शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

‘आधी कुस्ती, नंतर दोस्ती’

By admin | Updated: August 25, 2016 00:40 IST

जिल्हा परिषद : दोन्ही काँग्रेसचा छुपा अजेंडा; शिवसेना-भाजपला रोखण्याची खेळी

कोल्हापूर : काँग्रेसचे गटांतर्गत राजकारण व राष्ट्रवादी काँग्रेसची मर्यादित ताकद पाहिली तर जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता मिळविण्यासाठी ‘३५’ ही मॅजिक फिगर गाठणे अशक्यच आहे. सत्तेच्या ताकदीमुळे आक्रमक झालेल्या शिवसेना-भाजपला रोखणे अवघड असल्याने ‘पहिली कुस्ती, निवडणुकीनंतर दोस्ती’ करण्याचा छुपा अजेंडा दोन्ही काँग्रेसच्या पातळीवर राबविला जाणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारसंघ पुनर्रचना व आरक्षणाची तयारी सुरू झाल्याने ग्रामीण भागात निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. जिल्हा परिषदेवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकाविण्यासाठी नेत्यांनी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची तयारी पक्षांनी सुरू केली असली तरी तालुकानिहाय पक्षांची वस्तुस्थिती पाहता एकाही पक्षाला स्वबळावर ३५ जागा जिंकणे कठीण आहे. जिल्हा परिषदेत सध्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मदतीने काँग्रेसची सत्ता आहे. गेल्या पाच वर्षांत काँग्रेसमधील प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे, आमदार प्रकाश आबिटकर, स्वर्गीय नरसिंग पाटील यांचा गट शिवसेनेत आले आहेत. गडहिंग्लजमध्ये जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील काँग्रेससोबत आहे, असे म्हटले तरी ते काँग्रेसपेक्षा महादेवराव महाडिक यांचेच जवळचे मानले जातात. त्यामुळेच गडहिंग्लज, कागल या तालुक्यांत काँग्रेसचे अस्तित्व शोधावे लागणार आहे. करवीरमध्ये काँग्रेस सक्षम असली तरी पन्हाळा, शाहूवाडीत दुसऱ्याच्या कुबड्यांवरच उभे राहावे लागणार आहे. हातकणंगले, शिरोळ, चंदगड, भुदरगड, आजरा तालुक्यांत फारसे आशादायक चित्र सध्या तरी नाही. काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची स्थिती फारच नाजूक आहे. मुळातच कागल, राधानगरी-भुदरगड मर्यादित पक्ष असल्याची कबुली पक्षाचे राज्य पातळीवरील नेतेच देतात. गतनिवडणुकीत मुरगूडकर-पाटील, राजेखान जमादार, विक्रमसिंहराजेंचा गट मागे होता, तरीही राष्ट्रवादीला सपाटून मार खावा लागला. कागलमध्ये पक्ष बळकट असे जरी म्हटले तर विरोधकही प्रबळ असल्याने येथे एकतर्फी यशाची शक्यता फारच कमी आहे. गडहिंग्लजमध्ये गेल्यावेळेला स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर ताकदीने उभे राहिल्याने सर्वच्या सर्व पाच जागा जिंकल्या; पण पाच वर्षांत अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर हे बाहेर पडले. आजरामध्ये अशोक चराटी, विष्णुपंत केसरकर हे मोठे गट बाजूला गेले. भुदरगडमध्ये के. जी. नांदेकर पक्षातून बाहेर पडले. राष्ट्रवादीचे हे बालेकिल्ले काहीसे भुसभुशीत झाले आहेत. पन्हाळा, शाहूवाडी, करवीरमध्ये तर पक्षाचे अस्तित्व शोधावे लागते. हातकणंगले, शिरोळमध्ये गटातंर्गतच पक्ष विभागला आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेसनी कितीही स्वबळावर सत्ता आणण्याची भाषा केली तरी ते शक्य नाही. त्यामुळे आधी स्वबळावर लढायचे आणि सत्तेसाठी एकत्र यायचे, असाच ‘फॉर्म्युला’ पुढे येणार हे नक्की आहे. भाजपने जिल्हा परिषदेसाठी शड्डू ठोकला असला तरी गोपाळराव पाटील वगळता एकही मोहरा त्यांच्या हाताला लागलेला नाही. शिवसेनेचे सहा आमदारांच्या कार्यक्षेत्रात तब्बल ४२ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ येतात. सहाही नेत्यांनी ताकद लावली तर जिल्हा परिषदेवर सत्ता येईल; पण प्रत्येकांने ‘सोयीचे राजकारण’ केल्याने तेही शक्य नाही. जनसुराज्य व स्वाभिमानी पक्षाची ताकद मर्यादित आहे. ते शेवटच्या क्षणी कोणाचा तरी आधार बनून सत्तेत घुसण्यासाठीच प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)शिवसेनेच्या नेत्यांना उघड भूमिका घ्यावी लागणारच!आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार सत्यजित पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्यासह प्रा. संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्या आतापर्यंतच्या भूमिका वेगवेगळ्या राहिल्या आहेत.प्रत्येक निवडणुकीत ‘सोयीच्या राजकारणा’मुळे सहा आमदार असतानाही जिल्ह्यात ‘धनुष्याचे अस्तित्व’ अजूनही ठळक दिसत नाही. या निवडणुकीत या नेत्यांना धनुष्यबाण घेऊनच रिंगणात उतरावे लागणार आहे.