शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

इचलकरंजीवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST

पंचगंगेत जलपर्णीचा विळखा : नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद ?

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे पंचगंगेचा पाणी उपसा बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी इचलकरंजीकरांना लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरास मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतून आणि येथील पंचगंगा नदीवरून पाणीपुरवठा होतो. या दोन्ही नद्यांतून होणारा पाणीपुरवठा येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध करून ते पाणी नळाद्वारे शहरवासीयांना दिले जाते. सध्या सुमारे ४५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. मात्र, हे पाणी दोन दिवसांतून एकवेळ किंवा एक दिवसाआड अशा पद्धतीने पुरविले जाते. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद केला जातो.सध्या पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होऊ लागली आहे. जलपर्णी म्हणजे पाणी दूषित होण्याचे प्रतीक मानले जाते. पंचगंगा नदीतील पाणी अधिक दूषित झाल्यास पंचगंगा नदीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे कृष्णा नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच इचलकरंजीकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी कृष्णा नदीतून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड म्हणजे तीन दिवसांतून एकवेळ होणार असल्याने आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याला जबाबदार कोण?पंचगंगा नदीपात्रामध्ये नदीकाठावर असलेली शहरे व खेडेगावांचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. अशा पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी शुद्ध करण्याची मोहीम सरकारने हाती घेण्याचे ठरविले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनसुद्धा नदीतील पाणी दूषित होऊ नये, याची दक्षता घेतली जाते; पण पंचगंगा नदीघाटावर नागरिकांकडून चारचाकी वाहने व जनावरे राजरोसपणे धुतली जात आहेत. तसेच कपडेही धुतले जातात. त्याबाबत नगरपालिकेकडून डोळेझाक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.