शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

संसार चिखलातच...!

By admin | Updated: November 17, 2014 00:24 IST

गळीत हंगामावर अवकळा : ऊसतोड मजुरांना सतावतोय निवाऱ्याचा प्रश्न

गणपती कोळी - कुरुंदवाड -निर्जन ठिकाणी वास्तव्य, गैरसोयींच्या व झाडाझुडपांनी व्यापलेले, कधी रणरणत्या उन्हात होरपळून निघायचे, तर कधी वादळी वाऱ्यातून खोपट उडून जायचे, तर पावसात गुडघाभर चिखलातून संसार थाटायचा याचे सुख-दु:ख कोणालाच नाही. ही अवस्था आहे ऊसतोड मजुरांची. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे खोपटात पाणी शिरले आणि चिखल झाला. खोपटातील कर्ती माणसं कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी ऊस तोडण्यासाठी शेतावर गेली आहेत अन् त्यांची लहान मुले खोपटातील पाणी काढून पूर्ववत संसार थाटत आहेत. या मजुरांच्या जिवावर वाहतूकदार, कंत्राटदार मोठे झाले. मात्र, मानवतेतून या मजुरांच्या किमान निवाऱ्याचा प्रश्न तरी सुटायला हवा.ऊसतोड हंगाम चालू झाला की, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद, कर्नाटक, आदी भागांतून मजुरांचा तांडा येतो. या भागातील बहुतेक मजुरांचे शेती क्षेत्र मोठे आहे. मात्र, पाण्याअभावी शेती पिकत नाही. त्यामुळे पोटाची भूक व संसाराचा गाडा चालविण्यासाठी ऊसतोड मजुरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यासाठी ऊस वाहतूकदारांकडून उचल घेतली जाते व ते मजुरी करून फेडतात.मजुरांच्या अस्वच्छतेचे कारण पुढे करीत सधन भागातील लोक गावालगत अथवा आपल्या शेतात तांडा उभारण्यास तयार नसल्याने निर्जन, पडीक जमीन असलेल्या ठिकाणी हा तांडा विसावतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजुरांची गैरसोयींबाबत अजिबात तक्रार नसते. हंगामातील ऊन, वारा, पाऊस, थंडी याबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांशी दोन हात करीत त्यांना प्रत्येक दिवस घालवावा लागतो.दोन दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीमुळे खोपटाभोवती पाणी साचले आहे. अनेकांच्या खोपटांतच पाणी शिरले आहे. कंत्राटदार, वाहतूकदार अथवा साखर कारखानदार यांचा मजुरांना दिलेले पैसे फेडून घेणे एवढाच उद्देश असल्याने, अशा संकटावेळीही खोपटावर थांबून चालत नाही. त्यामुळे या कामाची जबाबदारी लहान मुलांवर टाकून ते ऊसतोडीसाठी जात आहेत. पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हाल पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावते. मात्र, मजुरांची परवड थांबता थांबत नाही. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.कामागरांकडून काम करून घेताना त्यांना मूलभूत सुविधा देणे हेही तितकेच बंधनकारक आहे. साखर कारखानदार व वाहतूकदार यांच्या समन्वयाने किमान त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या मजुरीतून काही रक्कम कपात करून सोयी दिल्या, तरी त्याला कोणाचा विरोध राहणार नाही. मात्र, हे मजूर आगाऊ घेतलेली उचल फेडण्यासाठी आले आहेत. ते कोणत्या परिस्थितीत राहतात याचे काही देणेघेणे नाही, असा समज करणे म्हणजे एक प्रकारे या मजुरांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जागरूक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांना जागे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.कुरुंदवाड-शिरढोण रस्त्यालगत अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या खोपटाभोवती साचलेले पाणी व चिखल यातच हंगामी संसार थाटावा लागत आहे.