शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
2
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
3
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
4
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
5
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
6
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
7
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
8
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
9
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
10
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
11
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
12
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
13
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
14
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
15
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
16
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
17
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
18
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
19
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
20
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका

आघाड्यांचे भूत कोल्हापूरच्या मानगुटीवर पुन्हा बसणार काय..?

By admin | Updated: October 10, 2015 00:33 IST

मतदारांचीच कसोटी : काँग्रेसला रोखण्यासाठी ‘ताराराणी’ मैदानात

विश्वास पाटील - कोल्हापूर--महापालिकेच्या राजकारणातील काँग्रेसच्या वर्चस्वाला मोडून काढण्यासाठी ताराराणी आघाडी मैदानात उतरली आणि आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजकारणाचा उदय झाला. आता पुन्हा तोच अजेंडा घेऊन महाडिक यांच्या छुप्या नेतृत्वाखालील ही आघाडी या निवडणुकीत मैदानात उतरली आहे. सत्ता हेच मुख्य साध्य असलेल्या या आघाडींचे भूत कोल्हापूरची जनता मानगुटीवर बसू देणार काय, हीच खरी उत्कंठा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कधीही पक्षीय सत्ता असेल, तर काही प्रमाणात तरी कारभारावर वचक राहतो. केंद्र व राज्य शासनाकडून निधी आणता येतो. गेल्या पाच वर्षांत पक्षीय राजकारणामुळे हजार-बाराशे कोटी रुपये आले व घोडेबाजार झाला नाही. महाडिक यांच्याकडे सत्ता असताना त्यांनी भूखंड लाटले नाहीत की कोणत्या टेंडरमध्ये रस दाखविला नाही, हे खरे असले तरी पदाधिकारी निवडून द्यायचे आणि तिथे काय चालते याकडे मात्र काडीचे लक्ष द्यायचे नाही, असा त्यांचा व्यवहार राहिला. त्यांच्याकडे एकहाती सत्ता होती. त्यावेळी या शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याची त्यांना संधी होती; परंतु तसे काहीच झाले नाही. फक्त व्यक्तिगत वर्चस्वाच्या राजकारणातच ते अडकून पडले. त्यातून ते आजही बाहेर आलेले नाहीत. आताही त्यांची ताराराणी आघाडी म्हणजे महाडिक गटाचे राजकारण पुन्हा प्रस्थापित करण्याचाच प्रयत्न आहे. लोकांचे प्रश्न, विकासाचे राजकारण असले काही विषय त्यांच्या खिजगणतीत नाहीत.कोल्हापूरच्या नगरपालिकेची महापालिका करण्याचे श्रेय दिवंगत नेते श्रीपतरावदादा बोंद्रे यांना जाते. त्यामुळे महापालिकेत सुरुवातीची पाच ते सहा वर्षे त्यांचा वचक राहिला. पुढे तत्कालीन खासदार उदयसिंगराव गायकवाड यांचे नेतृत्व मानणारा गट सत्तेत आला. दादा-साहेबांचे दरबारी राजकारण मोडून काढण्यासाठी महादेवराव महाडिक, व्ही. बी. पाटील, पत्रकार बी. आर. पाटील, पापा कौलवकर यांनी महापालिकेच्या राजकारणात लक्ष घातले. पुढे एका टप्प्यावर त्यातील महाडिक वगळता अन्य बाजूला झाले व काँग्रेसमधील राजकारणाची सोयरिक म्हणून त्यात पी. एन. पाटील, अरुण नरके यांचा समावेश झाला. किमान दहा वर्षे कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महाडिक-नरके-पाटील या ‘मनपा’ लॉबीचे वर्चस्व राहिले. महाडिक महापालिकेत सत्ताधारी, पी.