमधील पहिली महिला पोलीस होण्याचा मान मिळविला आहे.सागर श्रीकांत चावरे याची मुंबई शहरामध्ये मुंबई पोलीस म्हणून निवड झाली आहे. तरीही दहशतवाद विरोधी कारवाई करण्यासाठी निर्माण झालेल्या ‘क्वीक रिस्पॉन्स टीम’मध्ये खात्यांतर्गत विभागात निवड होऊन त्यातून देशसेवा करण्याची त्याची इच्छा आहे. चंद्रकांत अनिल कोळी या धावपटू युवकाने सुमारे ७०हून अधिक राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक दहा ठिकाणी, द्वितीय क्रमांक १२ ठिकाणी, तृतीय क्रमांक सात ठिकाणी येऊन स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याची मुंबई येथे महाराष्ट्र रेल्वे पोलीस म्हणून निवड झाली आहे.अविनाश सुऱ्याप्पा माने या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत मुंबई येथे पोलीसपदी निवड झाली आहे. मेहबूब बाळासो गोलंदाज या युवकाने घरची गरीब परिस्थिती असूनही डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण केले. त्याची नुकतीच कोल्हापूर येथे पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता वर्ग - २ पदी निवड झाली आहे. युवकांनी स्वकर्तृत्वावर मिळविलेले यश गौरवास्पद प्रेरणादायी आहे