शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज
2
"मी प्रदेशाध्यक्ष आहे, भाजपमध्ये जाण्यासाठी मला..."; भाजप प्रवेशावर जयंत पाटलांनी सोडलं मौन
3
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
4
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
5
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
6
राज्यात धरणग्रस्तांच्या जमीन वाटपात मोठा भ्रष्टाचार; जयंत पाटलांचा विधानसभेत घणाघाती आरोप
7
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
8
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
9
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
10
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
11
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
12
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
13
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
14
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
15
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
16
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
17
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
18
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
19
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
20
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?

लाईन बझारची इन्फंट्रीच्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा

By admin | Updated: July 26, 2016 00:37 IST

पी-ढबाकचा गजर : संस्थानकालीन राजाराम रायफल्सने १८६८ मध्ये अर्पण केले मुखवटे

इंदुमती गणेश -- कोल्हापूर --राजाराम महाराज यांच्या काळातील इन्फंट्रीमधील सैनिकांकडून केल्या जाणाऱ्या त्र्यंबोली यात्रेची परंपरा अद्यापही लाईन बझारने जपली आहे. ‘कोल्हापूरचे रक्षण करणारी देवता’ म्हणून त्र्यंबोली व मरगाई देवीला राजाराम रायफल्सकडून सन १८६८ मध्ये मुखवटे अर्पण करण्यात आले. डॉल्बीच्या जमान्यात त्र्यंबोली यात्रेचे स्वरूप बदलले असले तरी येथून मात्र ‘पी ढबाक्’च्या गजरात पालखी त्र्यंबोलीला जाते. ब्रिटिशांनी सन १८४५-४८ च्या दरम्यान आताच्या लाईन बझार येथील स्थानिकांकडून भूखंड घेऊन रेसिडेन्सी स्थापन केली. याच्या संरक्षणासाठी इन्फंट्री सुरू करण्यात आली त्यात ८०० हून अधिक स्थानिकांची भरती करण्यात आली. ‘रक्षणकर्ती देवता’ म्हणून इन्फंट्रीमधील सैनिकांनी सन १८६८ मध्ये त्र्यंबोली व मरगाई देवीला चांदीचे मुखवटे, मासपट्टा, चपला अर्पण केल्या. त्यातील मुखवट्यांवर राजाराम रायफल्स कोल्हापूर यांच्याकडून ‘अर्पण शके १८६८ भार ७५’ असे नमूद आहे. शहाजी महाराजांच्या काळात इन्फंट्रीचे ‘शहाजी नगर’ असे नामांतर झाले. येथील वसाहती एका ओळीत होत्या. येथेच बाजारही भरायचा त्यामुळे या भागाला आता ‘लाईन बझार’ म्हणून ओळखले जाते. या लाईन बझारची त्र्यंबोली यात्रा आज, मंगळवारी होणार आहे. आजही हिंदू समाजातर्फे लाईन बझार या परिसरासाठी सरपंचांची निवड केली जाते. येथील मैदानावर होणाऱ्या सीमोल्लंघन सोहळ््याचा पहिला मान या सरपंचांना आहे. संस्थानकालीन वास्तूंचा परिसर या परिसरात संस्थानकालीन वास्तू आहे. लक्ष्मी-विलास पॅलेस, रिसाला म्हणजे आताचे एसआरपी कॅम्प, भगवा चौकातील पोलिसांची शाळा, ब्रिटिशकालीन रेसिडेन्सियल निवास म्हणजे सध्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान. इन्फंट्री पोलिसांचे निवासस्थान म्हणजे पोलीस मुख्यालय, कवायत मैदान म्हणजे महासैनिक दरबार, इंदुमती राणी सरकारांचा वाडा म्हणजे सर्किट हाऊस, घोड्याच्या पागा व राऊंडाचा माळ म्हणजे शेती फार्म कार्यालय.देवीचा कौल त्र्यंबोली यात्रा करण्यासाठी आजही येथील नागरिकांकडून देवीचा कौल घेतला जातो. त्यासाठी आषाढ महिन्याच्या पंधरा दिवस आधी लाईन बझार येथील जुनी जाणती मंडळी त्र्यंबोलीला जातात.घरटी एक आणा...देवस्थान समितीच्या कागदपत्रात त्र्यंबोली यात्रा राजाराम रायफल्समधील सैनिकांनी करावी. त्यासाठीचा खर्च कवट्याचं रान व मारुती देवालयामागील जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून करावा, असे नमूद आहे नंतर इन्फंट्रीच्या पगारातून रक्कम वजा केली जायची. पुढे घरटी मासिक एक आणा वर्गणी गोळा केली जायची. या सगळ््या हिंदू समाजाच्या सन १९६८-७१ या काळातील नोंदी आहेत.