एन. हे सलग पाच वर्षे जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले व इकडे ‘गोकुळ’मध्ये अरुण नरके सलग दहा वर्षे अध्यक्ष झाले. पुढे सांगरूळ मतदारसंघात महाडिक यांनी उघड पाठिंबा देऊन आतून धोका दिल्याचा अनुभव आल्यावर पी. एन. व महाडिक यांच्यात वैमनस्य आले. तत्पूर्वी १९९० च्या सुमारास ताराराणी आघाडीचा जन्म झाला; परंतु ही आघाडी निवडणुकीनंतर अस्तित्वात येई. प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र अपक्ष म्हणून नगरसेवक निवडून येत. त्यांना एकत्र करण्याचे काम महाडिक करीत असत. सुरुवातीच्या टप्प्यात या आघाडीने सामान्य कार्यकर्त्याला सत्तेची संधी दिली. शिवाजी पेठेतील सरदार तालीम प्रभागातून गाजलेल्या लढतीत शिवाजीराव चव्हाण यांचा पराभव करून भिकशेट पाटील विजयी झाले व महाडिक यांनी त्यांना १९९० ला महापौर केले. त्यामुळे महाडिक यांची चांगलीच ‘क्रेझ’ तयार झाली. पुढे पाच-सहा वर्षे महाडिक म्हणतील ती पूर्व दिशा राहिली. त्यास १९९८ ला महापौर निवडीत सुरूंग लागला. ताराराणी आघाडीच्या माया भंडारे यांचा पराभव करून त्यावेळी कांचन कवाळे महापौर झाल्या. पुढील वर्षी नंदकुमार वळंजू यांचा पराभव करून बाबू फरास महापौर झाले. ‘बिन आवाजाच्या बॉम्ब’ची हवा निर्माण झाली. त्यावेळी महाडिक दोन पाऊल मागे सरकले; परंतु त्यांचे वर्चस्व कायमच राहिले. त्यांना पुन्हा २००५ च्या निवडणुकीत विनय कोरे-हसन मुश्रीफ यांनी आव्हान दिले. या निवडणुकीत काँग्रेस चिन्हावर लढली नव्हती. ‘घोडेबाजार नको..’ म्हणून आम्हाला मते द्या, असे सांगणाऱ्या कोरे यांना निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही; परंतु त्यांनीच मोठा घोडेबाजार करून महाडिक यांच्या सत्तेला सुरूंग लावला व सई खराडे या ‘जनसुराज्य’च्या उमेदवार म्हणून २००५ ला महापौर झाल्या. आघाड्यांचे राजकारण संपवून पक्षीय राजकारणाचा खऱ्या अर्थाने उदय गत निवडणुकीत झाला. त्यामागेही महाडिक यांच्या राजकारणाला शह देण्याचाच प्रयत्न होता. गेल्या पाच वर्षांत आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील व विनय कोरे यांचा वरचष्मा राहिला. काँग्रेसच्या राजकारणात सतेज पाटील यांनी महाडिक यांना महत्त्व दिले नाही म्हणून ते दुखावले गेले. आता महापालिका निवडणुकीत ते बाजूला जाण्याचे तेच कारण आहे. आता काँग्रेसपेक्षा सतेज पाटील यांच्या राजकारणाला शह देण्यासाठी ते ‘ताराराणी’ची ढाल करून मैदानात उतरले आहेत. सोबतीला भाजपला घेतले आहे. (समाप्त)एकमेव विजयगतनिवडणुकीत शाहू आघाडीच्या यशोदा मोहिते या गंजीमाळ प्रभागातून विजयी झाल्या. त्यांना १३०३ मते मिळाली. मोहिते या माजी नगरसेवक प्रकाश मोहिते यांच्या पत्नी होत. हे मोहिते आमदार महाडिक यांचे निष्ठावंत. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांच्या आग्रहामुळे सचिन चव्हाण यांच्या पत्नीस मिळाल्याने मोहिते शाहू आघाडीकडे गेल्या. आता याच सौ. मोहिते भाजपकडून संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून, तर स्वत: मोहिते नाथागोळे प्रभागातून ताराराणी आघाडीकडून रिंगणात आहेत.विक्रमसिंह घाटगे यांची ‘शाहू आघाडी’शाहू आघाडी दहा ठिकाणी दुसऱ्या स्थानांवर होती. त्यामध्ये शुगरमिल, कसबा बावडा, हनुमान तलाव, पोलीस लाईन, राजर्षी शाहू मार्केट यार्ड, शाहूपुरी उत्तर, विक्रमनगर, जवाहरनगर, पांजरपोळ, सागरमाळ या प्रभागांचा समावेश होता. या आघाडीचे शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे हे प्रमुख होते. ही आघाडी महाडिक यांचीच डमी असल्याची टीकाही त्यावेळी सातत्याने झाली. महापालिकेच्या राजकारणात यापूर्वी महालक्ष्मी आघाडी, नगरविकास आघाडी, शहर विकास आघाडी अशाही काही आघाड्या होऊन गेल्या आहेत.