शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

शासनाने आदेश देऊनही फेरचौकशी का करत नाही?: हसन मुश्रीफ

By admin | Updated: March 9, 2017 18:50 IST

कागल तालुक्यातील २३०० अपात्र लाभार्थ्यांचे अनुदान सुुरु ठेवण्याची मागणी

शासनाने आदेश देऊनही फेरचौकशी का करत नाही?: हसन मुश्रीफ यांनी विचारला जिल्हाधिकाऱ्यांना जाब : कागल तालुक्यातील २३०० अपात्र लाभार्थ्यांचे अनुदान सुुरु ठेवण्याची मागणीकोल्हापूर : कागल तालुक्यातील संजय गांधी, श्रावणबाळ, इंदिरा गांधी या योजनांच्या लाभार्थ्यांना शासन निर्णय, परिपत्रके डावलून नियमबाह्य निकष लावून सुमारे २३०० लाभार्थ्यांना अपात्र ठरवून त्यांचे अनुदान बंद केले आहे. या संदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून याच्या फेरचौकशीचे आदेश आणले आहेत. याकरिता तुम्हाला वर्षभरात अनेक वेळा भेटूनही तुम्ही चौकशी केलेली नाही. तुम्ही शासनाचा अपमान करता काय? अशा शब्दांत आमदार हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांना जाब विचारला.दुपारी एकच्या सुमारास आमदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली कागल तालुका राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी मुश्रीफ यांनी कागल तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेसह विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे अनुदान चुकीचे निकष लावून बंद करण्यात आले आहे. ही बाब आपण शासनाच्या निदर्शनास आणून देत ३ मार्च २०१६ रोजी फेरचौकशीचे आदेश आणले आहेत; परंतु अद्याप यावर कोणतीच कार्यवाही झालेली नाही. ती केव्हा करणार? अशीही विचारणा केली. यावर जिल्हाधिकारी सैनी यांनी या संदर्भात भुदरगडच्या प्रांताधिकाऱ्यांमार्फत दोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. हे करीत असताना कागल तालुक्यात दोन हजारांहून अधिक जणांचे मोर्चे काढून यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा सर्व लाभार्थ्यांची फेरचौकशी शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच जर त्रुटी असतील तर अशी प्रकरणे निदर्शनास आणून द्या, त्यांची चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.यावर मुश्रीफ यांनी आम्ही ३००० लोकांमधून ही नावे शोधून काढायची काय? हे तुमचे काम आहे; त्यामुळे तुम्ही फेरचौकशी करावी, असे सांगितले. आम्ही महात्मा गांधींचे अनुयायी असल्याने कुणावरही दबाव आणण्याचा प्रश्नच येत नाही. तसे वाटल्यास तुम्ही चौकशी बंद करू शकता. फेरचौकशीसाठी शासनाकडून आदेश आणून वर्षभरात मी आपल्याला अनेक वेळा भेटलो. वेळोवेळी निवेदने, मोर्चे, आंदोलने केली आहेत; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. शिष्टमंडळात जिल्हा बॅँकेचे संचालक प्रताप माने, जिल्हा परिषदेचे सदस्य युवराज पाटील, मनोज फराकटे, कागलच्या नगराध्यक्षा माणिक माळी, उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर, शशिकांत खोत, रमेश तोडकर, सुभाष चौगले, विकास पाटील, आदींचा समावेश होता.-------------------------अजूनही आम्ही संयमात....मी पाच वेळा आमदार व दोन वेळा मंत्री असूनही माझ्यासारख्या माणसाला तुम्ही एवढा वेळ लावत आहात, हे बरोबर नसून अजूनही आम्ही संयमात आहोत, हे विसरू नका अशा शब्दांत मुश्रीफ यांनी संताप व्यक्त केला.---------------------------------------इथेच भडका उडेलजिल्हाधिकाऱ्यांशी हसन मुश्रीफ चर्चा करीत असताना जिल्हाधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने मुश्रीफ संतप्त झाले होते. त्यात मध्येच कुणीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. यावर मुश्रीफ यांनी त्यांना रोखत ‘मी बोलतो आहे; त्यामुळे कुणीही मध्ये बोलू नका,’ असे सांगत ‘आता इथेच भडका उडेल,’ असे म्हणत जिल्हाधिकाऱ्यांकडे कटाक्ष टाकला.