शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

संसार चिखलातच...!

By admin | Updated: November 17, 2014 00:24 IST

गळीत हंगामावर अवकळा : ऊसतोड मजुरांना सतावतोय निवाऱ्याचा प्रश्न

गणपती कोळी - कुरुंदवाड -निर्जन ठिकाणी वास्तव्य, गैरसोयींच्या व झाडाझुडपांनी व्यापलेले, कधी रणरणत्या उन्हात होरपळून निघायचे, तर कधी वादळी वाऱ्यातून खोपट उडून जायचे, तर पावसात गुडघाभर चिखलातून संसार थाटायचा याचे सुख-दु:ख कोणालाच नाही. ही अवस्था आहे ऊसतोड मजुरांची. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे खोपटात पाणी शिरले आणि चिखल झाला. खोपटातील कर्ती माणसं कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी ऊस तोडण्यासाठी शेतावर गेली आहेत अन् त्यांची लहान मुले खोपटातील पाणी काढून पूर्ववत संसार थाटत आहेत. या मजुरांच्या जिवावर वाहतूकदार, कंत्राटदार मोठे झाले. मात्र, मानवतेतून या मजुरांच्या किमान निवाऱ्याचा प्रश्न तरी सुटायला हवा.ऊसतोड हंगाम चालू झाला की, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद, कर्नाटक, आदी भागांतून मजुरांचा तांडा येतो. या भागातील बहुतेक मजुरांचे शेती क्षेत्र मोठे आहे. मात्र, पाण्याअभावी शेती पिकत नाही. त्यामुळे पोटाची भूक व संसाराचा गाडा चालविण्यासाठी ऊसतोड मजुरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यासाठी ऊस वाहतूकदारांकडून उचल घेतली जाते व ते मजुरी करून फेडतात.मजुरांच्या अस्वच्छतेचे कारण पुढे करीत सधन भागातील लोक गावालगत अथवा आपल्या शेतात तांडा उभारण्यास तयार नसल्याने निर्जन, पडीक जमीन असलेल्या ठिकाणी हा तांडा विसावतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजुरांची गैरसोयींबाबत अजिबात तक्रार नसते. हंगामातील ऊन, वारा, पाऊस, थंडी याबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांशी दोन हात करीत त्यांना प्रत्येक दिवस घालवावा लागतो.दोन दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीमुळे खोपटाभोवती पाणी साचले आहे. अनेकांच्या खोपटांतच पाणी शिरले आहे. कंत्राटदार, वाहतूकदार अथवा साखर कारखानदार यांचा मजुरांना दिलेले पैसे फेडून घेणे एवढाच उद्देश असल्याने, अशा संकटावेळीही खोपटावर थांबून चालत नाही. त्यामुळे या कामाची जबाबदारी लहान मुलांवर टाकून ते ऊसतोडीसाठी जात आहेत. पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हाल पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावते. मात्र, मजुरांची परवड थांबता थांबत नाही. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.कामागरांकडून काम करून घेताना त्यांना मूलभूत सुविधा देणे हेही तितकेच बंधनकारक आहे. साखर कारखानदार व वाहतूकदार यांच्या समन्वयाने किमान त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या मजुरीतून काही रक्कम कपात करून सोयी दिल्या, तरी त्याला कोणाचा विरोध राहणार नाही. मात्र, हे मजूर आगाऊ घेतलेली उचल फेडण्यासाठी आले आहेत. ते कोणत्या परिस्थितीत राहतात याचे काही देणेघेणे नाही, असा समज करणे म्हणजे एक प्रकारे या मजुरांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जागरूक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांना जागे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.कुरुंदवाड-शिरढोण रस्त्यालगत अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या खोपटाभोवती साचलेले पाणी व चिखल यातच हंगामी संसार थाटावा लागत आहे.