शहरं
Join us  
Trending Stories
1
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
2
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
3
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
4
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
5
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
6
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
7
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
8
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
9
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
10
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
11
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  
12
Air India Plane Crash: नव्या पाहुण्याचं स्वागत करण्याआधीच सगळं संपलं; ७ महिन्याची गर्भवती होती जिनल
13
Iran Israel युद्घात अजब चोरी; इस्रायली हॅकर्सनं ८०० कोटींची क्रिप्टोकरन्सी केली नष्ट, प्रकरण काय?
14
Yogini Ekadashi 2025: एखाद्या व्यक्तीने दिलेला शाप योगिनी एकादशी व्रताचरणामुळे होतो दूर!
15
खळबळ उडाली! जीन्स अन् टॉपमध्ये दिसू लागल्या हायफाय भिकारी, लोक १००-२०० रुपये देऊ लागले... 
16
Beed Crime News : बीडमध्ये पैशांसाठी अपहरण, मुलासाठी ५० हजार रुपयांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
17
चीन-पाकिस्तानचं वाढणार टेन्शन; भारताला लवकरच मिळणार हायटेक्निक मिसाईल, कसं करणार काम?
18
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
19
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
20
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर

के.एम.टी.च्या कारभारावर ताशेरे

By admin | Updated: November 28, 2015 00:31 IST

महापालिकेचे लेखापरीक्षण : भाडेतत्वावरील बसेसचा करार; स्पर्धेशिवाय दिलेले पार्किंगचे ठेके निदर्शनास

कोल्हापूर : महानगरपालिका परिवहन उपक्रमाकडील (के.एम.टी.) अनेक नियमबाह्य व्यवहारांवर बोट ठेवत शासकीय लेखापरीक्षकांनी के.एम.टी.च्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली. भाडेतत्त्वावरील बसेस घेण्याचा करार, बिंदू चौक व कावळा नाका येथील पार्किंगचा ठेका देताना झालेल्या चुका या लेखापरीक्षकांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत प्रश्नांचा भडिमार केला आणि या प्रश्नांची तुम्हाला उत्तरे द्यावीच लागतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला. त्यामुळे हिरमुसलेले अधिकारी निरूत्तर होऊन बसले होते. के.एम.टी. प्रशासनाने केलेले अंतर्गत लेखापरीक्षण राज्य सरकारकडे मंजुरीकरिता पाठविले आहे. त्याची तपासणी सध्या सरकारच्या लोकल फंड आॅडिट विभागामार्फ त सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून या विभागाचे उपसंचालक सीताराम काळे व त्यांचे सहकारी महानगरपालिका आणि के.एम.टी.त आले होते. सकाळच्या सत्रात महानगरपालिकेत अनेक विभागांशी एकत्रित चर्चा केल्यानंतर शासकीय लेखापरीक्षक दुपारी के.एम.टी.मध्ये गेले. के.एम.टी. प्रशासनाने केलेल्या अंतर्गत लेखापरीक्षणात काही महत्त्वाच्या प्रकरणात चुका झाल्याचे शासकीय लेखापरीक्षकांनी निदर्शनास आणून दिले आणि त्यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले. चार वर्षांपूर्वी के.एम.टी. प्रशासनाने ‘प्रवाशांच्या सोयी’चे कारण देत भाडेतत्त्वावर खासगी वाहतूक कंपन्यांकडून तीस बसेस घेतल्या होत्या; परंतु करार करण्यापासून, त्याची स्टँम्प ड्युटी भरण्यापासून अनेक चुका झाल्या आहेत. या बसेस घेतल्यानंतर के.एम.टी. प्रशासनाला लाखोंचे नुकसान सोसावे लागले होते. हा व्यवहार करण्याचा निर्णय कोणाचा होता, तसा निर्णय घ्यायचे कारण काय, संस्थेला नुकसान होत असतानाही बसेस धावत होत्या. त्यात हस्तक्षेप का केला गेला नाही, संस्थेचे नुकसान का रोखले नाही, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात आली तेव्हा के.एम.टी.च्या अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत. खासगी बसेसमुळे के.एम.टी.चे बरेच नुकसान झाले होते, परंतु काही अधिकाऱ्यांच्या अट्टहासापायी नुकसान सोसूनही या बसेस भाड्याने घेतल्या होत्या, हे स्पष्ट झाले आहे. त्यावर लेखापरीक्षकांनी तीव्र आक्षेप नोंदविले आहेत. के.एम.टी.च्या मालकीच्या बिंदू चौक तसेच कावळा नाका येथील मोकळ्या जागा पार्किंगसाठी उपलब्ध करुन देताना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याचा जाब अधिकाऱ्यांना विचारला गेला. जागा देताना निविदा मागविल्या होत्या का, कितीजणांनी निविदा भरलेल्या होत्या, पहिल्या प्रयत्नात एकच निविदा आली असेल तर पुन्हा निविदा का मागविल्या नाहीत, ठेका देताना का घाई केली, स्पर्धा झाली नसेल तर ठेकेदारास निगोसिएशनला का बोलाविले नाही, असेही प्रश्न शासकीय लेखापरीक्षकांनी के.एम.टी.च्या अधिकाऱ्यांना विचारले. लेखापरीक्षकांच्या प्रश्नांनी के.एम.टी.च्या अधिकाऱ्यांची ‘बोलती बंद’ झाली. त्यांना कोणतीही समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत. त्याचे स्पष्टीकरण देता आले नाही. शेवटी लेखापरीक्षकांनीच या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज ना उद्या द्यावीच लागतील, असा इशाराही दिला. लेखापरीक्षकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळे के.एम.टी.तील व्यवहार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. (प्रतिनिधी)