शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने आदेश देऊनही फेरचौकशी का करत नाही?: हसन मुश्रीफ

By admin | Updated: March 9, 2017 18:50 IST

कागल तालुक्यातील २३०० अपात्र लाभार्थ्यांचे अनुदान सुुरु ठेवण्याची मागणी

शासनाने आदेश देऊनही फेरचौकशी का करत नाही?: हसन मुश्रीफ यांनी विचारला जिल्हाधिकाऱ्यांना जाब : कागल तालुक्यातील २३०० अपात्र लाभार्थ्यांचे अनुदान सुुरु ठेवण्याची मागणीकोल्हापूर : कागल तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या योजनांच्या लाभार्थ्यांना शासन निर्णय, परिपत्रके डावलून नियमबाह्य निकष लावून सुमारे २३०० लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांचे अनुदान बंद केले आहे. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून याच्या फेरचौकशीचे आदेश आणले आहेत. याकरिता तुम्हाला वर्षभरात अनेक वेळा भेटूनही तुम्ही चौकशी केलेली नाही. तुम्ही शासनाचा अपमान करता काय? अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना जाब विचारला.दुपारी एकच्या सुमारास आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कागल तालुका राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान चुकीचे निकष लावून बंद करण्यात आले आहे. ही बाब आपण शासनाच्या निदर्शनास आणून देत ३ मार्च २०१६ रोजी फेरचौकशीचे आदेश आणले आहेत; परंतु अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. ती केव्हा करणार? अशीही विचारणा केली. यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी या संदर्भात भुदरगडच्या प्रांताधिकाऱ्यांमार्फत दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. हे करीत असताना कागल तालुक्यात दोन हजारांहून अधिक जणांचे मोर्चे काढून यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा सर्व लाभार्थ्यांची फेरचौकशी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर त्रुटी असतील तर अशी प्रकरणे निदर्शनास आणून द्या, त्यांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.यावर मुश्रीफ यांनी आम्ही ३००० लोकांमधून ही नावे शोधून काढायची काय? हे तुमचे काम आहे; त्यामुळे तुम्ही फेरचौकशी करावी, असे सांगितले. आम्ही महात्मा गांधींचे अनुयायी असल्याने कुणावरही दबाव आणण्याचा प्रश्नच येत नाही. तसे वाटल्यास तुम्ही चौकशी बंद करू शकता. फेरचौकशीसाठी शासनाकडून आदेश आणून वर्षभरात मी आपल्याला अनेक वेळा भेटलो. वेळोवेळी निवेदने, मोर्चे, आंदोलने केली आहेत; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. शिष्टमंडळात जिल्हा बॅँकेचे संचालक प्रताप माने, जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, मनोज फराकटे, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, शशिकांत खोत, रमेश तोडकर, सुभाष चौगले, विकास पाटील, आदींचा समावेश होता.-------------------------अजूनही आम्ही संयमात....मी पाच वेळा आमदार व दोन वेळा मंत्री असूनही माझ्यासारख्या माणसाला तुम्ही एवढा वेळ लावत आहात, हे बरोबर नसून अजूनही आम्ही संयमात आहोत, हे विसरू नका अशा शब्दांत मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला.---------------------------------------इथेच भडका उडेलजिल्हाधिकाऱ्यांशी हसन मुश्रीफ चर्चा करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने मुश्रीफ संतप्त झाले होते. त्यात मध्येच कुणीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. यावर मुश्रीफ यांनी त्यांना रोखत ‘मी बोलतो आहे; त्यामुळे कुणीही मध्ये बोलू नका,’ असे सांगत ‘आता इथेच भडका उडेल,’ असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांकडे कटाक्ष टाकला.