शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अर्जुनी औद्योगिक वसाहतीसाठी स्वारस्य कोणाचे ?

By admin | Updated: March 20, 2016 23:24 IST

शासकीय यंत्रणा कार्यरत : शेतकरी लोकप्रतिनिधींचा विरोध

जहाँगीर शेख -- कागल --निपाणी शहरालगत महाराष्ट्रात असलेल्या अर्जुनी तालुका कागल येथे जवळपास ६२५ एकर शेतजमिनीवर उभारण्यात येणाऱ्या औद्योगिक वसाहतीला येथील शेतकऱ्यांचा विरोध कायम असून २०११ पासून हे शेतकरी महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाविरुद्घ लढाई करीत आहेत. ज्यांच्या जमिनी यासाठी जाणार आहेत त्यांचा जमिनी देण्यास ठाम विरोध असतानाही शासकीय यंत्रणा या औद्यागिक वसाहतीच्या निर्मितीसाठी धडपडत करीत आहेत. कागल तालुक्यातील लोकप्रतिनिधींसह निपाणीच्या लोकप्रतिनिधींचाही यास विरोध असताना येथेच औद्योगिक वसाहत उभी करण्यात नेमका ‘‘इंटरेस्ट’’ कोणचा ? हा एकच सवाल अर्जुनी परिसरात ऐकावयास मिळतो.कागल येथील बहुद्देशीय शासकीय सभागृहात प्रांताधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी आणि सर्व्हे करण्याबद्दल नुकतीच बैठक घेण्यात आली. तेव्हा उपस्थित शेतकऱ्यांनी एक इंचही जमीन देण्यास विरोध कायम असल्याचे बजावले. प्रांताधिकारी आणि इतर शासकीय अधिकाऱ्यांनी या औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचे फायदे किती याचा ऊहापोह केला. सरतेशेवटी शेतकऱ्यांच्या विरोधाची नोंद घेऊन तसे शासनास कळविण्यात येईल आणि शासन आदेशाने पुढील कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्याने शासन स्तरावर पुन्हा पुन्हा जमीन संपादनाचे प्रयत्न होत राहतील हे स्पष्ट झाले आहे. २०११ पासून विरोध करीत आहेत. पुढेही शेतकरी विरोधासाठी तयार असतील. यातून शेतकरी विरुद्ध शासन हा संघर्ष पहावयास मिळणार आहे.अर्जुनी येथे औद्योगिक वसाहत व्हावी अशी मागणी आम्ही अथवा कागल तालुक्यातील, जिल्ह्यातील कोणी एकानेही केलेली नसताना येथे हा घाट कोणी आणि कशासाठी घातला? हाच खरा प्रश्न आहे. पर्यावरण निसर्ग संपदा शेतजमीन, रहिवाशी क्षेत्र अशा कोणत्याही बाजूचा विचार न करता शासन स्तरावर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीचे प्रयत्न सुरू आहेत. मुळात जिल्ह्यातील उद्योजकच कर्नाटकात स्थलांतरित होण्याची भाषा करीत असताना नेमकी ही वसाहत कोणाला हवी आहे?- आनंदा रामा नाईक (गायकवाडी) एका औद्योगिक वसाहतीच्या निर्मितीतून त्या परिसरातील लोकांचा मोठा फायदा होतो. परिसराचा कायापालट होतो. सीमाभागातील औद्योगिकीकरणासाठी अर्जुनी येथे औद्योगिक वसाहत उभारण्याचा निर्णय झाला आहे. जमीन संपादन, नुकसानभरपाई असे विविध प्रश्न चर्चेतून सोडविता येतील. मात्र, याबद्दल कोणी गैरसमज करु नयेत. सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे. शासन शेतकरी आणि जमीनधारकांना विश्वासात घेऊन निर्णय घेईल.- मोनिका सिंह, प्रांताधिकारी, करवीरप्रस्तावित औद्योगिक वसाहतजून २०११ दरम्यान शेतकऱ्यांच्या सात-बारावर औद्योगिक वसाहतीसाठी राखीव अशी नोंद तलाठांच्याकडून करण्यात आणि ही नोंद २४७ हेक्टरवर झाली. तेथून आंदोलनाला सुरवात.कागल तालुक्यातील अर्जुनी गावातील तसेच ४१९ कर्नाटक हद्दीतील गायकवाडी गावातील शेतकऱ्यांच्या या जमिनी आहेत. या जमिनीत ऊस, तंबाखू, भाजीपाला, फळे यासह कडधान्ये आदी पिके घेतली जातात. धनगर समाजाची चराऊ पडीक जमीनही मोठ्या प्रमाणात आहे.प्रस्तावितऔद्योगिक वसाहत निपाणीपासून ५ किलोमीटरवर निपाणी- मुरगूड रस्त्याकडेला आहे. २०११ पासून आंदोलन सुरू आहे. माजी आमदार काकासाहेब पाटील वगळता कागल व निपाणीमधील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनीही विरोध असल्याची पत्रे दिली आहेत. प्रत्येकवेळी सर्व शेतकरी विरोधासाठी एकदिलाने लढाई करीत आहेत. काकासाहेब पाटील यांच्यामुळे या वसाहतीला मंजुरी मिळाल्याचा आंदोलकांचा दावा.