शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

‘आधी कुस्ती, नंतर दोस्ती’

By admin | Updated: August 25, 2016 00:40 IST

जिल्हा परिषद : दोन्ही काँग्रेसचा छुपा अजेंडा; शिवसेना-भाजपला रोखण्याची खेळी

कोल्हापूर : काँग्रेसचे गटांतर्गत राजकारण व राष्ट्रवादी काँग्रेसची मर्यादित ताकद पाहिली तर जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी ‘३५’ ही मॅजिक फिगर गाठणे अशक्यच आहे. सत्तेच्या ताकदीमुळे आक्रमक झालेल्या शिवसेना-भाजपला रोखणे अवघड असल्याने ‘पहिली कुस्ती, निवडणुकीनंतर दोस्ती’ करण्याचा छुपा अजेंडा दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर राबविला जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची तयारी सुरू झाल्याने ग्रामीण भागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी नेत्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी पक्षांनी सुरू केली असली तरी तालुकानिहाय पक्षांची वस्तुस्थिती पाहता एकाही पक्षाला स्वबळावर ३५ जागा जिंकणे कठीण आहे. जिल्हा परिषदेत सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसमधील प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, स्वर्गीय नरसिंग पाटील यांचा गट शिवसेनेत आले आहेत. गडहिंग्लजमध्ये जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील काँग्रेससोबत आहे, असे म्हटले तरी ते काँग्रेसपेक्षा महादेवराव महाडिक यांचेच जवळचे मानले जातात. त्यामुळेच गडहिंग्लज, कागल या तालुक्यांत काँग्रेसचे अस्तित्व शोधावे लागणार आहे. करवीरमध्ये काँग्रेस सक्षम असली तरी पन्हाळा, शाहूवाडीत दुसऱ्याच्या कुबड्यांवरच उभे राहावे लागणार आहे. हातकणंगले, शिरोळ, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत फारसे आशादायक चित्र सध्या तरी नाही. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती फारच नाजूक आहे. मुळातच कागल, राधानगरी-भुदरगड मर्यादित पक्ष असल्याची कबुली पक्षाचे राज्य पातळीवरील नेतेच देतात. गतनिवडणुकीत मुरगूडकर-पाटील, राजेखान जमादार, विक्रमसिंहराजेंचा गट मागे होता, तरीही राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. कागलमध्ये पक्ष बळकट असे जरी म्हटले तर विरोधकही प्रबळ असल्याने येथे एकतर्फी यशाची शक्यता फारच कमी आहे. गडहिंग्लजमध्ये गेल्यावेळेला स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर ताकदीने उभे राहिल्याने सर्वच्या सर्व पाच जागा जिंकल्या; पण पाच वर्षांत अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर हे बाहेर पडले. आजरामध्ये अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर हे मोठे गट बाजूला गेले. भुदरगडमध्ये के. जी. नांदेकर पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादीचे हे बालेकिल्ले काहीसे भुसभुशीत झाले आहेत. पन्हाळा, शाहूवाडी, करवीरमध्ये तर पक्षाचे अस्तित्व शोधावे लागते. हातकणंगले, शिरोळमध्ये गटातंर्गतच पक्ष विभागला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसनी कितीही स्वबळावर सत्ता आणण्याची भाषा केली तरी ते शक्य नाही. त्यामुळे आधी स्वबळावर लढायचे आणि सत्तेसाठी एकत्र यायचे, असाच ‘फॉर्म्युला’ पुढे येणार हे नक्की आहे. भाजपने जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकला असला तरी गोपाळराव पाटील वगळता एकही मोहरा त्यांच्या हाताला लागलेला नाही. शिवसेनेचे सहा आमदारांच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४२ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ येतात. सहाही नेत्यांनी ताकद लावली तर जिल्हा परिषदेवर सत्ता येईल; पण प्रत्येकांने ‘सोयीचे राजकारण’ केल्याने तेही शक्य नाही. जनसुराज्य व स्वाभिमानी पक्षाची ताकद मर्यादित आहे. ते शेवटच्या क्षणी कोणाचा तरी आधार बनून सत्तेत घुसण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेच्या नेत्यांना उघड भूमिका घ्यावी लागणारच!आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्या आतापर्यंतच्या भूमिका वेगवेगळ्या राहिल्या आहेत.प्रत्येक निवडणुकीत ‘सोयीच्या राजकारणा’मुळे सहा आमदार असतानाही जिल्ह्यात ‘धनुष्याचे अस्तित्व’ अजूनही ठळक दिसत नाही. या निवडणुकीत या नेत्यांना धनुष्यबाण घेऊनच रिंगणात उतरावे लागणार आहे.