शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

‘आधी कुस्ती, नंतर दोस्ती’

By admin | Updated: August 25, 2016 00:40 IST

जिल्हा परिषद : दोन्ही काँग्रेसचा छुपा अजेंडा; शिवसेना-भाजपला रोखण्याची खेळी

कोल्हापूर : काँग्रेसचे गटांतर्गत राजकारण व राष्ट्रवादी काँग्रेसची मर्यादित ताकद पाहिली तर जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी ‘३५’ ही मॅजिक फिगर गाठणे अशक्यच आहे. सत्तेच्या ताकदीमुळे आक्रमक झालेल्या शिवसेना-भाजपला रोखणे अवघड असल्याने ‘पहिली कुस्ती, निवडणुकीनंतर दोस्ती’ करण्याचा छुपा अजेंडा दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर राबविला जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची तयारी सुरू झाल्याने ग्रामीण भागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी नेत्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी पक्षांनी सुरू केली असली तरी तालुकानिहाय पक्षांची वस्तुस्थिती पाहता एकाही पक्षाला स्वबळावर ३५ जागा जिंकणे कठीण आहे. जिल्हा परिषदेत सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसमधील प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, स्वर्गीय नरसिंग पाटील यांचा गट शिवसेनेत आले आहेत. गडहिंग्लजमध्ये जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील काँग्रेससोबत आहे, असे म्हटले तरी ते काँग्रेसपेक्षा महादेवराव महाडिक यांचेच जवळचे मानले जातात. त्यामुळेच गडहिंग्लज, कागल या तालुक्यांत काँग्रेसचे अस्तित्व शोधावे लागणार आहे. करवीरमध्ये काँग्रेस सक्षम असली तरी पन्हाळा, शाहूवाडीत दुसऱ्याच्या कुबड्यांवरच उभे राहावे लागणार आहे. हातकणंगले, शिरोळ, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत फारसे आशादायक चित्र सध्या तरी नाही. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती फारच नाजूक आहे. मुळातच कागल, राधानगरी-भुदरगड मर्यादित पक्ष असल्याची कबुली पक्षाचे राज्य पातळीवरील नेतेच देतात. गतनिवडणुकीत मुरगूडकर-पाटील, राजेखान जमादार, विक्रमसिंहराजेंचा गट मागे होता, तरीही राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. कागलमध्ये पक्ष बळकट असे जरी म्हटले तर विरोधकही प्रबळ असल्याने येथे एकतर्फी यशाची शक्यता फारच कमी आहे. गडहिंग्लजमध्ये गेल्यावेळेला स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर ताकदीने उभे राहिल्याने सर्वच्या सर्व पाच जागा जिंकल्या; पण पाच वर्षांत अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर हे बाहेर पडले. आजरामध्ये अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर हे मोठे गट बाजूला गेले. भुदरगडमध्ये के. जी. नांदेकर पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादीचे हे बालेकिल्ले काहीसे भुसभुशीत झाले आहेत. पन्हाळा, शाहूवाडी, करवीरमध्ये तर पक्षाचे अस्तित्व शोधावे लागते. हातकणंगले, शिरोळमध्ये गटातंर्गतच पक्ष विभागला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसनी कितीही स्वबळावर सत्ता आणण्याची भाषा केली तरी ते शक्य नाही. त्यामुळे आधी स्वबळावर लढायचे आणि सत्तेसाठी एकत्र यायचे, असाच ‘फॉर्म्युला’ पुढे येणार हे नक्की आहे. भाजपने जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकला असला तरी गोपाळराव पाटील वगळता एकही मोहरा त्यांच्या हाताला लागलेला नाही. शिवसेनेचे सहा आमदारांच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४२ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ येतात. सहाही नेत्यांनी ताकद लावली तर जिल्हा परिषदेवर सत्ता येईल; पण प्रत्येकांने ‘सोयीचे राजकारण’ केल्याने तेही शक्य नाही. जनसुराज्य व स्वाभिमानी पक्षाची ताकद मर्यादित आहे. ते शेवटच्या क्षणी कोणाचा तरी आधार बनून सत्तेत घुसण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेच्या नेत्यांना उघड भूमिका घ्यावी लागणारच!आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्या आतापर्यंतच्या भूमिका वेगवेगळ्या राहिल्या आहेत.प्रत्येक निवडणुकीत ‘सोयीच्या राजकारणा’मुळे सहा आमदार असतानाही जिल्ह्यात ‘धनुष्याचे अस्तित्व’ अजूनही ठळक दिसत नाही. या निवडणुकीत या नेत्यांना धनुष्यबाण घेऊनच रिंगणात उतरावे लागणार आहे.