शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

जलशुद्धिकरणाचे ‘अशुद्ध, गलिच्छ’ केंद्र

By admin | Updated: November 26, 2015 00:33 IST

बालिंगा केंद्र बनले लावारिस : जलशुद्धिकरणाची प्रक्रिया उघड्यावरच; परिसरात कचरा, शेणाच्या ढिगाऱ्यांचे साम्राज्य

भारत चव्हाण ल्ल कोल्हापूरबालिंगा येथील ऐतिहासिक जलशुद्धिकरण केंद्र आता लावारिस बनले आहे. गेल्या ६७ वर्षांत शहराची तहान भागविणाऱ्या या जलशुद्धिकरण केंद्राकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे निसर्गरम्य परिसर आता कचरा आणि शेणाच्या ढिगाऱ्यात बुडाला आहे. कर्मचाऱ्यांची निवासस्थाने आता गावठी श्वानांची व जनावरांची आश्रयस्थाने बनली आहेत. करोडोंची मिळकत आणि त्याहीपेक्षा नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाचा परिसर असा अस्वच्छ बनल्याने ‘स्मार्ट सिटी’कडे आपण कशी वाटचाल करणार, हाच प्रश्न आहे. कोल्हापूर शहराची तहान भागविण्यासाठी १९४९ मध्ये शहराच्या पश्चिमेला बालिंगा गावच्या हद्दीत सरकारने प्रतिदिन २४ लक्ष गॅलन क्षमतेचे जलशुद्धिकरण केंद्र उभारले. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर हे जलशुद्धिकरण केंद्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली आले; परंतु राज्य सरकारच्या धोरणांत बदल होऊन शहराला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेवर सोपविण्यात आली. त्याचाच भाग म्हणून हे जलशुद्धिकरण केंद्र १९९२ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात आले. महानगरपालिकेच्या ताब्यात हे केंद्र आल्यानंतर त्याचा विस्तार झाला. त्याची शुद्धिकरणाची क्षमताही वाढविण्यात आली. सध्या जलशुद्धिकरणासाठी या केंद्रात आठ वाळूंचे वाफे (बेड) आहेत; परंतु केंद्रातील दुरुस्ती, देखभालीकडे प्रशासनाने म्हणाव्या तितक्या गांभीर्याने लक्ष दिले नसल्याने या वाफ्यातील वाळूचे वाफे गाळात बुडाले आहेत. बऱ्याच ठिकाणी गळती लागली आहे तर लोखंडी जलवाहिन्या अक्षरश: गंजलेल्या आहेत. नदीतून घेतलेल्या पाण्यात वाऱ्याद्वारे वाहून आलेली बाहेरील धूळ मिसळते. जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात एक सुंदर अशी बाग होती, परंतु ती आता गायब झाली आहे. बागेचे अवशेषही पाहायला मिळत नाहीत. काही एकरांचा हा परिसर तारेच्या कुंपणाद्वारे बंदिस्त असायचा. सुरक्षेची पूर्ण खात्री पटल्याखेरीज कर्मचाऱ्यांच्या नातेवाइकांनाही आतमध्ये सोडले जात नव्हते. खात्री पटल्यावरदेखील नाव, पत्ता, सही घेतली जात असे; परंतु या सर्व गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. परिसरातील तारेचे कुंपण, लोखंडी दरवाजे गायब झाले आहेत. कोणीही, कोणत्याही बाजूने सहजपणे जलशुद्धिकरण केंद्रात जाऊ शकते. खिडक्या गायब आहेत. काही ठिकाणी काचा फुटलेल्या आहेत. दरवाजे तर कुठेच दिसत नाहीत. इतके ते असुरक्षित बनले आहे. निवासस्थाने बनलीत जनावरांचे आश्रयस्थानजलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरातच कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी सुबक कौलारू घरे बांधण्यात आली होती. त्यातील काही घरांत आजही कर्मचाऱ्यांची कुटुंबे राहतात; परंतु चार घरे तसेच अधिकाऱ्याचा बंगला आता गावठी कुत्र्यांचा, जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे. काही मद्यपी लोकही त्याचा राजरोस वापर करतात. निवासस्थानांचे दरवाजे, खिडक्या, कौले चोरीस गेली आहेत. त्यातच गवत, झाडे-झुडपे वाढली आहेत. अतिशय सुसज्ज स्थितीतील ही घरे आता नामशेष होऊ लागली असून, अधिकाऱ्याचा बंगला तर भूतबंगला बनला आहे. कचरा, शेणाचे ढीग काही एकरांत पसरलेल्या जलशुद्धिकरण केंद्राच्या परिसरात आता कचऱ्याचे आणि जनावरांच्या शेणाचे ढीग साचले आहेत. बालिंगा गावचा सगळा कचरा येथेच टाकला जातो की काय, अशी शंका येते. शेणापासून गोवऱ्या थापल्या जात आहेत. जलशुद्धिकरण केंद्राकडून येणारा एक पाण्याचा ओहोळ रस्त्यावरच अडवून शेणी थापण्यासाठी हे पाणी वापरले जात आहे. एका बाजूला कचरा आणि दुसऱ्या बाजूला शेणाचे ढीग यामुळे परिसराचे प्रचंड विद्रुपीकरण झाले आहे. या भागाला पाणीपुरवठा ४बालिंगा जलशुद्धिकरण केंद्रातून कोल्हापूर शहराच्या बहुतांशी भागात पाणीपुरवठा करण्यात येतो. ४चंबुखडी टाकीतून सी व डी वॉर्डाला पाणीपुरवठा होतो. त्यामध्ये रंकाळा तलावापासून ते बी. टी. कॉलेज, बागल चौकापर्यंतच्या भाग येतो. ४आपटेनगर टाकीतून सानेगुरुजी, तुळजाभवानी मंदिर ते शिवाजी पेठ व मंगळवार पेठेच्या काही भागाला पाणीपुरवठा होतो.