शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

इचलकरंजीवर पाणीटंचाईचे सावट

By admin | Updated: January 20, 2015 23:36 IST

पंचगंगेत जलपर्णीचा विळखा : नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद ?

इचलकरंजी : येथील पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होण्यास सुरुवात झाली असून, त्यामुळे पंचगंगेचा पाणी उपसा बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. परिणामी इचलकरंजीकरांना लवकरच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.शहरास मजरेवाडी (ता. शिरोळ) येथून कृष्णा नदीतून आणि येथील पंचगंगा नदीवरून पाणीपुरवठा होतो. या दोन्ही नद्यांतून होणारा पाणीपुरवठा येथील जलशुद्धिकरण केंद्रात शुद्ध करून ते पाणी नळाद्वारे शहरवासीयांना दिले जाते. सध्या सुमारे ४५ दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा नागरिकांना केला जातो. मात्र, हे पाणी दोन दिवसांतून एकवेळ किंवा एक दिवसाआड अशा पद्धतीने पुरविले जाते. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषित झाल्यास तेथील पाण्याचा उपसा बंद केला जातो.सध्या पंचगंगा नदीपात्रात जलपर्णी जमा होऊ लागली आहे. जलपर्णी म्हणजे पाणी दूषित होण्याचे प्रतीक मानले जाते. पंचगंगा नदीतील पाणी अधिक दूषित झाल्यास पंचगंगा नदीतून होणारा पाणीपुरवठा बंद केला जातो. त्यामुळे कृष्णा नदीतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यावरच इचलकरंजीकरांना अवलंबून राहावे लागणार आहे. परिणामी कृष्णा नदीतून होणारा पाणीपुरवठा दोन दिवसाआड म्हणजे तीन दिवसांतून एकवेळ होणार असल्याने आतापासूनच पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. याला जबाबदार कोण?पंचगंगा नदीपात्रामध्ये नदीकाठावर असलेली शहरे व खेडेगावांचे सांडपाणी मिसळत असल्याने नदीचे पाणी प्रदूषित होते. अशा पार्श्वभूमीवर पंचगंगा नदी शुद्ध करण्याची मोहीम सरकारने हाती घेण्याचे ठरविले आहे. तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनसुद्धा नदीतील पाणी दूषित होऊ नये, याची दक्षता घेतली जाते; पण पंचगंगा नदीघाटावर नागरिकांकडून चारचाकी वाहने व जनावरे राजरोसपणे धुतली जात आहेत. तसेच कपडेही धुतले जातात. त्याबाबत नगरपालिकेकडून डोळेझाक होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.