शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत रात्र वैऱ्याची! आधीच यमुनेच्या पुराचे पाणी, त्यात भूकंप, अफगाणिस्तानात केंद्र
2
इथे खरा पेच...! दुकानदार २२ सप्टेंबरपासून आधीचा माल कसा विकणार? GST कमी करून की...
3
स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा निर्णय, काँग्रेसच्या काळात...; जीएसटी बदलावर पंतप्रधानांची पहिली प्रतिक्रिया
4
अजित पवारांना नडलेल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा कोण आहेत?
5
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
6
नेपाळमध्ये फेसबुक, एक्ससह २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी, युट्यूब अन् व्हॉट्सअ‍ॅपवरही बंदी
7
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
8
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
9
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
10
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
11
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
12
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
13
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
14
Happy Teachers Day 2025: शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
15
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
16
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
17
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
18
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
20
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना

संसार चिखलातच...!

By admin | Updated: November 17, 2014 00:24 IST

गळीत हंगामावर अवकळा : ऊसतोड मजुरांना सतावतोय निवाऱ्याचा प्रश्न

गणपती कोळी - कुरुंदवाड -निर्जन ठिकाणी वास्तव्य, गैरसोयींच्या व झाडाझुडपांनी व्यापलेले, कधी रणरणत्या उन्हात होरपळून निघायचे, तर कधी वादळी वाऱ्यातून खोपट उडून जायचे, तर पावसात गुडघाभर चिखलातून संसार थाटायचा याचे सुख-दु:ख कोणालाच नाही. ही अवस्था आहे ऊसतोड मजुरांची. दोन दिवस पडलेल्या पावसामुळे खोपटात पाणी शिरले आणि चिखल झाला. खोपटातील कर्ती माणसं कंत्राटदारांचे पैसे फेडण्यासाठी ऊस तोडण्यासाठी शेतावर गेली आहेत अन् त्यांची लहान मुले खोपटातील पाणी काढून पूर्ववत संसार थाटत आहेत. या मजुरांच्या जिवावर वाहतूकदार, कंत्राटदार मोठे झाले. मात्र, मानवतेतून या मजुरांच्या किमान निवाऱ्याचा प्रश्न तरी सुटायला हवा.ऊसतोड हंगाम चालू झाला की, सोलापूर, लातूर, बीड, उस्मानाबाद, कर्नाटक, आदी भागांतून मजुरांचा तांडा येतो. या भागातील बहुतेक मजुरांचे शेती क्षेत्र मोठे आहे. मात्र, पाण्याअभावी शेती पिकत नाही. त्यामुळे पोटाची भूक व संसाराचा गाडा चालविण्यासाठी ऊसतोड मजुरीचा पर्याय स्वीकारावा लागतो. त्यासाठी ऊस वाहतूकदारांकडून उचल घेतली जाते व ते मजुरी करून फेडतात.मजुरांच्या अस्वच्छतेचे कारण पुढे करीत सधन भागातील लोक गावालगत अथवा आपल्या शेतात तांडा उभारण्यास तयार नसल्याने निर्जन, पडीक जमीन असलेल्या ठिकाणी हा तांडा विसावतो. पोटाची खळगी भरण्यासाठी आलेल्या या मजुरांची गैरसोयींबाबत अजिबात तक्रार नसते. हंगामातील ऊन, वारा, पाऊस, थंडी याबरोबरच सरपटणाऱ्या प्राण्यांशी दोन हात करीत त्यांना प्रत्येक दिवस घालवावा लागतो.दोन दिवसांच्या पावसाच्या रिपरिपीमुळे खोपटाभोवती पाणी साचले आहे. अनेकांच्या खोपटांतच पाणी शिरले आहे. कंत्राटदार, वाहतूकदार अथवा साखर कारखानदार यांचा मजुरांना दिलेले पैसे फेडून घेणे एवढाच उद्देश असल्याने, अशा संकटावेळीही खोपटावर थांबून चालत नाही. त्यामुळे या कामाची जबाबदारी लहान मुलांवर टाकून ते ऊसतोडीसाठी जात आहेत. पावसामुळे ऊसतोड मजुरांचे हाल पाहून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाचे मन हेलावते. मात्र, मजुरांची परवड थांबता थांबत नाही. याबाबत गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.कामागरांकडून काम करून घेताना त्यांना मूलभूत सुविधा देणे हेही तितकेच बंधनकारक आहे. साखर कारखानदार व वाहतूकदार यांच्या समन्वयाने किमान त्यांच्या निवाऱ्याची सोय करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांच्या मजुरीतून काही रक्कम कपात करून सोयी दिल्या, तरी त्याला कोणाचा विरोध राहणार नाही. मात्र, हे मजूर आगाऊ घेतलेली उचल फेडण्यासाठी आले आहेत. ते कोणत्या परिस्थितीत राहतात याचे काही देणेघेणे नाही, असा समज करणे म्हणजे एक प्रकारे या मजुरांच्या जिवाशीच खेळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे जागरूक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांना जागे करण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.कुरुंदवाड-शिरढोण रस्त्यालगत अवकाळी पावसामुळे ऊसतोड मजुरांच्या खोपटाभोवती साचलेले पाणी व चिखल यातच हंगामी संसार थाटावा लागत आहे.